शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

पाणी सोडण्यास प्रारंभ

By admin | Updated: November 2, 2015 03:34 IST

महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी सोडण्यास

मुंबई/नाशिक : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी सोडण्यास रविवारी रात्री नऊ वाजता सुरुवात झाली. एकूण १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडीत सोडले जाणार आहे. पाण्याची चोरी होऊ नये, म्हणून गोदाकाठावर पोलीस तैनात करण्यात असून, गावांचा विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आला आहे.नगरमधील निलवंडे धरणातून रात्री नऊ वाजता एक हजार क्युसेस, तर सकाळी सात वाजता दोन हजार क्युसेस पाणी सोडले गेले. निळवंडेमधून ६.५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.मुळा धरणातून रविवारी रात्री नऊ वाजता दोन हजार क्युसेस, तर पहाटे पाच वाजता ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. सोमवारी सकाळी बारा वाजता सात हजार क्युसेस पाणी सोडले जाणार आहे. मुळा धरणातून १.७५ टीएमसी पाणी सोडले जाईल.नाशिकच्या गंगापूर धरणातून १.३६ टीएमसी पाणी रविवारी मध्यरात्रीनंतर सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा घेतला आहे. विसर्ग होणार असल्याने गोदाकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिली. गंगापूर ते जायकवाडी २२४ किमी अंतर आहे. दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाच्या निर्णयानुसार आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने केलेल्या नियोजनानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातून सुमारे १२.८४ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, तसेच गिरणा खोऱ्यातून ४.३६ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने याला सर्वपक्षीय विरोध झाला, तर नगरच्या पाण्याबाबत थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल करण्यात आली होती.