शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

अंबाबरवा गाव खाली करण्यास प्रारंभ

By admin | Updated: May 5, 2016 03:24 IST

वाघ वाचविण्याच्या मोहीमेतील पहिले पाऊल; गाव व शेतांच्या जागी होणार गवती कुरण.

बुलडाणा: महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगतच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यामध्ये पसरलेल्या अंबाबरवा अभयारण्यातील अंबाबरवा हे गाव पंधरा दिवसात उठणार असून, त्याची सुरूवात मंगळवारी संध्याकाळी झाली. या गावातील २९८ ग्रामस्थांना वन विभागाच्या वतिने पुनवर्सन मोबदल्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले असून, अनेक कुटूंबांनी बुधवारपासून गाव सोडण्यास सुरूवातही केली आहे. हे गाव पूर्ण खाली झाले, की येथे वन्यप्राण्यांचा राबता व्हावा, यासाठी कुरण तयार केले जाणार असल्याची माहिती वन्यजिव विभागाने दिली.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडोर असलेल्या या अभयारण्यातील अंबाबरवा या गावाच्या पूनर्वसनास प्राधान्य देण्यात आले असून, पुढील टप्यात रोहीणखेड हे गाव उठविले जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी वन्यजिव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा, जिल्हा परिषद सदस्य डॉ.वासुदेवराव गावंडे, संग्रामपुर पंचायत समितीचे सभापती पांडूरंग हागे, भाजपाचे तालुका अध्यक्ष दशरथ सुरडकर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील प्रश्नांचे अभ्यासक यादव तरटे यांच्या उपस्थितीत पुनवर्सनाच्या मोबदल्याचे वाटप करण्यात आले. दरम्यान, येथील सामाजिक कार्यकर्त्या उषा भालेराव या केंद्रीय पर्यावरण समितीच्या सदस्या असताना, त्यांनी अंबाबरवा अभयारण्याचा प्रश्न केंद्र स्तरावर नेला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री कमलनाथ यांच्याकडे अंबाबरवा अभयारण्य घोषित करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला होता. सध्या होत असलेले अंबाबरवा गावाचे पुनवर्सन योग्य असून, यामुळे वाघ वाचविण्याच्या मोहीमेत मोठे यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला .सव्वा कोटीचे रोख वितरण अंबाबरवा गावातील २९८ ग्रामस्थ पुनवर्सनाच्या यादीत असून, त्यापैकी १४५ ग्रामस्थांना प्रत्येकी ८0 हजार याप्रमाणे रोख रकमेचे वाटप मंगळवारी करण्यात आले. ही रक्कम देताना पती-पत्नीची स्वाक्षरी घेण्यात आली आहे. पुनर्वसनाची उर्वरित रक्कम ही प्रत्येकाच्या बँक खात्यामध्ये टाकली जाणार असून, त्यासाठी मंगळवारीच २९८ ग्रामस्थांचे बँक खाते अंबाबरवा या गावात जाऊनच उघडण्यात आले.आदीवासींची पसंती मध्यप्रदेशलाअंबाबरवा या गावात राठीया, भिलाला, पावरा, बारेला, भील्ल, कोरकू, न्याहाल या जमातीमध्ये मोडणारे आदीवासीं वास्तव्याला आहेत. त्यापैकी काहींनी सहा महिन्याअगोदरच मध्यप्रदेशामध्ये आसरा घेतला आहे. त्यापाठोपाठ येथील आदिवासी बांधव मध्यप्रदेशात जात आहेत. विशेष म्हणजे या आदीवासींना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी महाराष्ट्रात मोठी अडचण होती, ती मध्यप्रदेशात राहणार नाही. त्यामुळे पुनवर्सन प्रमाणपत्रासोबतच अंबाबरवाचे आदीवासी आता मध्यप्रदेशचे रहिवासी होणार आहेत.