शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

.... ही तर राजकीय गुलामगिरी!

By admin | Updated: February 16, 2015 03:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी असलेली मैत्री भाजपाच्या मित्र पक्षांना न पेलणारी आहे

बारामती (जि़ पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी असलेली मैत्री भाजपाच्या मित्र पक्षांना न पेलणारी आहे. चार महिन्यांपूर्वी ‘राष्ट्रवादी भ्रष्टाचारी पक्ष’ आहे. पवारांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची वेळ आली आहे, अशी टीका करणाऱ्या मोदींना पवारांचा ‘सल्ला’ घेणे भाग पडते, हे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांच्या मेळाव्यात पंतप्रधानांनी एफआरपीसाठी काही अनुदान जाहीर केले असते, तर त्याचे शेतकऱ्यांनी कौतुक केले असते. मात्र, गळ्यात गळे घालून मोदी यांनी राजकीय गुलामगिरीला अधिकच बळ दिले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र व राज्यात सरकार आल्यानंतर मनोधैर्य वाढलेल्या भाजपा-शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मोदींच्या पवार प्रेमावर कडाडून टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेचा हा अवमान आहे. जनतेची फसवणूकच करायची होती, तर निवडणुकाच एकत्र लढवायच्या, अशी तिखट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. राज्यात आता सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी आमच्या तयारीवर बोळा फिरविण्याचे काम झाले आहे. शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीला जवळ करणे, हे राज्यातील जनता मान्य करणार नाही. गुणगान करण्यापेक्षा एफआरपीसाठी अनुदान, ठिबकसाठी अनुदान जाहीर केले असते तर त्याला शेतकऱ्यांनी महत्त्व दिले असते. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घोटाळ्यांच्या चौकशीत या मैत्रीमुळे काही निष्पन्न होणार नाही, अशी भीती शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भाजपाचे जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. कृषी विकासासाठी दोन मोठे नेते एकत्र आले तर चुकले काय. या भेटीचा अर्थ राजकीय काढू नये. त्याचबरोबर मोदी-पवार भेटीमुळे सध्या सुरू असलेल्या चौकशा थांबणार नाही, अशी कार्यकर्ता म्हणून आपल्याला खात्री आहे. राजकारणात एखाद्या व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीशी वैयक्तीक संबंध असू शकतात. त्यातूनच या भेटीकडे पहावे, असे मला वाटते. तसाही तो काही राजकीय कार्यक्रम नव्हता. ते का भेटले, हे आपण सांगू शकत नाही. त्यांच्या भेटीची कारणे फक्त त्या दोन नेत्यांनाच माहिती असणार, असे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या एकत्रित कार्यक्रमाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची आवश्यकता नाही. पंतप्रधानांची ती व्यक्तीगत भेट होती. त्यामुळे या भेटीचा राजकीय अर्थ काढणे योग्य ठरणार नाही, असे महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी मत व्यक्त केले.