शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
3
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
4
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
5
जबरदस्त स्वयंपाक घर, भव्य मंदिर, ५०० प्रकारची फळझाडे; कर्नाटकातील शेतकऱ्याने १०० कोटींचे आलिशान घर बांधले
6
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
7
या IPO नं गुंतवणूकदारांवर आणली डोकं झोडून घ्यायची वेळ, दिला तगडा झटका...! ₹129 चा शेअर फक्त 84 पर लिस्ट झाला, पैसे लावणारे 'कोमात'!
8
Video: विठ्ठलाच्या दारातच पुण्यातील भाविकांवर प्राणघातक हल्ला; दगडांनी मारहाण, पंढरपुरातील घटना
9
टीम इंडियातील खेळाडूंना कोच गौतम गंंभीर देणार डिनर पार्टी; पण 'तो' आला तर प्लॅन फिस्कटण्याची भीती
10
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
11
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
12
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
13
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
14
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
15
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
16
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
17
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
18
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
19
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
20
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज

केंद्र सरकारमुळे राज्यांना भुर्दंड

By admin | Updated: May 11, 2016 03:39 IST

राज्यांमधील विविध योजनांसाठी आपला वाटा कमी करण्याचे धोरण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आखल्याने राज्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.

मुंबई : राज्यांमधील विविध योजनांसाठी आपला वाटा कमी करण्याचे धोरण केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आखल्याने राज्यांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. केंद्राने पूर्वीप्रमाणेच वाटा द्यावा, ही मागणी अमान्य झाल्यानंतर आता राज्याने केंद्राच्या कपातीला एक प्रकारे मान्यता देत, कृषी विकासाबाबत केंद्र-राज्य हिश्शाचे ६०:४० अशा सूत्राला मान्यता दिली. कृषी विकासाच्या विविध योजनांसाठी केंद्राचा हिस्सा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के असेल. चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र शासनाने राज्याचा केंद्र करातील वाटा ३२ टक्क्यांवरून ४२ टक्के इतका निश्चित केलेला आहे. राज्याचा हा वाटा वाढविताना केंद्र शासनाने विविध केंद्र सहाय्यता तथा पुरस्कृत योजनांच्या अनुदानामध्ये कपात केली आहे. त्यामुळे अशा योजनांची अंमलबजावणी ६०:४० या बदललेल्या सूत्रानुसार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकूण अकरा योजनांचा केंद्राचा हिस्सा ६० टक्के करण्यात आला आहे. यात कृषी उन्नती योजनेंतर्गत दोन योजनांचा समावेश आहे. त्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा समावेश आहे, तसेच राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत येणाऱ्या तीन योजनांचा यामध्ये समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)