शहरं
Join us  
Trending Stories
1
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
2
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
3
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
4
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
5
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
6
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
7
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
8
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
9
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
10
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
11
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
12
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
13
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
14
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
15
Delhi Blast : दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
16
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
17
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
18
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
19
नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी सुवर्णसंधी! ९०% कंपन्या 'या' पदावर प्रोफेशनल्सची करणार भरती
20
देवेंद्र फडणवीसांचं 'धक्कातंत्र'! उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर पुन्हा सोपवली जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सरकारचे ट्विटर वॉर

By admin | Updated: July 17, 2016 00:54 IST

खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही

पुणे : खाते बदलले तर परिषदेला उपस्थित राहात नाही, असे मंत्री म्हणतात व मुख्यमंत्री त्यांना टिष्ट्वट करून आदेश देतात. सरकारचे सध्या असे टिष्ट्वटर वॉर सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचे कोणत्याही मंत्र्यावर कसलेही नियंत्रण नाही, अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. विधिमंडळात काँग्रेस पक्ष याचा समाचार घेईल, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.महागाई वाढत आहे, जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर सरकारचे नियंत्रण हवे ते त्यांना ठेवता येत नाही. तूरडाळीची किंमत वाढत आहे. अनेक मंत्र्यांची विविध प्रकरणे बाहेर येत आहेत. यातून मुख्यमंत्र्यांचे सरकारवर नियंत्रण नाही हेच दिसते. काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांची बैठक आयोजित केली आहे. त्यात या विषयांवरून सरकारला धारेवर धरले जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले.डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबत भाजपाकडून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे. साध्वी प्राची, साक्षीमहाराज हे त्यांचे नेते काय बोलतात याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. त्यांची भाषणेही तेढ निर्माण करणारी आहेत. ती खपवून घेतली जातात व डॉ. नाईक यांच्यावर कारवाईची भाषा केली जाते हे बरोबर नाही. कारवाई करायची तर ती असे भडक बोलणाऱ्या सर्वांवरच करावी. ‘काँग्रेसमुक्त भारत’, ‘मुस्लीममुक्त भारत’ हे बोलणेही आक्षेपार्ह आहे, असे काँग्रेसचे मत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)झाकीर नाईक यांच्याबाबत अहवाल आला नव्हतामुस्लीम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांच्याबाबतचा प्रतिकूल अहवाल आला होता, मात्र तत्कालीन सरकारने तो दाबून टाकला, या माजी पोलीस महासंचालक व भाजपाचे विद्यमान खासदार सत्यपाल यांच्या आरोपाची चव्हाण यांनी खिल्ली उडविली. मी व पृथ्वीराज चव्हाण असे दोघेही माजी मुख्यमंत्री इथे आहोत व असा कोणताही अहवाल आमच्याकडे आलेला नव्हता. निवृत्त झाल्यावर व भाजपाचा खासदार झाल्यानंतर त्यांना बरेच काही आठवत असेल, असे चव्हाण म्हणाले.महापालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय स्थानिक स्तरावर घेतला जाईल. त्यांच्या अहवालाचा विचार करूनच काँग्रेस काय ते ठरवेल. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी काँग्रेस पूर्ण तयारीत आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी एका ज्येष्ठ नेत्याची पालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना त्या त्या जिल्ह्याचे, शहराचे अध्यक्ष साह्य करतील. अशी पाच ते सहा प्रमुख नेत्यांची एक समिती निवडणुकीसंबंधीचे काम करेल. पुण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जबाबदारी आहे. - अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस