शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी नव्या गाईडलाईनच्या विचारात राज्य सरकार

By admin | Updated: July 13, 2017 13:29 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवी मार्गदर्शकतत्त्वं तयार करण्याच्या विचारात आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13-  शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवी मार्गदर्शकतत्त्वं तयार करण्याच्या विचारात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात ३४ हजार २२ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती, या कर्जमाफीमुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष सादर केले होते. 
 
2008 मध्ये आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाला होता, असा आरोप याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 
 
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीचा फायदा लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्य सरकार नवी मार्गदर्शकतत्त्वं
तयार करण्याच्या विचारात आहे, असं राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं आहे. या नव्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये कर्जमाफीचा लाभार्थी, त्याच्या थकीत कर्जाची मोजणी, तसंच कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विविध बँकाना एकाच प्लॅटफॉर्मवर कसं आणायचं, या सगळ्या बाबींचा समावेश असेल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी कर्जमाफीची योजना नऊ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये काही त्रूटी असून कॅगनेही त्याबद्दल गंभीर अहवाल दिला होता.  
आणखी वाचा
 

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

सलमानला सायकलिंगचे स्टंट शिकवणा-या अजय पडवळचा मृत्यू

पुणे - डेक्कन क्वीन अडवणा-या महिला प्रवाशी "राष्ट्रद्रोही", रेल्वेचा अजब कारभार

नव्या तत्त्वांमध्ये शेतकऱ्याची व्याख्या, कर्जमाफीच्या योजनेत कोणत्या प्रकारचं कर्ज सामाविष्ट असेल तसंच विभक्त कुटुंबासाठी काय नियम असतील. या संदर्भातील माहिती नव्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये असणार आहे. 

2008 मध्ये आघाडी सरकारने कर्जमाफी केली होती पण लाभार्थी शेतकरी नेमके कोणते याबद्दलची स्पष्टता देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांचंही कर्ज माफ झालं होतं. म्हणूनच त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती शेतकऱ्यांसंदर्भातील माहिती पुरवावी अशी मागणी बँकांनी केली. या माहितीनुसार पात्र आणि अपात्र शेतकरी ठरवणं बँकांना सोप जाणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
आधी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या काळात शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला होता. पण त्यानंतर तारीख वाढवून जून 2017 पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.