शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

तूर खरेदी केंद्रे तत्काळ सुरू करा

By admin | Updated: April 26, 2017 01:38 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तूर उत्पादन घेण्याचे आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून तूर उत्पादन घेण्याचे आवाहन केल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. त्यामुळे उत्पादित झालेली सर्व तूर खरेदी करण्याची जबाबदारी सरकारवर आहे, असे सांगत, तातडीने तूर खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केली.संघर्ष यात्रेनिमित्त कोल्हापुरात आलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांकडून ३५०० रुपयांनी खरेदी केलेली तूर व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’ला ५०५० रुपयांना विकली. तूर खरेदी बंद करून सरकारने व्यापाऱ्यांना लूटमार करण्याचा परवाना दिल्याची टीका विखे-पाटील यांनी केली. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर मोठे झालेले खासदार राजू शेट्टी व मंत्री सदाभाऊ खोत सत्तेत गेल्यापासून शेतकऱ्यांना विसरले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ग्रामसभेत ठराव कराशेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाला पाहिजे आणि शेतीमालाला ५० टक्के नफा मिळेल एवढा भाव मिळावा, अशा आशयाचे ठराव १ मे महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी करावेत, तसेच ते राज्य सरकारकडे पाठवावेत, असे आवाहन विखे-पाटील यांनी या वेळी केले. दर्शनासाठीही ‘संघर्ष’ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या संघर्ष यात्रेत अंबाबाईला साकडे घालण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते मंगळवारी सकाळी अंबाबाई मंदिरात आले, तेव्हा देवीची आरती आणि शंखतीर्थ हे धार्मिक विधी सुरू असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीतून वाट काढत विखे-पाटील पितळी उंबऱ्याच्या आत गेले. मात्र, अजितदादांना बाहेरूनच देवीला नमस्कार करून शेजारील कट्ट्यावरून उडी टाकून मंदिराबाहेर ‘संघर्ष’ करत यावे लागले. (प्रतिनिधी)