शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

चारा छावण्या तात्काळ सुरू करा

By admin | Updated: April 30, 2016 00:49 IST

जि. प. जलव्यवस्थापन समिती बैठक : दुष्काळावर गंभीर चर्चा

सांगली : जिल्ह्यातील जतबरोबरच आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व भागामध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. तेथे शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत शुक्रवारी करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समिती बैठक झाली. जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी राज्य शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव अ‍ॅड्. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला. यावर होर्तीकर यांनी, शासनाकडे तसा ठराव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी, बनपुरी आणि खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात त्वरित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. दोन कोटींच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याचा निर्णय झाला. यामध्ये बहुतांशी बंधारे जत तालुक्यातीलच आहेत. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, सुवर्णा नांगरे, सूर्यकांत मुटेकर, सुवर्णा पिंगळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रोजगार हमीच्या कामाची चौकशी होणारखानापूर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द कंत्राटी तांत्रिक अधिकारी सूर्यकांत सरगर यांनीच केला आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या २०१२ पासूनच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी अ‍ॅड्. मुळीक यांनी केली होती. त्यानुसार रेश्माक्का होर्तीकर यांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले आहे.