शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

विशेष लेख: विमानतळाचे एसटी स्टॅण्ड!

By मनोज गडनीस | Updated: December 25, 2022 08:59 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली या देशातील दोन्ही प्रमुख विमानतळांवर सातत्याने अभूतपूर्व गर्दी होत आहे.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली या देशातील दोन्ही प्रमुख विमानतळांवर सातत्याने अभूतपूर्व गर्दी होत आहे. १० डिसेंबरला तर दिवसभरात मुंबईविमानतळावर १ लाख ५० हजार ९८८ प्रवासी होते. आजवर देशांतर्गत प्रवासासाठी दीड तास आधी विमानतळावर पोहोचले तरी चालायचे; पण आता देशांतर्गत विमान प्रवासासाठीदेखील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाप्रमाणे तीन तास आधी पोहोचावे, अशा सूचना विमानतळ प्रशासनाने दिल्या आहेत. दिवसाकाठी जवळपास ८५० विमानांची आवक-जावक होणाऱ्या मुंबई विमानतळावर अचानक गर्दी वाढण्यामागे काय कारण आहे? यामुळे प्रवाशांची कशी गैरसोय होत आहे आणि यावर उपाय काय?

प्रशासन काय करतेय?

गर्दी नियंत्रणासाठी पॅसेंजर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची नेमणूक. सुरक्षा तपासणी व हातातील सामानाच्या तपासणीसाठी ठेवलेल्या ट्रेची हालचाल जलद व्हावी, याकरिता विशेष कर्मचाऱ्यांची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ड्युटी मॅनेजरची नेमणूक परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशन सेंटरमध्ये दिशादर्शनासाठी विशेष पथकाची नेमणूक, विमानाच्या वेळेनुसार प्रवाशांना प्राधान्यक्रम

प्रवाशांची काय गैरसोय होते? 

- गर्दी वाढल्यामुळे विमानतळावर प्रवेशासाठी जे गेट आहे, तिथूनच रांग लागायला सुरुवात होत आहे.

- आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बोर्डिंग पास घेणे आणि सामान तिथे सोडणे याकरिता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रांग होत आहे.- यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरक्षा तपासणी (आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यानंतर इमिग्रेशन चेकिंग होते.) इथेदेखील मोठी गर्दी होत आहे.

- सातत्याने वाढणाऱ्या या गर्दीमुळे आधी जी प्रक्रिया एक ते दीड तासात होत होती, त्याला आता तीन तास लागत आहेत.- त्यामुळे जर एखादा प्रवासी ऐनवेळी आला तर त्याला प्रक्रियेतील विलंबामुळे विमान चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गर्दी का होत आहे?

- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे विमान प्रवाशांची संख्या घटली होती. आता मात्र निर्बंध हटल्याने लोकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिले आहे.

- डिसेंबरच्या महिन्यात अनेक लोक सुट्टी घेऊन प्रवासासाठी जातात. निर्बंध हटल्यामुळे लोकांनी बुकिंग केले आहे.

- उपलब्ध माहितीनुसार, २०१९ च्या तुलनेत यंदा देशांतर्गत प्रवासाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या प्रमाणात २०१९ च्या तुलनेत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MumbaiमुंबईAirportविमानतळ