शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
3
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
4
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
5
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
6
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
7
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
8
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
9
"त्याला उचकी आली आणि...", 'अशी ही बनवा बनवी'मधील शंतनूचं असं झालं निधन, पत्नीचा खुलासा
10
Prithvi Shaw: सपना गिल विनयभंग प्रकरणात न्यायालयाने पृथ्वी शॉला ठोठावला १०० रुपयांचा दंड!
11
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
12
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
13
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
14
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
15
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
16
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
17
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
18
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
19
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
20
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर

आहारासह पोषणासंदर्भात राज्य सरकारने अभ्यास करावा

By admin | Updated: June 26, 2016 03:09 IST

आदिवासींचे अन्न इतर भागांतल्या नागरिकांपेक्षा निराळे असते. त्यातील पोषकता आणि गरजही सारखी नसते, याचा विचार करून यासंदर्भात त्यांना मिळणाऱ्या अन्न आणि पोषकतेवर

ठाणे : आदिवासींचे अन्न इतर भागांतल्या नागरिकांपेक्षा निराळे असते. त्यातील पोषकता आणि गरजही सारखी नसते, याचा विचार करून यासंदर्भात त्यांना मिळणाऱ्या अन्न आणि पोषकतेवर अभ्यास करावा, अशा सूचना आपण राज्य सरकारला केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. तसेच आदिवासींसाठी बांधीलकी ठेवून काम करा. केवळ काहीतरी कर्तव्य पार पाडायचे म्हणून काम करू नका, असेही त्यांनी ठणकावले आहे.ठाणे जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात शनिवारी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या कार्यक्रमात ठाणे, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत आदिवासी हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी यासारख्या राबवण्यात येणाऱ्या योजनांचा शुभारंभ झाला. वनीचापाडा येथील आदिवासी महिला हिराबाई लक्ष्मण कांजडे यांना दीप प्रज्वलनाचा मान मिळाला. या वेळी न्या. कानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.घटनेने आदिवासींना दिलेल्या अधिकारांची पुरेपूर अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आग्रह धरून आदिवासी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, वकील तसेच विधी सेवा देणारे स्वयंसेवक यांची कमतरता असल्याने त्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. आदिवासी भागात होणारे कुपोषण, त्यांचे कायदेशीर हक्क, जमिनीचे प्रकार, शैक्षणिक समस्या यावर अधिक परिणामकारक मार्ग काढले गेले पाहिजे, यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे कानडे यांनी या वेळी सांगितले. . याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एस.के. कोतवाल आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव डी.एन. खेर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) त्याचबरोबर, आदिवासींना प्रथम त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी शिक्षित करण्यावर जोर दिला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत असताना त्याचे फायदे आदिवासींनादेखील मिळाले पाहिजे, असेही कानडे यांनी शेवटी सांगितले