शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

By admin | Updated: February 19, 2017 03:26 IST

ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची

मुंबई : ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची आपल्याकडे काय अवस्था होते. हे सगळ््यांना माहिती आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लगावला.सध्या मुंबईत व राज्यातही अनेक ठिकाणी ‘हा माझा शब्द आहे’ असे विधान मुख्यमंत्र्यांच्या तोंडी टाकून भाजपाने निवडणूक कॅम्पेन केले आहे. त्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, भाजपाचे अनेक खासदार, राज्यातील मंत्री मला खासगीत भेटतात, मोकळेपणाने बोलतात. आमच्या पक्षाला अटलजी, अडवाणी यांच्यासारखे नेते होते, परंतु त्यांनी कधी एककेंद्री नेतृत्व तयार केले नाही. मात्र, हल्ली ‘मी’ पणावर जोर देऊन इतरांना विचारात व विश्वासात न घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत ते नेते बोलून दाखवत आहेत. भाजपामधील नेत्यांचा हा ‘मी’ पणा लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही, अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगणे हास्यास्पद असल्याचेही पवार म्हणाले. आपण काय केले ते सांगायचे नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले हे सांगणारे आरोप करत राहायचे, त्यातून एवढा चौफेर हल्ला केल्यावर गप्प बसेल ती शिवसेना कसली? त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून सेनेचे मंत्रीदेखील आता फडणवीस माजी मुख्यमंत्री होणार, असे म्हणू लागले आहेत! ते माजी झाल्यावर हे कोण राहतील कोणास ठावूक? शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेणार की नाही माहिती नाही, पण ते पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे पाठिंबा ठेवणार नाही, असे सांगत आहेत. हे ही काही कमी नाही, असेही पवार म्हणाले. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय तटकरे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. नोटाबंदीमुळे ८० लाख लोक रोजगार हमीच्या दारात!केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. काळा पैसा बाहेर येईल, म्हणून लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, पण त्यातील तथ्य जसे बाहेर येत आहे, तसे लोकांचा सरकार विरोधातील राग वाढत चालला आहे. नोटांबदीच्या निर्णयामुळे देशातील लाखो रोजगार बंद पडले आहेत. मालेगावमधील पॉवरलूम सेक्टरमधून हजारो लोक आपल्या मूळ गावी गेले आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसाय व कष्टकरी लोक असणाऱ्या छोट्या व्यवसायावर झाला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्याने माहिती जारी केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेत मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात ३० लाख लोक काम करत होते आणि नोटाबंदीनंतरच्या त्याच तीन महिन्यांत हा आकडा ३० लाखावरून ८० लाख झाला. यावरूनच नोटांबदीचा फटका किती जबरदस्त होता, हे लक्षात येईल असे पवार म्हणाले.या पारदर्शकतेचे उत्तर द्यावेच लागेल!या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची किती होर्डिंग्ज लागली हे तुम्ही पाहात आहातच. मात्र, दोन अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाने मुंबईभर आणि सगळ््या राज्यात होर्डिंग्ज आणि जाहिरातबाजी केली. त्यासाठी किती तरी आर्थिक गुंतवणूक केली. हा कोट्यवधींचा निधी कोठून आणला, ही आर्थिक शक्ती कशी काय वाढली, याचे उत्तर पारदर्शकतेची भूमिका उच्चारवात मांडणाऱ्या फडणवीस यांना द्यावेच लागेल, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)शब्द किती पाळतात, हे खडसे सांगतील... एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात आम्ही सत्तेत नसलो, तरीही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा हे आजही लोकांना कळते. फडणवीस शब्द किती पाळतात, हे एकनाथ खडसे यांना विचारले, तर ते जास्त चांगले सांगू शकतील. कारण त्यांचा त्यातला अनुभव जास्त चांगला आहे, अशी जोरदार फटकेबाजीही पवारांनी केली.