शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या तिकीट रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: July 1, 2015 02:00 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ६०० कोटी रूपयांचा तोटा का सहन करावा लागतोय याची कारणीमिमांसा करणारी दोन पत्रे महामंडळाचे मुख्य सुरक्षा

डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ६०० कोटी रूपयांचा तोटा का सहन करावा लागतोय याची कारणीमिमांसा करणारी दोन पत्रे महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविली असून, यातून एस. टी. तील दोन प्रमुख गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले आहे़ राज्यातील सर्व आगारांमध्ये सुरू असलेली दुकाने व व्यवसायिक प्रतिष्ठाने त्यांना देण्यात आलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा वापरतात. यामुळे महामंडळाचे तब्बल ४५.५६ कोटींचे नुकसान होत आहे. याशिवाय अधिकारी वाहकांच्या संगनमताने करत असलेल्या तिकीट घोटाळ््यामुळे महामंडळाला दररोज १ कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसत आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या दोन पत्रांत (त्यांच्या प्रति लोकमतकडे उपलब्ध आहेत.) म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख दक्षता अधिकारी म्हणून अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल यांनी ही पत्रे पाठविली आहेत. आपण मॅन्यूअल तिकीटांचा आढावा घेतला असता ८४ लाख ३५ हजार ४३८ रूपयांची तिकीटे गायब असल्याचे आढळून आले. याशिवाय विभागीय कार्यालयाने जारी केलेल्या २८ लाख २ हजार ४३८ रूपयांच्या तिकीटांची संबंधित विभागाने नोंद ठेवली नसल्याच्या निदर्शनास आले, असे अग्रवाल यांनी २२ मे रोजी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. बेपत्ता तिकीटांबाबत तिकीटांच्या कस्टोडियनवर (रक्षक) त्याचप्रमाणे तिकीट साठ्याच्या नियमित तपासणीची जबाबदारी असणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस या पत्रात केली आहे. मॅन्यूअल तिकीट देता यावे म्हणून काही वाहक हेतुपूस्सर इलेक्ट्रानिक तिकीट मशिन बंद पाडतात, असे आढळून आले. अनेक वाहक प्रवाशांकडून तिकीटाची रक्कम तर घेतात परंतु त्यांना तिकीट देत नाहीत, असेही दिसून आले. राज्यात ३६ हजारांवर वाहक असून काहींनी दररोज तिकीट न देता ५०० रूपये जरी खिशात घातले तरी महामंडळाला दररोज १.८ कोटींचा फटका बसतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २६ जून रोजी पाठविलेल्या आणखी एका पत्रात अग्रवाल यांनी असे नमूद केले की, राज्यातील २५० डेपोत सुरू असलेली २७६७ दुकाने आणि व्यवसायिक प्रतिष्ठांनाना अचानक भेटी देऊन तपासणी केली असता त्यातील ७७० प्रतिष्ठाने त्यांना दिलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा वापरत असल्याचे आढळले. त्यामुळे महामंडळाचे ४७ कोटी ५६ लाख २२हजार ९८० रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ठेके देण्यातही अनेक गैरप्रकार होत आहेत. तसेच कमी दराची निविदा भरणाऱ्यांना ठेका द्यावा असा दंडक आहे. मात्र, येथे उलट होत आहे. एकाहून अधिक विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली अधिक दराची निविदा भरणाऱ्यांना कंत्राट दिले जातात. यासंदर्भात अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी माझे घर नीट करत आहे, असे ते म्हणाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, संचालक मंडळाने अग्रवाल यांना महामंडळाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितले होते. त्याला अग्रवाल यांनी तीव्र विरोध दर्शविला. तुम्ही निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले की तुम्हाला दक्षतेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडता येत नाही, असे ते म्हणाले.