शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ढोंगी पुरोगाम्यांविरुद्ध उभे राहायला हवे!

By admin | Updated: December 26, 2015 02:02 IST

समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक

मुंबई : समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास विचार, बुरसटलेले विचार असा समज पसरविण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनात बोलताना केले. अभाविपच्या प्रदेश अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी पूर्व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित राहिले. पूर्व कार्यकर्त्यांच्या या मेळाव्यामुळे अभाविपमधील ते मंतरलेले दिवस जिवंतपणे अनुभवायला मिळाले, अशी भावनाही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविली. आधी इंग्रजांनी पुरोगामी व आधुनिकतेचे चित्र निर्माण केले. तर, स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी, प्रतिगामी अशी लेबल चिकटवून समाजात अपसमज निर्माण केल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. ज्यांना समाजकारण व राजकारणात स्वत:चे प्रभुत्व व तरुण नेतृत्व निर्माण करता आले नाही अशांनी काही क्षेत्रातील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरविण्याचा जोरदार प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून, या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘हा छात्रशक्तीचा जय... हा राष्ट्रभक्तीचा जय...’ या अधिवेशन थीम साँगचे प्रसारण करण्यात आले. निकिता भागवत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतास कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केले. आपल्या विद्यार्थीदशेत अभाविपशी जोडले गेलेल्या विविध क्षेत्रांतील पूर्व-कार्यकर्त्यांनी मेळाव्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर यांनी ‘भारत अनुरूप शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन केले. देशात बदल घडविण्यासाठी बाह्य तत्त्वज्ञानाची गरज नाही. आपण स्वत: अभ्यास करून देशात बदल घडवायला हवा. आपल्या देशाची संस्कृती विद्यार्थ्यांना सन्मान देणारी आहे. मात्र, कृषिप्रधान भारतातील विद्यार्थ्यांचा मातीशीच संबंध येत नाही. तेंव्हा आत्महत्यांचे सत्र थांबण्याची अपेक्षा कशी करायची, असा सवाल आंबेकरांनी केला. देश फक्त महाशक्तीच नाही, तर एक उत्कृष्ट राष्ट्र व्हावे, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आंबेकर म्हणाले. (प्रतिनिधी)