शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आहारासह पोषणासंदर्भात राज्य सरकारने अभ्यास करावा

By admin | Updated: June 26, 2016 03:09 IST

आदिवासींचे अन्न इतर भागांतल्या नागरिकांपेक्षा निराळे असते. त्यातील पोषकता आणि गरजही सारखी नसते, याचा विचार करून यासंदर्भात त्यांना मिळणाऱ्या अन्न आणि पोषकतेवर

ठाणे : आदिवासींचे अन्न इतर भागांतल्या नागरिकांपेक्षा निराळे असते. त्यातील पोषकता आणि गरजही सारखी नसते, याचा विचार करून यासंदर्भात त्यांना मिळणाऱ्या अन्न आणि पोषकतेवर अभ्यास करावा, अशा सूचना आपण राज्य सरकारला केल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे यांनी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. तसेच आदिवासींसाठी बांधीलकी ठेवून काम करा. केवळ काहीतरी कर्तव्य पार पाडायचे म्हणून काम करू नका, असेही त्यांनी ठणकावले आहे.ठाणे जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात शनिवारी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या कार्यक्रमात ठाणे, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांत आदिवासी हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी यासारख्या राबवण्यात येणाऱ्या योजनांचा शुभारंभ झाला. वनीचापाडा येथील आदिवासी महिला हिराबाई लक्ष्मण कांजडे यांना दीप प्रज्वलनाचा मान मिळाला. या वेळी न्या. कानडे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.घटनेने आदिवासींना दिलेल्या अधिकारांची पुरेपूर अंमलबजावणी झालीच पाहिजे, असा आग्रह धरून आदिवासी लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्यासाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्था, वकील तसेच विधी सेवा देणारे स्वयंसेवक यांची कमतरता असल्याने त्यांनी या वेळी नाराजी व्यक्त केली. आदिवासी भागात होणारे कुपोषण, त्यांचे कायदेशीर हक्क, जमिनीचे प्रकार, शैक्षणिक समस्या यावर अधिक परिणामकारक मार्ग काढले गेले पाहिजे, यासाठी पावले उचलण्याची गरज असल्याचे कानडे यांनी या वेळी सांगितले. . याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एस.के. कोतवाल आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. गव्हाणे, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण सचिव डी.एन. खेर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) त्याचबरोबर, आदिवासींना प्रथम त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी शिक्षित करण्यावर जोर दिला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण होत असताना त्याचे फायदे आदिवासींनादेखील मिळाले पाहिजे, असेही कानडे यांनी शेवटी सांगितले