शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर

By admin | Updated: June 6, 2016 03:25 IST

नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली.

मुंबई : नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. या कुटुंबामध्ये एका वृद्ध महिलेसह त्यांची सून आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधात या कुटुंबाने एसटी महामंडळाने लेखी तक्रार केली आहे. वरळी पोलीस कॅम्प वसाहतीत सावंत कुटुंबीय राहतात. सुट्टीनिमित्ताने सावंत कुटुंबातील पार्वती शंकर सावंत (६६), दीपा दत्तात्रय सावंत (३६), श्रेयश दत्तात्रय सावंत (१६), निमिशा दत्तात्रय सावंत (१३), साक्षी संजय कदम (१२) हे कराड येथे गेले होते. २ जून रोजी परत येण्यासाठी त्यांनी कराड - परेल या एसटीचे आॅनलाईन तिकीट आरक्षण केले. त्यानुसार दुपारी दोन वाजता कराड येथून ही एसटी सुटणार होती. सावंत कुटूंबिय वेळेच्या अर्धा तास आधीच तेथील अतीत या बस थांब्यावर दाखल झाले. मात्र बराच वेळ होऊनही एसटी न आल्याने त्यांनी जवळील चौकशी कक्षात विचारणा केली. मात्र तेथूनही काहीही माहिती मिळाली नाही. भर उन्हात वृद्ध सासू आणि मुलांना घेऊन कसे जायचे या विचारात दिपा यांनी एसटी विभागाकडे धाव घेतली. वरळी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय असलेले पती दत्तात्रय सावंत यांना दीपा यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रय यांनी दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. कराड एसटी स्टॅण्डच्या क्रमांकावर वारंवार दूरध्वनी केले. मात्र तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सातारा येथील एसटी स्टॅण्डवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ फोन वाजूनही कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर सायंकाळी साडे ॉचारच्या सुमारास सातारा येथील एसटी स्टॅण्डवर झालेल्या संपर्कात, कराड - परेल एसटी सातारा येथून निघून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या संतापाबरोबर चिंतेत आणखीन भर पडली. अखेर अतीत एसटी थांब्यातील प्रमुख अवघडे यांनी सावंत कुटुंबाला सुरळीत दुसऱ्या बसने पोहचविण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी सातच्या सातारा- मुंबई मेगा हायवे गाडीमध्ये अतिरिक्त पैसे भरुन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याविरोधात एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत कुटुंबाने केली आहे.