शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

राज्य पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेलाच नाही!

By admin | Updated: July 8, 2015 02:29 IST

राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिला.

सांगली/कोल्हापूर : राज्यातील पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही. पोलीस आणि गुन्हेगारांची साखळी असल्यामुळेच गुन्हेगारांना जामीन मिळतो, अशा शब्दांत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील गृह खात्याला ‘घरचा’ अहेर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तुरची (ता. तासगाव) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. मंत्री पाटील यांनी पोलीस खात्यावर एकप्रकारे मुक्तचिंतनच केले. ते म्हणाले, की अनेकदा आंदोलनकर्ते पोलिसांवर तर गुन्हेगार हे पोलीस ठाण्यांवर हल्ले करतात. सुईच्या कामासाठी तलवारीचा वापर न करता बंदुकीचा धाक दाखवला पाहिजे, तरच पोलिसांचा वचक राहील. समाजातील गुन्हेगारी आणि माफियाराज यांचा वेळीच बंदोबस्त करा अन्यथा काही खैर नाही, असेही त्यांनी सुनावले.सहकार मंत्री चंद्रकांत दादा हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासू गोटातील मंत्री म्हणून ओळखले जातात. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची कोल्हापूर सासुरवाडी असल्याने दादांचे दिल्लीशी थेट संबंध आहेत. शहा यांच्या शिफारशीवरूनच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊन सार्वजनिक बांधकाम आणि सहकार अशी वजनदार खातीही मिळाली. त्यामुळे मंत्रिमंडळात दादांचा शब्द प्रमाण मानला जातो. (प्रतिनिधी)ही तर कोल्हपूरची देन - पवारसहकारमंत्र्यांनी पोलीस खात्याच्या कार्यक्षमतेबद्दल उलटसुलट विधाने केली असल्याचे कोल्हापुरात पत्रकारांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर मोठ्या उपहासात्मक शब्दांत पवार म्हणाले, की चंद्रकांतदादा ही तर कोल्हापूरने महाराष्ट्राला दिलेली मोठी देन आहे! त्यांच्यासारखा विविध प्रश्नांवर बेधडकपणे भूमिका मांडणारा मंत्री मी आजपर्यंत बघितला नाही. त्याबद्दल कोल्हापूरकरांचे आभारच मानायला पाहिजेत !शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर अग्निशमन यंत्राच्या खरेदीतील अनियमितेबाबत आरोप झाला, तेव्हा तावडेंची पाठराखण करण्यासाठी चंद्रकातदादा पुढे सरसावले होते. शिवाय शिवसेना आणि भाजपात समन्वयाची अतिरिक्त जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दादांना ‘संकटमोचक’ म्हणूनच संबोधले जाते. असे असताना अचानक त्यांनी फडणवीस यांच्याकडील गृह खात्याचे ‘पोस्टमॉर्टेम’ केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे.