शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

अंबाबरवा गाव खाली करण्यास प्रारंभ

By admin | Updated: May 5, 2016 03:24 IST

वाघ वाचविण्याच्या मोहीमेतील पहिले पाऊल; गाव व शेतांच्या जागी होणार गवती कुरण.

बुलडाणा: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगतच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यामध्ये पसरलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील अंबाबरवा हे गाव पंधरा दिवसात उठणार असून, त्याची सुरूवात मंगळवारी संध्याकाळी झाली. या गावातील २९८ ग्रामस्थांना वन विभागाच्या वतिने पुनवर्सन मोबदल्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले असून, अनेक कुटूंबांनी बुधवारपासून गाव सोडण्यास सुरूवातही केली आहे. हे गाव पूर्ण खाली झाले, की येथे वन्यप्राण्यांचा राबता व्हावा, यासाठी कुरण तयार केले जाणार असल्याची माहिती वन्यजिव विभागाने दिली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडोर असलेल्या या अभयारण्यातील अंबाबरवा या गावाच्या पूनर्वसनास प्राधान्य देण्यात आले असून, पुढील टप्यात रोहीणखेड हे गाव उठविले जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी वन्यजिव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य डॉ.वासुदेवराव गावंडे, संग्रामपुर पंचायत समितीचे सभापती पांडूरंग हागे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दशरथ सुरडकर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रश्नांचे अभ्यासक यादव तरटे यांच्या उपस्थितीत पुनवर्सनाच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा भालेराव या केंद्रीय पर्यावरण समितीच्या सदस्या असताना, त्यांनी अंबाबरवा अभयारण्याचा प्रश्न केंद्र स्तरावर नेला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याकडे अंबाबरवा अभयारण्य घोषित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. सध्या होत असलेले अंबाबरवा गावाचे पुनवर्सन योग्य असून, यामुळे वाघ वाचविण्याच्या मोहीमेत मोठे यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .सव्वा कोटीचे रोख वितरण अंबाबरवा गावातील २९८ ग्रामस्थ पुनवर्सनाच्या यादीत असून, त्यापैकी १४५ ग्रामस्थांना प्रत्येकी ८0 हजार याप्रमाणे रोख रकमेचे वाटप मंगळवारी करण्यात आले. ही रक्कम देताना पती-पत्नीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. पुनर्वसनाची उर्वरित रक्कम ही प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये टाकली जाणार असून, त्यासाठी मंगळवारीच २९८ ग्रामस्थांचे बँक खाते अंबाबरवा या गावात जाऊनच उघडण्यात आले.आदीवासींची पसंती मध्यप्रदेशलाअंबाबरवा या गावात राठीया, भिलाला, पावरा, बारेला, भील्ल, कोरकू, न्याहाल या जमातीमध्ये मोडणारे आदीवासीं वास्तव्याला आहेत. त्यापैकी काहींनी सहा महिन्याअगोदरच मध्यप्रदेशामध्ये आसरा घेतला आहे. त्यापाठोपाठ येथील आदिवासी बांधव मध्यप्रदेशात जात आहेत. विशेष म्हणजे या आदीवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्रात मोठी अडचण होती, ती मध्यप्रदेशात राहणार नाही. त्यामुळे पुनवर्सन प्रमाणपत्रासोबतच अंबाबरवाचे आदीवासी आता मध्यप्रदेशचे रहिवासी होणार आहेत.