शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

राज्यात सरकारचे ट्विटर वॉर

By admin | Updated: July 17, 2016 00:54 IST

खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही

पुणे : खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर कसलेही नियंत्रण नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात काँग्रेस पक्ष याचा समाचार घेईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महागाई वाढत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण हवे ते त्यांना ठेवता येत नाही. तूरडाळीची किंमत वाढत आहे. अनेक मंत्र्यांची विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नाही हेच दिसते. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. त्यात या विषयांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत भाजपाकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. साध्वी प्राची, साक्षीमहाराज हे त्यांचे नेते काय बोलतात याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. त्यांची भाषणेही तेढ निर्माण करणारी आहेत. ती खपवून घेतली जातात व डॉ. नाईक यांच्यावर कारवाईची भाषा केली जाते हे बरोबर नाही. कारवाई करायची तर ती असे भडक बोलणाऱ्या सर्वांवरच करावी. ‘काँग्रेसमुक्त भारत’, ‘मुस्लीममुक्त भारत’ हे बोलणेही आक्षेपार्ह आहे, असे काँग्रेसचे मत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाकीर नाईक यांच्याबाबत अहवाल आला नव्हतामुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबतचा प्रतिकूल अहवाल आला होता, मात्र तत्कालीन सरकारने तो दाबून टाकला, या माजी पोलीस महासंचालक व भाजपाचे विद्यमान खासदार सत्यपाल यांच्या आरोपाची चव्हाण यांनी खिल्ली उडविली. मी व पृथ्वीराज चव्हाण असे दोघेही माजी मुख्यमंत्री इथे आहोत व असा कोणताही अहवाल आमच्याकडे आलेला नव्हता. निवृत्त झाल्यावर व भाजपाचा खासदार झाल्यानंतर त्यांना बरेच काही आठवत असेल, असे चव्हाण म्हणाले.महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय स्थानिक स्तरावर घेतला जाईल. त्यांच्या अहवालाचा विचार करूनच काँग्रेस काय ते ठरवेल. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्ण तयारीत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याची पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्याचे, शहराचे अध्यक्ष साह्य करतील. अशी पाच ते सहा प्रमुख नेत्यांची एक समिती निवडणुकीसंबंधीचे काम करेल. पुण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी आहे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस