मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेचा कौल स्पष्टपणे विरोधात गेल्याने हादरलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतही चिंतनाचा अध्याय सुरू झाला आहे. पराभवावरून आरोप-प्रत्यारोप आणि मीमांसेचे जे पडसाद उमटत आहेत, त्याची धार तीव्र असल्याचे गुरुवारच्या राजकीय घडामोडींनी अधोरेखित झाले. मुख्यमंत्र्यांच्या पराभवाविषयीच्या आढावा बैठकीकडे नारायण राणे यांनी पाठ फिरवली. पण नंतर ते मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र भेट घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर थडकले. त्याचवेळी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहत विधानसभेसाठी एकदिलाने लढण्याचा संकल्प सोडला. अपयशाच्या धक्क्यातून सावरण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी आणि मनसेने मुंबईतील सभांचे आयोजन सुरू केले आहे. अब की बार, राज सरकार मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यात यावे. नरेंद्र मोदींच्या धर्तीवर ‘अब की बार, राज सरकार’चा नारा देत निवडणुकांना सामोरे जाण्याची मागणी मनसेच्या नेत्यांनी राज यांच्या अनुपस्थितीत झालेल्या पक्षमेळाव्यात केली.
राज्यात पराभवाचा ‘चिंतन’वार
By admin | Updated: May 23, 2014 04:10 IST