शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात एसटीला थांब्याचा विसर

By admin | Updated: June 6, 2016 03:25 IST

नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली.

मुंबई : नियोजित थांब्यावर न थांबताच बस दुसऱ्या मार्गावरुन गेल्याने मुंबईला येणाऱ्या एका कुटुंबाला थांब्यावरच एसटी बसची तब्बल पाच तास वाट पाहावी लागल्याची विचित्र घटना साताऱ्यात घडली. या कुटुंबामध्ये एका वृद्ध महिलेसह त्यांची सून आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. याविरोधात या कुटुंबाने एसटी महामंडळाने लेखी तक्रार केली आहे. वरळी पोलीस कॅम्प वसाहतीत सावंत कुटुंबीय राहतात. सुट्टीनिमित्ताने सावंत कुटुंबातील पार्वती शंकर सावंत (६६), दीपा दत्तात्रय सावंत (३६), श्रेयश दत्तात्रय सावंत (१६), निमिशा दत्तात्रय सावंत (१३), साक्षी संजय कदम (१२) हे कराड येथे गेले होते. २ जून रोजी परत येण्यासाठी त्यांनी कराड - परेल या एसटीचे आॅनलाईन तिकीट आरक्षण केले. त्यानुसार दुपारी दोन वाजता कराड येथून ही एसटी सुटणार होती. सावंत कुटूंबिय वेळेच्या अर्धा तास आधीच तेथील अतीत या बस थांब्यावर दाखल झाले. मात्र बराच वेळ होऊनही एसटी न आल्याने त्यांनी जवळील चौकशी कक्षात विचारणा केली. मात्र तेथूनही काहीही माहिती मिळाली नाही. भर उन्हात वृद्ध सासू आणि मुलांना घेऊन कसे जायचे या विचारात दिपा यांनी एसटी विभागाकडे धाव घेतली. वरळी पोलीस ठाण्यात क्राईम पीआय असलेले पती दत्तात्रय सावंत यांना दीपा यांनी याबाबत माहिती दिली. त्यानंतर दत्तात्रय यांनी दूरध्वनी करण्यास सुरुवात केली. कराड एसटी स्टॅण्डच्या क्रमांकावर वारंवार दूरध्वनी केले. मात्र तेथूनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सातारा येथील एसटी स्टॅण्डवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान बराच वेळ फोन वाजूनही कोणीही प्रतिसाद दिला नसल्याचे सावंत कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर सायंकाळी साडे ॉचारच्या सुमारास सातारा येथील एसटी स्टॅण्डवर झालेल्या संपर्कात, कराड - परेल एसटी सातारा येथून निघून गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्या संतापाबरोबर चिंतेत आणखीन भर पडली. अखेर अतीत एसटी थांब्यातील प्रमुख अवघडे यांनी सावंत कुटुंबाला सुरळीत दुसऱ्या बसने पोहचविण्याचे आश्वासन दिले. सायंकाळी सातच्या सातारा- मुंबई मेगा हायवे गाडीमध्ये अतिरिक्त पैसे भरुन त्यांना परतीचा प्रवास करावा लागला. याविरोधात एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली असून त्यावर अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी सावंत कुटुंबाने केली आहे.