शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

... तर राज्य सरकार मागासलेलेच!

By admin | Updated: March 7, 2017 04:16 IST

पोलिसांना अद्ययावत शस्त्रास्त्रे द्या, असा आदेश वारंवार देऊनही पोलीस अजून जुन्या काळातील शस्त्रे वापरून संरक्षण करत आहेत.

मुंबई : पोलिसांना अद्ययावत शस्त्रास्त्रे द्या, असा आदेश वारंवार देऊनही पोलीस अजून जुन्या काळातील शस्त्रे वापरून संरक्षण करत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाबाबत दुनिया आघाडीवर आहे, तर राज्य सरकार आजही मागासलेले आहे, अशी खंत उच्च न्यायालयाने व्यक्त केली.हवालदारांकडे शस्त्र नसल्याने त्यांच्यावर कोणीही येऊन हल्ला करतात. त्यांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे, अशी राज्याच्या पोलिसांची परिस्थिती आहे. कोणीही या परिस्थितीचा आढावा घ्यायला तयार नाही. आम्ही यासंदर्भात वारंवार आदेश देऊनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त करत म्हटले. पुण्याच्या अश्विनी राणे यांनी त्यांचे पती निखील राणे यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. राणे यांची हत्या २३ नोव्हेंबर २००९ रोजी गोळ्या झाडून करण्यात आली. स्थानिक पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याने अश्विनी राणे यांनी या केसचा तपास सीबीआयकडे करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सीबीआयही याप्रकरणाचा तपास करण्यामध्ये अपयशी ठरली. त्यामुळे उच्च न्यायालयाने पोलीस दलातील त्रुटी दूर करण्यासाठी ही याचिका निकाली न काढता याचिकेची व्याप्ती वाढवली.सोमवारच्या सुनावणीत खंडपीठाने राज्य सरकारच्या कारभारावर असमाधान व्यक्त केले. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांचा अन्य देशांत कशाप्रकारे तपास करण्यात येतो, हे राज्य सरकारने पहावे. ते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेच्या आधारे तपास करतात. राज्य सरकारने बोटांच्या ठशांची बँक तयार केली पाहिजे. गंभीर गुन्ह्याच्या तपासावेळी हे उपयोगी पडेल. पोलिसांच्या ढिसाळ तपासामुळे खरे गुन्हेगारही संशयाचा फायदा घेत सुटतात आणि ते आणखी गुन्हे करतात. पोलिसांच्या नाशिक अ‍ॅकेडमीमध्ये अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण द्या, असे खंडपीठाने घेत म्हटले. (प्रतिनिधी)>दहशतवाद, हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास जुन्या पद्धतीने न करता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन करावा. आम्हाला हे म्हणायला अत्यंत खेद वाटतो की अन्य देश तपाससाठी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असताना महाराष्ट्र आणि अन्य राज्य याबाबत मागास आहेत- मुंबई उच्च न्यायालय