शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

एसटीच्या तिकीट रॅकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: July 1, 2015 02:00 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ६०० कोटी रूपयांचा तोटा का सहन करावा लागतोय याची कारणीमिमांसा करणारी दोन पत्रे महामंडळाचे मुख्य सुरक्षा

डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला ६०० कोटी रूपयांचा तोटा का सहन करावा लागतोय याची कारणीमिमांसा करणारी दोन पत्रे महामंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविली असून, यातून एस. टी. तील दोन प्रमुख गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले आहे़ राज्यातील सर्व आगारांमध्ये सुरू असलेली दुकाने व व्यवसायिक प्रतिष्ठाने त्यांना देण्यात आलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा वापरतात. यामुळे महामंडळाचे तब्बल ४५.५६ कोटींचे नुकसान होत आहे. याशिवाय अधिकारी वाहकांच्या संगनमताने करत असलेल्या तिकीट घोटाळ््यामुळे महामंडळाला दररोज १ कोटी ८० लाख रुपयांचा फटका बसत आहे, असे महामंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकांना पाठविलेल्या दोन पत्रांत (त्यांच्या प्रति लोकमतकडे उपलब्ध आहेत.) म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे प्रमुख दक्षता अधिकारी म्हणून अलीकडेच नियुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी विनीत अग्रवाल यांनी ही पत्रे पाठविली आहेत. आपण मॅन्यूअल तिकीटांचा आढावा घेतला असता ८४ लाख ३५ हजार ४३८ रूपयांची तिकीटे गायब असल्याचे आढळून आले. याशिवाय विभागीय कार्यालयाने जारी केलेल्या २८ लाख २ हजार ४३८ रूपयांच्या तिकीटांची संबंधित विभागाने नोंद ठेवली नसल्याच्या निदर्शनास आले, असे अग्रवाल यांनी २२ मे रोजी वरिष्ठांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. बेपत्ता तिकीटांबाबत तिकीटांच्या कस्टोडियनवर (रक्षक) त्याचप्रमाणे तिकीट साठ्याच्या नियमित तपासणीची जबाबदारी असणाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस या पत्रात केली आहे. मॅन्यूअल तिकीट देता यावे म्हणून काही वाहक हेतुपूस्सर इलेक्ट्रानिक तिकीट मशिन बंद पाडतात, असे आढळून आले. अनेक वाहक प्रवाशांकडून तिकीटाची रक्कम तर घेतात परंतु त्यांना तिकीट देत नाहीत, असेही दिसून आले. राज्यात ३६ हजारांवर वाहक असून काहींनी दररोज तिकीट न देता ५०० रूपये जरी खिशात घातले तरी महामंडळाला दररोज १.८ कोटींचा फटका बसतो, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २६ जून रोजी पाठविलेल्या आणखी एका पत्रात अग्रवाल यांनी असे नमूद केले की, राज्यातील २५० डेपोत सुरू असलेली २७६७ दुकाने आणि व्यवसायिक प्रतिष्ठांनाना अचानक भेटी देऊन तपासणी केली असता त्यातील ७७० प्रतिष्ठाने त्यांना दिलेल्या जागेपेक्षा दुप्पट जागा वापरत असल्याचे आढळले. त्यामुळे महामंडळाचे ४७ कोटी ५६ लाख २२हजार ९८० रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय ठेके देण्यातही अनेक गैरप्रकार होत आहेत. तसेच कमी दराची निविदा भरणाऱ्यांना ठेका द्यावा असा दंडक आहे. मात्र, येथे उलट होत आहे. एकाहून अधिक विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्याच्या धोरणात्मक निर्णयाच्या नावाखाली अधिक दराची निविदा भरणाऱ्यांना कंत्राट दिले जातात. यासंदर्भात अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता ‘मी माझे घर नीट करत आहे, असे ते म्हणाले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, संचालक मंडळाने अग्रवाल यांना महामंडळाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यास सांगितले होते. त्याला अग्रवाल यांनी तीव्र विरोध दर्शविला. तुम्ही निर्णय प्रक्रियेत सहभागी झाले की तुम्हाला दक्षतेची जबाबदारी योग्यरित्या पार पाडता येत नाही, असे ते म्हणाले.