शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य, केंद्राचा कारभार संवेदनशून्य : महाडिक

By admin | Updated: April 22, 2017 01:17 IST

संघर्ष यात्रा तयारी बैठक : कर्जमाफी झाली नाही तर राज्यातील बँका बुडतील : मुश्रीफ

कोल्हापूर : कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत का? याची खात्री विरोधक देणार का? असे संवेदनशून्य प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्य व केंद्र सरकारचा कारभार हा संवेदनशून्य असून साखर उद्योगाला अडचणीत आणणारेच धोरण ते राबवत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते संघर्षयात्रेसाठी कोल्हापूरात येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देशात ४७ लाख टन साखर शिल्लक असतानाही कच्ची साखर आयात विनाशुल्क केली. केंद्र सरकारचे या मागील गौडबंगाल तरी काय? हेच समजत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या झटक्यात कर्जमाफी केली, पण देवेंद्र फडणवीस यांना अशी सुबुद्धी का सूचत नाही, असा सवाल करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कर्जमाफी झाली नाहीतर बँका बुडतील. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तर ‘हुतात्मा’ सूतगिरणीला ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल के. पी. पाटील व पंडितराव केणे यांचा सत्कार करण्यात आला. महापौर हसीना फरास, आ. संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, युवराज पाटील, भैया माने, सर्जेराव पाटील-गवशीकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मधुकर जांभळे, संगीता खाडे आदी उपस्थित होते. पासवानना समजते का ?साखर उद्योगातील धोरणाबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर ऊस न लावता पाम लावण्याचा सल्ला दिला. उसाबाबत एकूण केंद्र सरकार नकारात्मक भूमिकेत असून पासवान यांना शेतीतील समजते का, अशी शंका येते असे महाडिक यांनी सांगितले. चंद्रकांतदादांचे आभारकर्जमाफीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सकारात्मक असल्याबद्दल त्यांचे आभार, पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा. शेतकरी डोळे लावून कर्जमाफीकडे बसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ‘गणदेवी’ दराच्या अभ्यासासाठी समितीगुजरात येथील गणदेवी साखर कारखान्याने पाच हजार रुपये प्रतिटन दर दिला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, तज्ज्ञ शेतकरी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची समिती तयार करणार आहे, त्यांच्याकडून विस्तृत अहवाल तयार करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.