शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

राज्य, केंद्राचा कारभार संवेदनशून्य : महाडिक

By admin | Updated: April 22, 2017 01:17 IST

संघर्ष यात्रा तयारी बैठक : कर्जमाफी झाली नाही तर राज्यातील बँका बुडतील : मुश्रीफ

कोल्हापूर : कर्जमाफी केली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत का? याची खात्री विरोधक देणार का? असे संवेदनशून्य प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. राज्य व केंद्र सरकारचा कारभार हा संवेदनशून्य असून साखर उद्योगाला अडचणीत आणणारेच धोरण ते राबवत असल्याची टीका खासदार धनंजय महाडिक यांनी केली. कर्जमाफीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षांचे नेते संघर्षयात्रेसाठी कोल्हापूरात येत आहेत, त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देशात ४७ लाख टन साखर शिल्लक असतानाही कच्ची साखर आयात विनाशुल्क केली. केंद्र सरकारचे या मागील गौडबंगाल तरी काय? हेच समजत नसल्याचे महाडिक यांनी सांगितले. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्या झटक्यात कर्जमाफी केली, पण देवेंद्र फडणवीस यांना अशी सुबुद्धी का सूचत नाही, असा सवाल करत आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कर्जमाफी झाली नाहीतर बँका बुडतील. माजी आमदार के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सरचिटणीस अनिल साळोखे यांनी केले. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तर ‘हुतात्मा’ सूतगिरणीला ‘सहकार भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल के. पी. पाटील व पंडितराव केणे यांचा सत्कार करण्यात आला. महापौर हसीना फरास, आ. संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, युवराज पाटील, भैया माने, सर्जेराव पाटील-गवशीकर, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मधुकर जांभळे, संगीता खाडे आदी उपस्थित होते. पासवानना समजते का ?साखर उद्योगातील धोरणाबाबत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतल्यानंतर ऊस न लावता पाम लावण्याचा सल्ला दिला. उसाबाबत एकूण केंद्र सरकार नकारात्मक भूमिकेत असून पासवान यांना शेतीतील समजते का, अशी शंका येते असे महाडिक यांनी सांगितले. चंद्रकांतदादांचे आभारकर्जमाफीबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील सकारात्मक असल्याबद्दल त्यांचे आभार, पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर निर्णय घ्यावा. शेतकरी डोळे लावून कर्जमाफीकडे बसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. ‘गणदेवी’ दराच्या अभ्यासासाठी समितीगुजरात येथील गणदेवी साखर कारखान्याने पाच हजार रुपये प्रतिटन दर दिला आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक, तज्ज्ञ शेतकरी व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींची समिती तयार करणार आहे, त्यांच्याकडून विस्तृत अहवाल तयार करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.