शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ महागण्याच्या अहवालावरून संभ्रम

By admin | Updated: November 17, 2015 01:42 IST

डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत.

- नामदेव मोरे,  नवी मुंबई डाळींसह कांदा व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना गत वर्षभरामध्ये फक्त तांदळाचे दरच नियंत्रणात राहिले आहेत. एप्रिलपासून तांदळाच्या किमती वाढण्याऐवजी कमी झाल्या आहेत. परंतु उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिन्यात तांदळाचे दर वाढणार असल्याचा अहवाल दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सद्यस्थितीमध्ये दरवाढीची शक्यता वाटत नसल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या अहवालाविषयी संभ्रम निर्माण झाला असून कृत्रिम दरवाढ होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. सध्या तांदळाचे दर स्थिर आहेत.एप्रिलमध्ये होलसेल मार्केटमध्ये ७५ ते १०० रुपयांना विकला जाणारा बासमती तांदूळ आता ६० ते ८५ रुपयांना विकला जात आहे. २५ ते ३८ रुपयांना विकला जाणारा मोगरा आता १९ ते २४ रुपये किलो दराने विकला जात आहे. दुबार, तिबार, मोगरा, आयआर ८, एसएलओ या तांदळाच्या किमतीही स्थिरच आहेत. असे असताना उद्योग मंडळ असोचेमने पुढील महिनाभरामध्ये तांदळाच्या दरात वाढ होणार असल्याचा अहवाल दिला आहे. या अहवालामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांशी चर्चा केली असता सद्यस्थितीमध्ये बाजारभाव वाढण्याची काही शक्यता वाटत नाही. उत्पादन किंवा साठा कमी आहे याविषयी ठोस माहिती नाही. कोणत्या आधारावर तांदूळ महाग होणार याविषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे. मुंबई बाजार समितीमधील अधिकाऱ्यांनी याविषयी सांगितले की, आम्ही मार्केटमध्ये सर्वेक्षण केले. एप्रिलपासून तांदळाच्या दरामध्ये अजिबात वाढ झालेली नाही. बाजारभाव कमी झाले आहेत. नजीकच्या काळात भाववाढ होण्याची शक्यता वाटत नाही. या अहवालामुळे सर्वांमध्ये संभ्रमाची स्थिती असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा अहवाल कशाच्या आधारावर केला आहे व महागाई वाढणार हे कसे निश्चित केले याविषयी सविस्तर माहिती सर्वांसमोर ठेवण्याची आवश्यकता असल्याचे मतही एपीएमसीमधील जाणकारांनी व्यक्त केले आहे. टंचाई होण्याची शक्यता जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापारामध्ये महत्त्वाचे मंत्री, संघटना यांनी एखाद्या वस्तूचे दर वाढणार असे सांगितले की, काही दिवसांमध्ये त्याचे परिणाम दिसू लागतात. अनेक वेळा अशा प्रकारच्या वक्तव्यानंतर कृत्रिम भाववाढ होत असते. साठेबाजीही वाढत असते. तांदळाच्या भाववाढीच्या अहवालाचाही गैरफायदा घेऊन कृत्रिम भाववाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.