शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
5
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
6
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
7
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
8
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
9
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
10
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
11
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
12
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
13
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
14
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
15
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
16
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
17
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
18
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
19
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
20
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

राज्य सरकार नरमले

By admin | Updated: March 26, 2017 03:45 IST

विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेची केलेली घोषणा आणि विधान परिषदेचे ठप्प पडलेले कामकाज

मुंबई : विरोधी पक्षांनी कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेची केलेली घोषणा आणि विधान परिषदेचे ठप्प पडलेले कामकाज यामुळे कोंडी झालेल्या राज्य सरकारने शनिवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १९ आमदारांचे निलंबन मागे घेण्याचे स्पष्ट संकेत दिले. विधिमंडळाचे कामकाज २९ मार्चला पुन्हा सुरू होणार आहे. त्या दिवशी विरोधकांनी सन्मानाने सभागृहात यावे. आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत  आम्ही सकारात्मक आहोत, असे  संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट  यांनी शनिवारी विधानसभेत निवेदनाद्वारे स्पष्ट केले.वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे १८ मार्चला अर्थसंकल्प सादर करीत असताना घातलेला गोंधळ व त्यानंतर अर्थसंकल्पाच्या प्रती जाळल्यामुळे काँग्रेसच्या ९ आणि राष्ट्रवादीच्या १० आमदारांचा ३१ डिसेंबरपर्यंत निलंबनाचा प्रस्ताव सरकारने मंजूरही करून घेतला होता. त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. (विशेष प्रतिनिधी) कोंडी फोडण्यासाठीच...कोंडी फोडण्यासाठी एक पाऊल मागे घेत निलंबन मागे घेण्याची भूमिका बापट यांनीच विधानसभेत मांडली. सभागृहाचे वातावरण निर्मळ आणि खेळीमेळीचे राहावे हेच सरकारचे मत असल्याचे ते म्हणाले.या आमदारांचे निलंबन दोन टप्प्यांत मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. २९ तारखेला काही आमदार तर अधिवेशन संपता संपता उर्वरित आमदारांचे निलंबन मागे घेतले जाईल, अशी शक्यता आहे.