शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्थैर्य गरजेचे आहे

By admin | Updated: November 13, 2014 01:21 IST

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे.

अल्पमतातील सरकार चालवणो ही एक कला आहे. अशा अनेक सरकारांनी देशात कार्यकाळ पूर्ण केल्याची उदाहरणो आहेत. जनतेने दिलेला कौल समोर आहे. त्यात भाजपाला जास्त जागा मिळालेल्या आहेत. शिवाय छोटय़ा पक्षांनी त्यांना दिलेला पाठींबा त्यामुळे ते बहुमताच्या जवळ आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र येतील हे कदापि शक्य नाही आणि आज राज्यात पुन्हा निवडणुका कोणालाही नको आहेत. जनतेला देखील त्या न परवडणा:या आहेत. सरकारला स्थैर्य नसेल तर प्रशासनावरची पकड ढिली होते व त्यात राज्याची हानी होते म्हणून राष्ट्रवादीने सरकारला पाठींबा देऊ केला आहे. 
जर आम्ही सरकार बनवू शकत नसू तर राज्यात सरकारच नाही असे चित्र ठेवणो देखील हिताचे नाही. भ्रष्टाचाराला संरक्षण मिळावे म्हणून आम्ही पाठींबा दिला असे कोणी म्हणत असेल तर ते चूक आहे. आजच्या काळात माध्यमं प्रभावी आणि न्यायालये आक्रमक बनलेली असताना असा विचारच चुकीचा आहे. जयललिता यांना मुख्यमंत्री असतानाही शिक्षा झालीच ना. या सरकारने चांगले निर्णय घेतले तर राज्यावर स्थैर्यावर परिणाम होणार नाही. राज्यात बहुमताची सरकारे अपयशी ठरल्याची आणि अल्पमतातली सरकारे यशस्वी ठरल्याची अनेक उदाहरणो आहेत. जर या सरकारने वीज, बेकारी, शेती असे अनेक प्रश्न आहेत. अशावेळी सुडबुध्दीने न वागता चांगले काम केले तर अल्पमतातले सरकार कार्यकाळ पूर्ण करु शकेल. हे करत असताना राज्याचा भावनिक नकाशा बिघडू देऊ नये. पश्चिम महाराष्ट्रात जाऊन विदर्भाच्या विरोधात आणि विदर्भात जाऊन पश्चिम महाराष्ट्राच्या विरोधात बोलणो योग्य नाही. राज्याच्या हिताची भूमिका घ्यावी, राज्याच्या वाटय़ाचे पाणी अन्य राज्यात जाऊ न देण्यासाठी निर्णय घेणो असेल किंवा मराठवाडय़ाच्या दुष्काळावर मात करण्याचे निर्णय असतील, सरकार चांगले काम करणार असेल तर नक्कीच टिकेल. 
(लेखक माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे गटनेते आहेत)