शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
2
महुआ मोईत्रा बेशुद्ध झाल्या, राहुल गांधींनी पाणी दिले; टीएमसीची आणखी महिला खासदार...
3
"जोपर्यंत लोकांच्या मनात निवणुकीच्या निष्पक्षतेबाबत संशय राहील तोपर्यंत...’’, शशी थरूर यांचं विधान  
4
ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
5
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रुषा हाॅस्पिटलला आग, रुग्णांची सुखरूप सुटका
6
मौतका कुआ : बापाचा 'लाडला', जोरदार पडला...! स्टंट करणं पडलं भारी, दिवसाढवळ्या दिसले असतील तारे; VIDEO व्हायरल
7
कुत्रा, मांजर विसरा..; विद्यार्थ्याने शाळेत आणला हत्ती, पाहून सर्वांनाच बसला धक्का; पाहा video
8
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
9
'या' IPO चे गुंतवणुदार झाले मालामाल; ४ दिवसांत ७८% चा छप्परफाड रिटर्न; लिस्टिंगनंतर लागला जॅकपॉट
10
“कविता करना बंद किया क्या?”; PM मोदींनी केली आठवलेंना विचारणा, तत्काळ पूर्ण केली इच्छा
11
VIDEO: दोन सिंहांचा सुरु होता मुक्त संचार, अचानक समोरून आला 'किंग कोब्रा' अन् मग...
12
माधुरी हत्तीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट! हत्ती कोल्हापूरला येणार की वनतारामध्ये राहणार?
13
तब्बल ७०० वर्ष जगले दक्षिणेतले संत राघवेंद्र स्वामी; पण कसे? त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या!
14
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
15
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
16
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
17
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
18
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
19
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
20
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार

ढोंगी पुरोगाम्यांविरुद्ध उभे राहायला हवे!

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक

मुंबई : समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनात बोलताना केले. अभाविपच्या प्रदेश अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी पूर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. पूर्व कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामुळे अभाविपमधील ते मंतरलेले दिवस जिवंतपणे अनुभवायला मिळाले, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली. आधी इंग्रजांनी पुरोगामी व आधुनिकतेचे चित्र निर्माण केले. तर, स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी, प्रतिगामी अशी लेबल चिकटवून समाजात अपसमज निर्माण केल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ज्यांना समाजकारण व राजकारणात स्वत:चे प्रभुत्व व तरुण नेतृत्व निर्माण करता आले नाही अशांनी काही क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरविण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून, या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हा छात्रशक्तीचा जय... हा राष्ट्रभक्तीचा जय...’ या अधिवेशन थीम साँगचे प्रसारण करण्यात आले. निकिता भागवत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतास कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले. आपल्या विद्यार्थीदशेत अभाविपशी जोडले गेलेल्या विविध क्षेत्रांतील पूर्व-कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी ‘भारत अनुरूप शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. देशात बदल घडविण्यासाठी बाह्य तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपण स्वत: अभ्यास करून देशात बदल घडवायला हवा. आपल्या देशाची संस्कृती विद्यार्थ्यांना सन्मान देणारी आहे. मात्र, कृषिप्रधान भारतातील विद्यार्थ्यांचा मातीशीच संबंध येत नाही. तेंव्हा आत्महत्यांचे सत्र थांबण्याची अपेक्षा कशी करायची, असा सवाल आंबेकरांनी केला. देश फक्त महाशक्तीच नाही, तर एक उत्कृष्ट राष्ट्र व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आंबेकर म्हणाले. (प्रतिनिधी)