शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

मुख्यमंत्र्याचा स्थायी समितीला झटका

By admin | Updated: October 19, 2016 04:09 IST

कर्मचाऱ्यांवर मेहरनजर करणारा स्थायी समितीचे ठराव राज्याच्या नगरविकास खात्याने निलंबित करून शिवसेनेला मोठा झटका दिला

अजित मांडके,

ठाणे- अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात दिरंगाई करणाऱ्या माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांसह लिपिक आणि इतर कर्मचाऱ्यांवर मेहरनजर करणारा स्थायी समितीचे ठराव राज्याच्या नगरविकास खात्याने निलंबित करून शिवसेनेला मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आता या अधिकाऱ्यांवर पुढील कारवाई करण्यास आयुक्त मोकळे झाले आहेत.ठाणे शहरास अनधिकृत बांधकामाचे आगर म्हणून ओळखले जाते. राज्यातील सर्वात जास्त अनधिकृत बांधकामे ठाण्यात आहेत. अशाच एका प्रकरणात ठाणे महापालिकेच्या माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगल शिंदे, सुनील पाटील, लिपीक व देवीदास भोईर (क वर्ग लिपीक) यांना प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे आदेश दिले होते. परंतु, त्याकडे त्यांनीदुर्लक्ष केल्याने तत्कालीन आयुक्तांनी ३० मे २००८ पासून त्यांनासेवेतून निलंबित केले होते. विशेष म्हणजे याप्रकरणी केलेल्या प्राथमिक चौकशी अहवालानुसार या प्रकरणी संबधींतांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ चे नियम ८ अन्वये विभागीय चौकशी प्रक्रिया पूर्ण केली होती.दरम्यान पालिका प्रशासनाने एकाच वेळी दोन शिक्षा सुनावल्याने त्या अन्यायकारक असल्याचे मत तत्कालीन स्थायी समितीने व्यक्त केले होते. त्यामुळे एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतन वाढीवर परिणाम न करता रोखणे ही शिक्षा पुरेशी आहे. मात्र, प्रशासनाने सुनावलेली दुसरी शिक्षा ते निलंबन कालावधी हा सेवा कालावधी धरावा असा ठराव पारीत केला होता. परंतु, हा ठराव विखंडित करावा यासाठी १६ मार्च २०१६ रोजी महापालिका आयुक्तांनी शासनाकडे विनंती केली होती. त्यानुसार शासनाने स्थायी समितीने केलेला ठराव हा लोकहित व ठाणे महापालिकेच्या हिताच्या विरोधात असल्याचे नमूद करुन निलंबित केला आहे. मुख्यमंत्र्याकडीलनगरविकास विभागाने हा निर्णय घेवून ठाणे महापालिाकेतील सत्ताधारी शिवसेनेला मोठा झटका दिला असून शहरातील अनधिकृत बांधकामांना शिवसेना पाठिशी घालत असली तरी सरकार यातील दोषींना पाठिशी घालणार नाही, असा संदेश देऊन ऐन निवडणुकीच्या तोंडावर कुरघोडी केली आहे. >जबाबदारी टाळलीसहाय्यक आयुक्त मंगल शिंदे यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई टाळल्याचे अहवालात नमूद केले आहे. त्यानुसार त्यांच्यावर ठपका ठेवून सुनील पाटील (लिपीक) सुभाष भोईर (क वर्ग लिपीक) यांच्यावर ठेवण्यात आलेला एक दोषरोप अंशत: सिद्ध झाल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांची ठाणे महापालिकेच्या कार्यालयीन आदेशानुसार एक वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणाम करुन रोखली व त्यांचा निलंबन कालावधी हा निलंबन कालावधी म्हणून धरला. तसेच निवृत्त वेतन प्रयोजनार्थ हा कालावधी अर्हताकारी सेवा कालावधी म्हणून धरावा, असे सुचविले होते.