शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘दोन आठवड्यांत पर्जन्यमापक यंत्रे बसवा’

By admin | Updated: July 20, 2016 05:58 IST

मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला

मुंबई : मुंबई व उपनगरांत पावसाची नोंद घेणारी ३० स्वयंचलित यंत्रे बसवण्याचा निर्णय मुंबई प्रादेशिक हवामान खाते (आयएमडी- मुंबई) आणि एमएमआरडीएने घेतला होता. त्यासाठी ३० मार्च २०१६ अंतिम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र, अद्याप आठच यंत्रे बसवण्यात आली आहेत. त्यामुळे उर्वरित यंत्रे येत्या दोन आठवड्यांत बसवा, असा आदेश उच्च न्यायालयाने आयएमडी मुंबई आणि एमएआरडीएला दिला आहे, तसेच २६ जुलै २००५ च्या जलप्रलयानंतर मिठी नदीला पुन्हा पूर येऊ नये, यासाठी काय उपाययोजना आखल्या आहेत. या संदर्भातील प्रतिज्ञापत्र येत्या दोन आठवड्यांत पालिकेला सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. गेल्या वर्षी १९ जुलै रोजी झालेल्या पावसामुळे पूर्ण दिवस मुंबई ठप्प झाली होती. त्यामुळे मुंबईचे आर्थिक नुकसान झाले व लोकांचेही हाल झाले. हवामान खात्याने जोरदार पावसाची पूर्वकल्पना दिली असती, तर नागरिकांचे हाल झाले नसते. त्यामुळे हवामानाचे अचूक वेध घेण्याचे निर्देश मुंबई आयएमडीला द्यावेत, तसेच पावसाची नोंद घेणारी अधिक स्वयंचलित यंत्रे बसवण्यात यावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका व्यवसायाने वकील असलेले अटल दुबे यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. मंगळवारी आयएमडी मुंबईने उच्च न्यायालयाला सांगितले की, उपनगरांत डॉप्लर बसवण्यासाठी काही जागा शोधण्यात आल्या आहेत. दिल्ली मुख्यालयापुढे प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर खंडपीठाने या प्रस्तावावर चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश आयमडीच्या दिल्ली मुख्यालयाला दिले आहेत.मुंबईत २६ जुलै २००५ रोजी आलेल्या महाप्रलयानंतर याविषयी अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या चितळे समितीने अहवालात नमूद केलेल्या शिफारशींवर किती अंमलबजावणी केलीत? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने महापालिकेला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)