शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘दोन आठवड्यांत पर्जन्यमापक यंत्रे बसवा’

By admin | Updated: July 20, 2016 05:58 IST

मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला

मुंबई : मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी ३० मार्च २०१६ अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, अद्याप आठच यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित यंत्रे येत्या दोन आठवड्यांत बसवा, असा आदेश उच्च न्यायालयाने आयएमडी मुंबई आणि एमएआरडीएला दिला आहे, तसेच २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर मिठी नदीला पुन्हा पूर येऊ नये, यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र येत्या दोन आठवड्यांत पालिकेला सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या वर्षी १९ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर्ण दिवस मुंबई ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईचे आर्थिक नुकसान झाले व लोकांचेही हाल झाले. हवामान खात्याने जोरदार पावसाची पूर्वकल्पना दिली असती, तर नागरिकांचे हाल झाले नसते. त्यामुळे हवामानाचे अचूक वेध घेण्याचे निर्देश मुंबई आयएमडीला द्यावेत, तसेच पावसाची नोंद घेणारी अधिक स्वयंचलित यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. मंगळवारी आयएमडी मुंबईने उच्च न्यायालयाला सांगितले की, उपनगरांत डॉप्लर बसवण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या आहेत. दिल्ली मुख्यालयापुढे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर खंडपीठाने या प्रस्तावावर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश आयमडीच्या दिल्ली मुख्यालयाला दिले आहेत.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयानंतर याविषयी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चितळे समितीने अहवालात नमूद केलेल्या शिफारशींवर किती अंमलबजावणी केलीत? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)