शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला वीज दरवाढीचा झटका!

By admin | Updated: November 5, 2016 08:28 IST

राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

पुणे/मुंबई : राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. यंदा १.४९ टक्के दरवाढ होणार असून, १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सुधारित वीज दरानुसार डिसेंबरचे बिल आकारले जाणार आहे.विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ करण्यास महावितरणला परवानगी दिली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांवर चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९ हजार १४९ कोटी रुपयांच्या दरवाढीचा बोजा पडेल, तर वाणिज्य ग्राहकांच्या दरात अल्प घट होईल. या वर्षी १.४९ टक्के तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साली अनुक्रमे २, १.२०, १.२७ टक्के अशी दरवाढ होईल. आर्थिक वर्षांत नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ अखेरीपर्यंत दरात प्रति युनिट २ ते ४ पैशांची वाढ होणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. स्थिर बिल आकार ५०वरून ५५ रुपये तर थ्री फेज वीज जोड असलेल्या ग्राहकांच्या स्थिर आकारात दीडशेवरून १६० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांसाठीच्या दरांमध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी (पान २ वर) (पान १ वरून) सुधारित वीजदर सरासरी पुरवठा खर्चाच्या केवळ ५० टक्क्यांहून थोडा अधिक असणार आहे. तथापि अद्यापही सुमारे ३६ टक्के कृषी ग्राहकांनी मीटर बसवलेले नाहीत. मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला गती यावी याकरिता मीटर बसवलेले नाहीत; अशा कृषी पंपांकरिता, विशेषत: ज्यांच्या जोडण्यांचा भार ७.५ एचपी पेक्षा अधिक आहे. त्यांच्या वीजदरात आयोगाने वाढ केली आहे. आयोगाने मागणी आकारात (डिमांड चार्जेस) अल्पशी वाढ केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>९ हजार १४९ कोटींची दरवाढमहावितरणने २०१४-१५साठी अचूक समायोजन व २०१५-१६मध्ये तात्पुरते समायोजन, तर २०१६ ते २०२० या अर्थिक वर्षांसाठी ५६ हजार ३७२ कोटी रुपयांची वीजदरवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी २८ हजार ५२२ कोटी रुपयांची दरवाढ मान्य करण्यात आली. परंतु महावितरणने इंधन समायोजनापासूनचे १९ हजार ३७३ कोटी रुपये महसुलात दाखविले नव्हते. त्यामुळे महावितरणने पुढील चार वर्षांत ९ हजार १४९ कोटी रुपयांची दरवाढ लागू करण्यास मान्यता दिली आहे. >महावितरणच्या वीज दरात वाढ झाली असली तरी सर्व सामान्य वीज ग्राहकांचा आयोगाने विचार केला आहे. कृषीक्षेत्र वगळता उद्योग आणि घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. विशेषत: उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला असून, प्रत्येक वर्षांत निवासी ग्राहकांच्या (दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसहित) सरासरी आकारणी दरात १.० ते १.३ टक्क्यांच्या मर्यादेत अल्पशी वाढ करण्यात आली आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ>शिवाय उद्योगासाठी ऊर्जा आकार (एनर्जी चार्जेस) कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या चार वर्षांमध्ये उच्च दाब आणि लघू दाब उद्योगांच्या एकूण सरासरी आकारणी दरामध्ये अल्पशी म्हणजे सुमारे ०.४ ते ०.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. >भरपूर वीज उपलब्धआयोगाने वीज खरेदीचे परिमाण व खर्चास मंजुरी दिली आहे. चालू वर्षी सुमारे २५ हजार दशलक्ष युनिट्स वीज उपलब्ध होईल. आणि यात २०१९-२० या वर्षाच्या अखेरीस ४२ हजार दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढ होईल.