शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

कोल्हापूरमधून लागली वात, उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला 

By समीर देशपांडे | Updated: November 24, 2022 12:27 IST

या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले.

समीर देशपांडे -

कोल्हापूर : जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हलसवडे येथे एका वकिलाने गायरानात केलेल्या अतिक्रमणाच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच उच्च न्यायालयाने संपूर्ण राज्यातीलच अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोल्हापूरमधून वात लागली आणि राज्यातील गायराने पेटली, अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

हलसवडे येथील तानाजी अशोक पाटील यांनी गावच्या गायरानामध्ये ॲड. रावसाो बंडू पाटील यांनी अतिक्रमण करून १५०० चौरस फुटाचे दोन मजली घर बांधण्यास सुरुवात केली असून हे बांधकाम थांबवावे, अशी तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १७ मे २०२२ रोजी केली. याचवेळी त्यांनी जिल्हा आणि उच्च न्यायालयातही जनहित याचिका दाखल केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयातही तक्रार दिल्याने ११ एप्रिल २०२२ रोजीच्या पत्राने निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करणारे पत्र जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार करवीर तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी अहवालानुसार काम थांबविले. या जागेच्या मोजणीसाठी ग्रामपंचायतीने ९ हजार रुपये भरलेही आहेत; परंतु अजून मोजणी झाली नाही. त्याचदरम्यान ३० जून २०२२ रोजी उच्च न्यायालयातील सुनावणीवेळी न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करतानाच १८ जुलै २२ रोजी सुनावणी ठेवली आणि त्यावेळी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या गायरानातील अतिक्रमणे ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत काढण्याचे आदेश दिले.

हे उघड्या डोळ्यांनी नाही पाहू शकत या सुनावणीवेळीच निर्णय देताना, ‘गायरानांमधील अतिक्रमणांबाबत जे काही सर्रासपणे कायद्याचे उल्लंघन चालले आहे. ते डोळे बंद करून पाहू शकत नाही’ अशा शब्दांत नाराजी व्यक्त करून राज्यातील सर्वच गायरानांतील अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय