शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला 

By समीर देशपांडे | Updated: November 24, 2022 12:27 IST

या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.

समीर देशपांडे -

कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एका वकिलाने गायरानात केलेल्या अतिक्रमणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरमधून वात लागली आणि राज्यातील गायराने पेटली, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

हलसवडे येथील तानाजी अशोक पाटील यांनी गावच्या गायरानामध्ये ॲड. रावसाो बंडू पाटील यांनी अतिक्रमण करून १५०० चौरस फुटाचे दोन मजली घर बांधण्यास सुरुवात केली असून हे बांधकाम थांबवावे, अशी तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ मे २०२२ रोजी केली. याचवेळी त्यांनी जिल्हा आणि उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार दिल्याने ११ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्राने निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणारे पत्र जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार करवीर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अहवालानुसार काम थांबविले. या जागेच्या मोजणीसाठी ग्रामपंचायतीने ९ हजार रुपये भरलेही आहेत; परंतु अजून मोजणी झाली नाही. त्याचदरम्यान ३० जून २०२२ रोजी उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करतानाच १८ जुलै २२ रोजी सुनावणी ठेवली आणि त्यावेळी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या गायरानातील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढण्याचे आदेश दिले.

हे उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय