शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

महापालिकेच्या कारभारावर राज्य सरकारचा वॉच

By admin | Updated: June 20, 2016 20:35 IST

राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क

ऑनलाइन लोकमत

मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक पाठविण्यात येणार आहे़. अशाप्रकारची ही पालिकेची इतिहासातील पहिलीच नेमणूक असणार आहे़. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असूनही शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत़. राज्य शाासनाच्या लेखासेवा विभागाचे सहाय्यक संचालक सुरेश कचरु बनसोडे यांची महापालिकेच्या मुख्यलेखा परीक्षक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे़. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नेमणूक म्हणजे भाजपाने वचक ठेवण्यासारखे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करुन घेण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरु आहे़. त्यानुसार पालिकेचे प्रभारी मुख्यालेखापरीक्षक अनिल बडगुजर यांनाच कायम ठेवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे़.  चिटणीस आणि लेखा विभाग स्थायी समितीच्या अखत्यारित असल्याने राज्य सरकारने अशापद्धतीने अधिकारी पाठविणे अयोग्य असल्याचे, सूर शिवसेनेने लावला आहे़. स्थायी समितीचे अधिकार डावलण्याचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद शिवसेना नेत्यांनी सुरु केला आहे़. या नियुक्तीला तीव्र विरोध करु, असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे़ प्रतिनिधी चौकट बनसोडे यांना सूत्र नाहीच़़ मुख्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेले सुरेश बनसोडे यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये सूत्र स्वीकारायची आहेत़ मात्र शनिवारी ते पालिका मुख्यालयात आले होते़. परंतु आयुक्त त्यावेळी नसल्याने बनसोडे यांना सूत्र देण्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नकार दिला़ बनसोडे यांनी आज पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांना नकारच मिळाला़़ विधी समितीचे मत घेणार बाहेरील अधिकाऱ्याला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे़. ही स्थगिती उठविल्याचा दावा बनसोडे यांनी केला असल्याचे समजते़ मात्र पालिका प्रशासन याबाबत अद्याप संभ्रमातच आहे़. त्यामुळे याप्रकरणी विधी विभागाचे मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते़ शिवसेना नेत्यांची आगपाखड महापालिकेतील प्रमुख पदे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक राज्य सरकारच करीत असते़. त्यावर आता मुख्य लेखापरीक्षक नेमून सरकार आपल्याच अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे़. पालिकेतील अधिकारी सक्षम असून त्यांनाच पदोन्नती मिळायला हवी होती़ शिक्षण अधिकारी राज्य शासनाकडून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली़ मात्र हा अधिकारी दोन दिवस मुंबईत तर चार दिवस पुण्यात अशी गत आहे़. अशाने पालिकेची कामं होणार कशी, बाहेरुन असे अधिकारी आल्यास पालिकेच्या स्वायत्तेचे काय, अशी आगपाखड स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली आहे़.