शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

केंद्रापेक्षा राज्यातच असहिष्णुता जास्त

By admin | Updated: November 8, 2015 00:20 IST

देशापेक्षाही राज्यात जास्त असहिष्णू वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

शेगाव (जि. बुलडाणा) : देशापेक्षाही राज्यात जास्त असहिष्णू वातावरण निर्माण होत असल्याचा आरोप, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. विखे पाटील शनिवारी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते म्हणाले की, ‘देशात सध्या असहिष्णुतेचे वातावरण असून, कोणतीही बुद्धिवादी व्यक्ती असहिष्णुतेचा विरोधच करेल. जे साहित्यिक, कलाकार, शास्त्रज्ञ पुरस्कार परत करत आहेत, त्यांच्याबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांना भाजपा सरकारने आवर घालण्याची गरज आहे.’ ‘राज्यातील युती सरकारने काँग्रेस—राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या योजनांची फक्त नावे बदलली आहेत. हे सरकार ‘गेम चेंजर’ नसून ‘नेम चेंजर’ आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ योजना आमच्या सरकारची होती. त्यांनी या योजनेला ‘जलयुक्त शिवार योजना’ असे नाव दिले. या योजनेचे २४ दलघमी पाणी नेमके कुठे अडविले, त्या गावांची यादी सादर करा. पाणी वाढले, तर ६५३ गावांमध्ये टँकर कसे सुरू आहेत, याचा जाब सरकारने द्यावा.’जलयुक्त शिवारात २४ दलघमी पाणी अडविल्याचा आणि सावकारी प्रकरणात फार मोठ्या कारवाया केल्याचा दावा मुख्यमंत्री करीत आहे. मात्र, याबाबत कागदपत्रे मागितल्यानंतर शासन ती लपवित असल्याचा आरोप विखे यांनी केला.नेमक्या कोणत्या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ झाले, त्याची यादी आठ महिन्यांपासून मागणी करूनही देण्यात आलेली नाही, हा एक मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.