शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आजपासून हत्ती पकड मोहीम

By admin | Updated: February 9, 2015 01:14 IST

प्रतीक्षा संपली : प्रशिक्षित हत्ती दाखल; वनकर्मचाऱ्यांसह पोलीस पथक सज्ज

सावंतवाडी / माणगाव : गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली हत्ती पकड मोहीम अखेर आज, सोमवारपासून प्रत्यक्षात माणगाव खोऱ्यात सुरू होणार आहे. यासाठी सिंधुदुर्ग वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ५० पोलिसांचे पथक सज्ज झाले आहे, अशी माहिती उपवनसंंरक्षक एस. रमेशकुमार यांनी पत्रकारांना दिली. ते सावंतवाडी उपवनसंरक्षक कार्यालयात बोलत होते. यावेळी सहायक उपवनसंरक्षक प्रकाश बागेवाडी, वनक्षेत्रपाल संजय पाटील, आदी उपस्थित होते.दहा वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी साडेदहा कोटींचे शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे, तर चारजणांचा हत्तींच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या प्रकाराची सरकारने गंभीर दखल घेत माणगाव खोऱ्यात असलेल्या तीन हत्तींना प्रशिक्षित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी कर्नाटक सरकारकडून चार हत्तींना कर्नाटकातून सिंधुदुर्गमध्ये पाठविण्यात आले. हे हत्ती रविवारी मध्यरात्री आंबेरीत दाखल झाले. या हत्तींमध्ये अर्जुना, अभिमन्यू, हर्षा, गजेंद्रचा समावेश असून चार माहूत, कटर व अन्य असे मिळून २४ सदस्य या हत्ती मोहिमेत असणार आहेत, तर सिंधुदुर्ग वनविभागचे ७५ कर्मचारी तसेच ५० पोलिसांचे पथकही सहभागी होणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार व डॉ. उमाशंकर हे करणार असून, सिंधुदुर्ग वनविभागाला या मोहिमेसाठी ६९ लाखांची गरज आहे. त्यातील ६३ लाखांचा निधी प्राप्त झाला असून, यात केंद्र सरकारने ३३ लाख, राज्य सरकारने १५ लाख व जिल्हा नियोजनमधून १५ लाख रुपये प्राप्त झाले असल्याचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार यांनी सांगितले. ही हत्ती मोहीम पंधरा दिवस चालणार आहे. माणगाव परिसरात सध्या तीन रानटी हत्ती असून, या सर्व हत्तींना कर्नाटकातून आलेले चार हत्ती प्रशिक्षित करणार आहेत. रानटी हत्तींना प्रशिक्षित केल्यानंतर त्यांचा सर्व खर्च शासन करणार असल्याचे रमेशकुमार यांनी सांगितले.प्रशिक्षित हत्तींना जंगली हत्तींकडून सलामीकर्नाटकातून चार प्रशिक्षित हत्ती रविवारी मध्यरात्री उशिरा आंबेरी वननाक्यात आल्यानंतर या हत्तींना रानटी हत्तींनी मोठी आरोळी फोडत सलामी दिली. यामुळे हत्तींसोबत आलेले कर्मचारी अवाक् बनले. प्रशिक्षित हत्ती आले तेव्हा रानटी हत्ती आंबेरी परिसरातच तळ ठोकून होते. त्यांनी मनोहर साटम व गजानन धुरी या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे.