शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
5
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
6
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
7
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
8
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
9
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
10
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
11
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
12
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
13
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
14
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
15
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
16
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
17
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
18
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
19
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
20
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप

मी..मी..करणाऱ्यांचे काय होते, हे राज्याला ठाऊक आहे!

By admin | Updated: February 19, 2017 03:26 IST

ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची

मुंबई : ज्यांना महाराष्ट्रही अजून पुरता माहिती नाही, असे काही जण ‘हा माझा शब्द आहे...’ अशी भूमिका घेत आहेत. हे किती योग्य त्यावर मला बोलायचे नाही, पण मी..मी.. करणाऱ्यांची आपल्याकडे काय अवस्था होते. हे सगळ््यांना माहिती आहे, असा जोरदार टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शनिवारी लगावला.सध्या मुंबईत व राज्यातही अनेक ठिकाणी ‘हा माझा शब्द आहे’ असे विधान मुख्यमंत्र्यांच्या तोंडी टाकून भाजपाने निवडणूक कॅम्पेन केले आहे. त्याची खिल्ली उडवताना पवार म्हणाले, भाजपाचे अनेक खासदार, राज्यातील मंत्री मला खासगीत भेटतात, मोकळेपणाने बोलतात. आमच्या पक्षाला अटलजी, अडवाणी यांच्यासारखे नेते होते, परंतु त्यांनी कधी एककेंद्री नेतृत्व तयार केले नाही. मात्र, हल्ली ‘मी’ पणावर जोर देऊन इतरांना विचारात व विश्वासात न घेण्याची प्रवृत्ती वाढत असल्याची खंत ते नेते बोलून दाखवत आहेत. भाजपामधील नेत्यांचा हा ‘मी’ पणा लोकशाहीला घातक आहे. ज्यांना अजून पूर्ण महाराष्ट्रही माहीत नाही, अशा नेत्यांकडून राज्यातील जनतेला ‘हा माझा शब्द आहे’ असे सांगणे हास्यास्पद असल्याचेही पवार म्हणाले. आपण काय केले ते सांगायचे नाही. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काय केले हे सांगणारे आरोप करत राहायचे, त्यातून एवढा चौफेर हल्ला केल्यावर गप्प बसेल ती शिवसेना कसली? त्यांच्या टीकेला उत्तर म्हणून सेनेचे मंत्रीदेखील आता फडणवीस माजी मुख्यमंत्री होणार, असे म्हणू लागले आहेत! ते माजी झाल्यावर हे कोण राहतील कोणास ठावूक? शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेणार की नाही माहिती नाही, पण ते पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे पाठिंबा ठेवणार नाही, असे सांगत आहेत. हे ही काही कमी नाही, असेही पवार म्हणाले. मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, कोषाध्यक्ष आ. हेमंत टकले, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, संजय तटकरे आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते. नोटाबंदीमुळे ८० लाख लोक रोजगार हमीच्या दारात!केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेतला. त्याचा विपरित परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला आहे. काळा पैसा बाहेर येईल, म्हणून लोकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला, पण त्यातील तथ्य जसे बाहेर येत आहे, तसे लोकांचा सरकार विरोधातील राग वाढत चालला आहे. नोटांबदीच्या निर्णयामुळे देशातील लाखो रोजगार बंद पडले आहेत. मालेगावमधील पॉवरलूम सेक्टरमधून हजारो लोक आपल्या मूळ गावी गेले आहेत. नोटाबंदीचा सर्वाधिक फटका हा शेती व्यवसाय व कष्टकरी लोक असणाऱ्या छोट्या व्यवसायावर झाला आहे. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या ग्रामविकास खात्याने माहिती जारी केली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या रोजगार हमी योजनेत मागील तीन वर्षांत नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांच्या काळात ३० लाख लोक काम करत होते आणि नोटाबंदीनंतरच्या त्याच तीन महिन्यांत हा आकडा ३० लाखावरून ८० लाख झाला. यावरूनच नोटांबदीचा फटका किती जबरदस्त होता, हे लक्षात येईल असे पवार म्हणाले.या पारदर्शकतेचे उत्तर द्यावेच लागेल!या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीची किती होर्डिंग्ज लागली हे तुम्ही पाहात आहातच. मात्र, दोन अडीच वर्षांपूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाने मुंबईभर आणि सगळ््या राज्यात होर्डिंग्ज आणि जाहिरातबाजी केली. त्यासाठी किती तरी आर्थिक गुंतवणूक केली. हा कोट्यवधींचा निधी कोठून आणला, ही आर्थिक शक्ती कशी काय वाढली, याचे उत्तर पारदर्शकतेची भूमिका उच्चारवात मांडणाऱ्या फडणवीस यांना द्यावेच लागेल, असेही पवार म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)शब्द किती पाळतात, हे खडसे सांगतील... एका प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, राज्यात आणि केंद्रात आम्ही सत्तेत नसलो, तरीही कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवायचा हे आजही लोकांना कळते. फडणवीस शब्द किती पाळतात, हे एकनाथ खडसे यांना विचारले, तर ते जास्त चांगले सांगू शकतील. कारण त्यांचा त्यातला अनुभव जास्त चांगला आहे, अशी जोरदार फटकेबाजीही पवारांनी केली.