शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

आजपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू

By admin | Updated: June 13, 2016 23:14 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून (मंगळवार) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण सर्वांना प्रवेश मिळणार असून,

अहमदनगर : जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयात आजपासून (मंगळवार) अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. तब्बल महिनाभर चालणाऱ्या या प्रक्रियेत दहावी उत्तीर्ण सर्वांना प्रवेश मिळणार असून, यंदाही प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका मोफत देण्याचे आदेश आहेत. अकरावी प्रवेशाबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी प्राचार्यांची बैठक बोलावली होती. त्यात अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ‘माध्यमिक’चे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य बैठकीला उपस्थित होते. प्रवेश अर्ज स्वीकृती, गुणवत्ता यादी प्रसिद्धी, त्यावर आक्षेप, प्रतीक्षा यादी, त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात येणार आहेत. अनुदानित तुकड्यांचे सर्व प्रवेश झाल्यानंतरच विनाअनुदानितचे प्रवेश सुरू होतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.शासन निर्णयाप्रमाणे प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका यांचे कोणतेही शुल्क महाविद्यालयांनी आकारू नये, कोणत्याही परिस्थितीत जादा प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आढळल्यास संबंधित महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सक्त सूचनाही माध्यमिक विभागाने दिल्या आहेत. १३ जुलैपर्यंत सर्व प्रवेश प्रकिया पूर्ण करून १४ जुलैपासून अकरावीच्या सर्व शाखांचे वर्ग सुरू होतील. (प्रतिनिधी)