शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
4
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
5
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
6
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
7
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
8
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
9
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
10
आजचा अग्रलेख: भारतीयांची क्षमता जोखा, साखर नको!
11
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
12
कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलल्या अमृता फडणवीस, म्हणाल्या- "मला वाईट वाटतं, पण..."
13
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
14
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
15
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
16
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
17
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
18
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
19
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
20
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."

महापालिकेच्या कारभारावर राज्य सरकारचा वॉच

By admin | Updated: June 20, 2016 20:35 IST

राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क

ऑनलाइन लोकमत

मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणकेवर दणके देण्यास सुरुवात केली आहे़. पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक पाठविण्यात येणार आहे़. अशाप्रकारची ही पालिकेची इतिहासातील पहिलीच नेमणूक असणार आहे़. त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असूनही शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत़. राज्य शाासनाच्या लेखासेवा विभागाचे सहाय्यक संचालक सुरेश कचरु बनसोडे यांची महापालिकेच्या मुख्यलेखा परीक्षक पदी नियुक्ती करण्यात येणार आहे़. मात्र आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नेमणूक म्हणजे भाजपाने वचक ठेवण्यासारखे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़. त्यामुळे ही नियुक्ती रद्द करुन घेण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरु आहे़. त्यानुसार पालिकेचे प्रभारी मुख्यालेखापरीक्षक अनिल बडगुजर यांनाच कायम ठेवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे़.  चिटणीस आणि लेखा विभाग स्थायी समितीच्या अखत्यारित असल्याने राज्य सरकारने अशापद्धतीने अधिकारी पाठविणे अयोग्य असल्याचे, सूर शिवसेनेने लावला आहे़. स्थायी समितीचे अधिकार डावलण्याचा हा प्रकार असल्याचा युक्तिवाद शिवसेना नेत्यांनी सुरु केला आहे़. या नियुक्तीला तीव्र विरोध करु, असा इशारा सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला आहे़ प्रतिनिधी चौकट बनसोडे यांना सूत्र नाहीच़़ मुख्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेले सुरेश बनसोडे यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये सूत्र स्वीकारायची आहेत़ मात्र शनिवारी ते पालिका मुख्यालयात आले होते़. परंतु आयुक्त त्यावेळी नसल्याने बनसोडे यांना सूत्र देण्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नकार दिला़ बनसोडे यांनी आज पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांना नकारच मिळाला़़ विधी समितीचे मत घेणार बाहेरील अधिकाऱ्याला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे़. ही स्थगिती उठविल्याचा दावा बनसोडे यांनी केला असल्याचे समजते़ मात्र पालिका प्रशासन याबाबत अद्याप संभ्रमातच आहे़. त्यामुळे याप्रकरणी विधी विभागाचे मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून समजते़ शिवसेना नेत्यांची आगपाखड महापालिकेतील प्रमुख पदे आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची नेमणूक राज्य सरकारच करीत असते़. त्यावर आता मुख्य लेखापरीक्षक नेमून सरकार आपल्याच अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवित आहे़. पालिकेतील अधिकारी सक्षम असून त्यांनाच पदोन्नती मिळायला हवी होती़ शिक्षण अधिकारी राज्य शासनाकडून पाठविण्यास सुरुवात करण्यात आली़ मात्र हा अधिकारी दोन दिवस मुंबईत तर चार दिवस पुण्यात अशी गत आहे़. अशाने पालिकेची कामं होणार कशी, बाहेरुन असे अधिकारी आल्यास पालिकेच्या स्वायत्तेचे काय, अशी आगपाखड स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी केली आहे़.