शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

राज्याला वीज दरवाढीचा झटका!

By admin | Updated: November 5, 2016 08:28 IST

राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

पुणे/मुंबई : राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. यंदा १.४९ टक्के दरवाढ होणार असून, १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सुधारित वीज दरानुसार डिसेंबरचे बिल आकारले जाणार आहे.विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ करण्यास महावितरणला परवानगी दिली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांवर चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९ हजार १४९ कोटी रुपयांच्या दरवाढीचा बोजा पडेल, तर वाणिज्य ग्राहकांच्या दरात अल्प घट होईल. या वर्षी १.४९ टक्के तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साली अनुक्रमे २, १.२०, १.२७ टक्के अशी दरवाढ होईल. आर्थिक वर्षांत नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ अखेरीपर्यंत दरात प्रति युनिट २ ते ४ पैशांची वाढ होणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. स्थिर बिल आकार ५०वरून ५५ रुपये तर थ्री फेज वीज जोड असलेल्या ग्राहकांच्या स्थिर आकारात दीडशेवरून १६० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांसाठीच्या दरांमध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी (पान २ वर) (पान १ वरून) सुधारित वीजदर सरासरी पुरवठा खर्चाच्या केवळ ५० टक्क्यांहून थोडा अधिक असणार आहे. तथापि अद्यापही सुमारे ३६ टक्के कृषी ग्राहकांनी मीटर बसवलेले नाहीत. मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला गती यावी याकरिता मीटर बसवलेले नाहीत; अशा कृषी पंपांकरिता, विशेषत: ज्यांच्या जोडण्यांचा भार ७.५ एचपी पेक्षा अधिक आहे. त्यांच्या वीजदरात आयोगाने वाढ केली आहे. आयोगाने मागणी आकारात (डिमांड चार्जेस) अल्पशी वाढ केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>९ हजार १४९ कोटींची दरवाढमहावितरणने २०१४-१५साठी अचूक समायोजन व २०१५-१६मध्ये तात्पुरते समायोजन, तर २०१६ ते २०२० या अर्थिक वर्षांसाठी ५६ हजार ३७२ कोटी रुपयांची वीजदरवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी २८ हजार ५२२ कोटी रुपयांची दरवाढ मान्य करण्यात आली. परंतु महावितरणने इंधन समायोजनापासूनचे १९ हजार ३७३ कोटी रुपये महसुलात दाखविले नव्हते. त्यामुळे महावितरणने पुढील चार वर्षांत ९ हजार १४९ कोटी रुपयांची दरवाढ लागू करण्यास मान्यता दिली आहे. >महावितरणच्या वीज दरात वाढ झाली असली तरी सर्व सामान्य वीज ग्राहकांचा आयोगाने विचार केला आहे. कृषीक्षेत्र वगळता उद्योग आणि घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. विशेषत: उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला असून, प्रत्येक वर्षांत निवासी ग्राहकांच्या (दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसहित) सरासरी आकारणी दरात १.० ते १.३ टक्क्यांच्या मर्यादेत अल्पशी वाढ करण्यात आली आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ>शिवाय उद्योगासाठी ऊर्जा आकार (एनर्जी चार्जेस) कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या चार वर्षांमध्ये उच्च दाब आणि लघू दाब उद्योगांच्या एकूण सरासरी आकारणी दरामध्ये अल्पशी म्हणजे सुमारे ०.४ ते ०.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. >भरपूर वीज उपलब्धआयोगाने वीज खरेदीचे परिमाण व खर्चास मंजुरी दिली आहे. चालू वर्षी सुमारे २५ हजार दशलक्ष युनिट्स वीज उपलब्ध होईल. आणि यात २०१९-२० या वर्षाच्या अखेरीस ४२ हजार दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढ होईल.