शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

राज्य शासन मागासवर्गीय विरोधी - शिवाजीराव मोघे

By admin | Updated: November 7, 2016 02:24 IST

राज्य शासन मागासर्गीय आणि त्यांच्या समस्यांबाबत प्रचंड असंवेदनशील असल्याचा आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे केला

खामगाव (बुलडाणा) दि. 6 - राज्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील सरकार सत्तेत आल्यापासून दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्यावरील अन्यात वाढ होत आहे. इतकेच नव्हे तर गेल्या दोन वर्षांमध्ये मागासवर्गीयांवरील झालेल्या अन्यायाबाबत न्याय देण्यासाठीही या शासनाकडून दप्तर दिरंगाई केली जात आहे. थोडक्यात राज्य शासन मागासर्गीय आणि त्यांच्या समस्यांबाबत प्रचंड असंवेदनशील असल्याचा आरोप माजी सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे केला.
 पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आश्रम शाळेत चिमुकल्या मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, रविवारी पाळा येथील आश्रमशाळेला भेट देत, आश्रम शाळेतील विदारकता दृष्टीपथास घातली. यावेळी  प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांनी भेट घेतली असता, त्यांनी आश्रम शाळेतील निरअपराध मुलीवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या प्रकरणी कायदेशीर प्रकीया सुरू असली तरी, ही प्रक्रीया लांबलचक असल्याने, आदिवासी चिमुकलीला मिळणाºया न्यायाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी यासारखेच  प्रकरण उघडीस आल्यानंतर कायदेशीर प्रक्रीयेला विलंब झाल्याने, संबधीत पिडीतेला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. अत्याचार करणाºयाला जात-धर्म-पंथ नसला तरी, शासनाकडून काही जणांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.  वस्तुस्थितीत कायद्यासमोर सर्वच समान आहेत. मात्र, शासनाकडून काही सामाजिक नतद्रष्टांना आणि असंवेदशील मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे प्रयत्न होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याकांमध्ये कमालिची असुरक्षीत भावना आहे. त्यामुळे  राज्यात या सरकारच्या काळात निघताहेत तितक्या मोठ्या प्रमाणात कधीही कोणत्याही समाजाने मोर्चे काढले नाहीत. विविध समुदायाचे राज्यभर मोठ्याप्रमाणात निघणारे मोर्चे हेच सरकारचे अपयश सिद्ध करीत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. 
 
तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा  
राज्यात भाजप-सेना युतीचे शासन असले तरी, या शासनाच्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून येते. भाजपचा मित्र पक्ष शिवसेनाही या शासनाच्या विरोधात भूमिका घेते. बेजबाबदार आणि असंवेदनशील मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. नव्हे तर, आपल्याच पक्षाच्या आणि नाईलाजाने मित्रपक्षाच्या बेजबाबदार मंत्र्यांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री हतबल असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या शासनातील निष्क्रीय मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरत असतील तर त्यांनी सपशेल राजीनामा द्यावा, असा स्पष्ट सल्लाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला.