शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर

By admin | Updated: June 6, 2016 03:25 IST

नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली.

मुंबई : नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. या कुटुंबामध्ये एका वृद्ध महिलेसह त्यांची सून आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधात या कुटुंबाने एसटी महामंडळाने लेखी तक्रार केली आहे. वरळी पोलीस कॅम्प वसाहतीत सावंत कुटुंबीय राहतात. सुट्टीनिमित्ताने सावंत कुटुंबातील पार्वती शंकर सावंत (६६), दीपा दत्तात्रय सावंत (३६), श्रेयश दत्तात्रय सावंत (१६), निमिशा दत्तात्रय सावंत (१३), साक्षी संजय कदम (१२) हे कराड येथे गेले होते. २ जून रोजी परत येण्यासाठी त्यांनी कराड - परेल या एसटीचे आॅनलाईन तिकीट आरक्षण केले. त्यानुसार दुपारी दोन वाजता कराड येथून ही एसटी सुटणार होती. सावंत कुटूंबिय वेळेच्या अर्धा तास आधीच तेथील अतीत या बस थांब्यावर दाखल झाले. मात्र बराच वेळ होऊनही एसटी न आल्याने त्यांनी जवळील चौकशी कक्षात विचारणा केली. मात्र तेथूनही काहीही माहिती मिळाली नाही. भर उन्हात वृद्ध सासू आणि मुलांना घेऊन कसे जायचे या विचारात दिपा यांनी एसटी विभागाकडे धाव घेतली. वरळी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय असलेले पती दत्तात्रय सावंत यांना दीपा यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रय यांनी दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. कराड एसटी स्टॅण्डच्या क्रमांकावर वारंवार दूरध्वनी केले. मात्र तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सातारा येथील एसटी स्टॅण्डवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ फोन वाजूनही कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर सायंकाळी साडे ॉचारच्या सुमारास सातारा येथील एसटी स्टॅण्डवर झालेल्या संपर्कात, कराड - परेल एसटी सातारा येथून निघून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या संतापाबरोबर चिंतेत आणखीन भर पडली. अखेर अतीत एसटी थांब्यातील प्रमुख अवघडे यांनी सावंत कुटुंबाला सुरळीत दुसऱ्या बसने पोहचविण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी सातच्या सातारा- मुंबई मेगा हायवे गाडीमध्ये अतिरिक्त पैसे भरुन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याविरोधात एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत कुटुंबाने केली आहे.