शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

विकासासाठी राज्याची चतु:सूत्री

By admin | Updated: February 9, 2015 05:32 IST

शेती विकास, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन आणि जलयुक्त शिवार ही चतु:सूत्री महाराष्ट्र सरकारने प्राधान्याने स्वीकारली असल्याचे

नवी दिल्ली : शेती विकास, रोजगार निर्मिती, गरिबी निर्मूलन आणि जलयुक्त शिवार ही चतु:सूत्री महाराष्ट्र सरकारने प्राधान्याने स्वीकारली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निती आयोगापुढे बोलताना स्पष्ट केले. विदर्भ व मराठवाडा या मागास भागास अतिरिक्त निधी मिळावा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. निती आयोगापुढे महाराष्ट्राची बाजू मांडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिप्रेत ‘टीम इंडिया’ची अनुभूती आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.निती आयोगाच्या नियामक परिषदेची पहिली बैठक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या अपेक्षा व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या विकास आराखड्यानुसार निधी मंजूर करण्याचे निती आयोगाने मान्य केले आहे. मात्र राज्य सरकारला निधी मिळाल्यावर आमचा प्राधान्यक्रम हा वरील चतु:सूत्रीला राहील. केंद्राच्या ७६ योजनांमध्ये राज्य सरकारला निधी दिला जातो. या योजना राबवताना येणाऱ्या अडचणी व त्यांची सोडवणूक करण्याकरिता केंद्र सरकारकडून अपेक्षित साहाय्य यावर बैठकीत चर्चा झाली. त्याचबरोबर या योजनांमध्ये दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना द्यायच्या मदतीची रक्कम अद्याप केंद्र सरकारने दिलेली नाही, याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, दुष्काळग्रस्त भागातील अंतिम आणेवारी केंद्र सरकारला सादर केली आहे. या आठवड्यात निर्णय अपेक्षित आहे. आणेवारीचे सध्याचे निकष शिथिल करण्याची मागणी फडणवीस यांनी केली. राज्यातील साखर कारखान्यांना अतिरिक्त निधी देण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याबरोबर रेल्वे अर्थसंकल्पाकडून महाराष्ट्राच्या असलेल्या अपेक्षांची चर्चा केलेली आहे. रेल्वेकडून प्राप्त होणाऱ्या निधीचा पॅटर्न बदलण्याची विनंती केली असून, रेल्वेमंत्र्यांनी यासंदर्भात दिलेल्या आश्वासनावर आपण समाधानी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)