शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आजपासून अकरावीची तिसरी विशेष फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2016 05:13 IST

शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे.

मुंबई : अकरावीच्या तिसऱ्या विशेष फेरीला शनिवारपासून सुरुवात होत असून शुक्रवारी संपलेल्या दुसऱ्या विशेष फेरीत एकूण १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी प्रवेश बदलला आहे. दरम्यान, तिसऱ्या विशेष फेरीसाठी महाविद्यालय, शाखा आणि विषय बदलू इच्छिणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करावे लागणार आहेत.शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या विशेष फेरीमध्ये एकूण २२ हजार २७३ विद्यार्थ्यांना प्रवेश बदलाची संधी दिली होती. त्यातील १६ हजार २४ विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत महाविद्यालय बदलाचा निर्णय घेतला. उरलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या विशेष फेरीचे आयोजन शनिवारपासून केलेले आहे. २७, २९ आणि ३० आॅगस्ट रोजी इच्छुक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केंद्रांवर नव्याने लॉगइन आयडी आणि पासवर्ड घेता येईल. तर २९ आणि ३० आॅगस्ट रोजी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज करता येईल. तिसऱ्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाईल.तिसऱ्या विशेष फेरीतही विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरताना किमान १० आणि कमाल १५ महाविद्यालयांना पसंतीक्रम देणे बंधनकारक आहे. गुणवत्ता यादीत नाव जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात १ ते २ सप्टेंबरदरम्यान प्रवेश निश्चित करायचा आहे. तरी अर्जात पसंतीक्रम दर्शवणाऱ्या संबंधित महाविद्यालयांतील रिक्त जागांची संख्या पाहूनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)