शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

राज्यातील डॉक्टर सुरक्षितच!

By admin | Updated: June 22, 2016 04:11 IST

रुग्णांच्या मारहाण करणाऱ्या नातेवाइकांपासून डॉक्टरांना संरक्षण देण्याकरिता पुरेशी उपाययोजना आखण्यात आल्याचा दावा मंगळवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला.

मुंबई : रुग्णांच्या मारहाण करणाऱ्या नातेवाइकांपासून डॉक्टरांना संरक्षण देण्याकरिता पुरेशी उपाययोजना आखण्यात आल्याचा दावा मंगळवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात केला. त्यावर उच्च न्यायालयाने मुंबईतील रुग्णालयांमध्ये किती पोलीस नेमण्यात आले आहेत, याची तपशीलवार माहिती २८ जूनपर्यंत देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातून काही सुरक्षारक्षकांची भरती करण्यात येईल. या सुरक्षारक्षकांना पोलिसांप्रमाणेच अटक करण्याचा अधिकार देण्यात येईल. रुग्णालयात कोणी शस्त्र घेऊन जात असेल तर हे सुरक्षारक्षक संबंधित व्यक्तीला अटक करू शकतात, अशी माहिती अ‍ॅड. देव यांनी खंडपीठाला दिली.मात्र मार्डने डॉक्टरांना करण्यात येणाऱ्या मारहाणीवर काय उपाय काढण्यात आला, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली. त्यावर खंडपीठाने सरकारचे या मुद्द्याकडे लक्ष वेधत डॉक्टरांनाही सुरक्षा पुरवण्याचा विचार करा, अशी सूचना सरकारला केली.अ‍ॅड. देव यांनी यावरील उपाय सुचवत म्हटले की, रुग्णालयाच्या जवळपास असलेल्या पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याचे सीसीटीव्हीवर लक्ष असणार आहे. त्यामुळे रुग्णालयात काही अप्रिय घटना घडली तर पोलीस तत्काळ तिथे मदतीसाठी पोचतील. त्याशिवाय रुग्णांना भेटायला येणाऱ्या नातेवाइकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात येणार आहे. त्यामुळे डॉक्टरांना मारहाण करण्याचे प्रकार कमी घडतील. त्यावर खंडपीठाने आतापर्यंत मुंबईतील किती रुग्णालयांत पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, याची तपशीलवार माहिती २८ जूनपर्यंत देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. सामाजिक कार्यकर्ते अफाक मांडविया यांनी मार्डने एप्रिलमध्ये पुकारलेल्या संपाविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीत डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. (प्रतिनिधी)