शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

By admin | Updated: February 19, 2017 03:26 IST

ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची

मुंबई : ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची आपल्याकडे काय अवस्था होते. हे सगळ््यांना माहिती आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लगावला.सध्या मुंबईत व राज्यातही अनेक ठिकाणी ‘हा माझा शब्द आहे’ असे विधान मुख्यमंत्र्यांच्या तोंडी टाकून भाजपाने निवडणूक कॅम्पेन केले आहे. त्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, भाजपाचे अनेक खासदार, राज्यातील मंत्री मला खासगीत भेटतात, मोकळेपणाने बोलतात. आमच्या पक्षाला अटलजी, अडवाणी यांच्यासारखे नेते होते, परंतु त्यांनी कधी एककेंद्री नेतृत्व तयार केले नाही. मात्र, हल्ली ‘मी’ पणावर जोर देऊन इतरांना विचारात व विश्वासात न घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत ते नेते बोलून दाखवत आहेत. भाजपामधील नेत्यांचा हा ‘मी’ पणा लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही, अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगणे हास्यास्पद असल्याचेही पवार म्हणाले. आपण काय केले ते सांगायचे नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले हे सांगणारे आरोप करत राहायचे, त्यातून एवढा चौफेर हल्ला केल्यावर गप्प बसेल ती शिवसेना कसली? त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून सेनेचे मंत्रीदेखील आता फडणवीस माजी मुख्यमंत्री होणार, असे म्हणू लागले आहेत! ते माजी झाल्यावर हे कोण राहतील कोणास ठावूक? शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेणार की नाही माहिती नाही, पण ते पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे पाठिंबा ठेवणार नाही, असे सांगत आहेत. हे ही काही कमी नाही, असेही पवार म्हणाले. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय तटकरे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. नोटाबंदीमुळे ८० लाख लोक रोजगार हमीच्या दारात!केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. काळा पैसा बाहेर येईल, म्हणून लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, पण त्यातील तथ्य जसे बाहेर येत आहे, तसे लोकांचा सरकार विरोधातील राग वाढत चालला आहे. नोटांबदीच्या निर्णयामुळे देशातील लाखो रोजगार बंद पडले आहेत. मालेगावमधील पॉवरलूम सेक्टरमधून हजारो लोक आपल्या मूळ गावी गेले आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसाय व कष्टकरी लोक असणाऱ्या छोट्या व्यवसायावर झाला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्याने माहिती जारी केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेत मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात ३० लाख लोक काम करत होते आणि नोटाबंदीनंतरच्या त्याच तीन महिन्यांत हा आकडा ३० लाखावरून ८० लाख झाला. यावरूनच नोटांबदीचा फटका किती जबरदस्त होता, हे लक्षात येईल असे पवार म्हणाले.या पारदर्शकतेचे उत्तर द्यावेच लागेल!या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची किती होर्डिंग्ज लागली हे तुम्ही पाहात आहातच. मात्र, दोन अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाने मुंबईभर आणि सगळ््या राज्यात होर्डिंग्ज आणि जाहिरातबाजी केली. त्यासाठी किती तरी आर्थिक गुंतवणूक केली. हा कोट्यवधींचा निधी कोठून आणला, ही आर्थिक शक्ती कशी काय वाढली, याचे उत्तर पारदर्शकतेची भूमिका उच्चारवात मांडणाऱ्या फडणवीस यांना द्यावेच लागेल, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)शब्द किती पाळतात, हे खडसे सांगतील... एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात आम्ही सत्तेत नसलो, तरीही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा हे आजही लोकांना कळते. फडणवीस शब्द किती पाळतात, हे एकनाथ खडसे यांना विचारले, तर ते जास्त चांगले सांगू शकतील. कारण त्यांचा त्यातला अनुभव जास्त चांगला आहे, अशी जोरदार फटकेबाजीही पवारांनी केली.