शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
6
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
7
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
8
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
9
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
10
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
11
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
12
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
13
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
14
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
15
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
16
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
17
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
18
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
19
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
20
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न

राज्याला वीज दरवाढीचा झटका!

By admin | Updated: November 5, 2016 08:28 IST

राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे.

पुणे/मुंबई : राज्यातील जनतेला महावितरणने वीज दरवाढीचा झटका दिला आहे. घरगुती वीजबिल पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढणार आहे. यंदा १.४९ टक्के दरवाढ होणार असून, १ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या सुधारित वीज दरानुसार डिसेंबरचे बिल आकारले जाणार आहे.विद्युत नियामक आयोगाने वीज दरात वाढ करण्यास महावितरणला परवानगी दिली आहे. त्यानुसार घरगुती ग्राहकांवर चार वर्षांत टप्प्याटप्प्याने ९ हजार १४९ कोटी रुपयांच्या दरवाढीचा बोजा पडेल, तर वाणिज्य ग्राहकांच्या दरात अल्प घट होईल. या वर्षी १.४९ टक्के तर २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साली अनुक्रमे २, १.२०, १.२७ टक्के अशी दरवाढ होईल. आर्थिक वर्षांत नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७ अखेरीपर्यंत दरात प्रति युनिट २ ते ४ पैशांची वाढ होणार असून, पुढील तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येईल. स्थिर बिल आकार ५०वरून ५५ रुपये तर थ्री फेज वीज जोड असलेल्या ग्राहकांच्या स्थिर आकारात दीडशेवरून १६० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. कृषी ग्राहकांसाठीच्या दरांमध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी (पान २ वर) (पान १ वरून) सुधारित वीजदर सरासरी पुरवठा खर्चाच्या केवळ ५० टक्क्यांहून थोडा अधिक असणार आहे. तथापि अद्यापही सुमारे ३६ टक्के कृषी ग्राहकांनी मीटर बसवलेले नाहीत. मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला गती यावी याकरिता मीटर बसवलेले नाहीत; अशा कृषी पंपांकरिता, विशेषत: ज्यांच्या जोडण्यांचा भार ७.५ एचपी पेक्षा अधिक आहे. त्यांच्या वीजदरात आयोगाने वाढ केली आहे. आयोगाने मागणी आकारात (डिमांड चार्जेस) अल्पशी वाढ केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)>९ हजार १४९ कोटींची दरवाढमहावितरणने २०१४-१५साठी अचूक समायोजन व २०१५-१६मध्ये तात्पुरते समायोजन, तर २०१६ ते २०२० या अर्थिक वर्षांसाठी ५६ हजार ३७२ कोटी रुपयांची वीजदरवाढ देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यापैकी २८ हजार ५२२ कोटी रुपयांची दरवाढ मान्य करण्यात आली. परंतु महावितरणने इंधन समायोजनापासूनचे १९ हजार ३७३ कोटी रुपये महसुलात दाखविले नव्हते. त्यामुळे महावितरणने पुढील चार वर्षांत ९ हजार १४९ कोटी रुपयांची दरवाढ लागू करण्यास मान्यता दिली आहे. >महावितरणच्या वीज दरात वाढ झाली असली तरी सर्व सामान्य वीज ग्राहकांचा आयोगाने विचार केला आहे. कृषीक्षेत्र वगळता उद्योग आणि घरगुती वीज ग्राहकांना दिलासा देण्यात आला आहे. विशेषत: उद्योग क्षेत्राला दिलासा देण्यात आला असून, प्रत्येक वर्षांत निवासी ग्राहकांच्या (दारिद्र्यरेषेखालील ग्राहकांसहित) सरासरी आकारणी दरात १.० ते १.३ टक्क्यांच्या मर्यादेत अल्पशी वाढ करण्यात आली आहे.- प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ>शिवाय उद्योगासाठी ऊर्जा आकार (एनर्जी चार्जेस) कमी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. येत्या चार वर्षांमध्ये उच्च दाब आणि लघू दाब उद्योगांच्या एकूण सरासरी आकारणी दरामध्ये अल्पशी म्हणजे सुमारे ०.४ ते ०.५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. >भरपूर वीज उपलब्धआयोगाने वीज खरेदीचे परिमाण व खर्चास मंजुरी दिली आहे. चालू वर्षी सुमारे २५ हजार दशलक्ष युनिट्स वीज उपलब्ध होईल. आणि यात २०१९-२० या वर्षाच्या अखेरीस ४२ हजार दशलक्ष युनिट्सपर्यंत वाढ होईल.