शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: विमानतळाचे एसटी स्टॅण्ड!

By मनोज गडनीस | Updated: December 25, 2022 08:59 IST

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली या देशातील दोन्ही प्रमुख विमानतळांवर सातत्याने अभूतपूर्व गर्दी होत आहे.

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई व दिल्ली या देशातील दोन्ही प्रमुख विमानतळांवर सातत्याने अभूतपूर्व गर्दी होत आहे. १० डिसेंबरला तर दिवसभरात मुंबईविमानतळावर १ लाख ५० हजार ९८८ प्रवासी होते. आजवर देशांतर्गत प्रवासासाठी दीड तास आधी विमानतळावर पोहोचले तरी चालायचे; पण आता देशांतर्गत विमान प्रवासासाठीदेखील आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाप्रमाणे तीन तास आधी पोहोचावे, अशा सूचना विमानतळ प्रशासनाने दिल्या आहेत. दिवसाकाठी जवळपास ८५० विमानांची आवक-जावक होणाऱ्या मुंबई विमानतळावर अचानक गर्दी वाढण्यामागे काय कारण आहे? यामुळे प्रवाशांची कशी गैरसोय होत आहे आणि यावर उपाय काय?

प्रशासन काय करतेय?

गर्दी नियंत्रणासाठी पॅसेंजर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची नेमणूक. सुरक्षा तपासणी व हातातील सामानाच्या तपासणीसाठी ठेवलेल्या ट्रेची हालचाल जलद व्हावी, याकरिता विशेष कर्मचाऱ्यांची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी ड्युटी मॅनेजरची नेमणूक परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी इमिग्रेशन सेंटरमध्ये दिशादर्शनासाठी विशेष पथकाची नेमणूक, विमानाच्या वेळेनुसार प्रवाशांना प्राधान्यक्रम

प्रवाशांची काय गैरसोय होते? 

- गर्दी वाढल्यामुळे विमानतळावर प्रवेशासाठी जे गेट आहे, तिथूनच रांग लागायला सुरुवात होत आहे.

- आतमध्ये प्रवेश केल्यानंतर बोर्डिंग पास घेणे आणि सामान तिथे सोडणे याकरिता पुन्हा मोठ्या प्रमाणावर रांग होत आहे.- यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे सुरक्षा तपासणी (आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी यानंतर इमिग्रेशन चेकिंग होते.) इथेदेखील मोठी गर्दी होत आहे.

- सातत्याने वाढणाऱ्या या गर्दीमुळे आधी जी प्रक्रिया एक ते दीड तासात होत होती, त्याला आता तीन तास लागत आहेत.- त्यामुळे जर एखादा प्रवासी ऐनवेळी आला तर त्याला प्रक्रियेतील विलंबामुळे विमान चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गर्दी का होत आहे?

- गेल्या दोन वर्षांपासून कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंध यामुळे विमान प्रवाशांची संख्या घटली होती. आता मात्र निर्बंध हटल्याने लोकांनी विमान प्रवासाला प्राधान्य दिले आहे.

- डिसेंबरच्या महिन्यात अनेक लोक सुट्टी घेऊन प्रवासासाठी जातात. निर्बंध हटल्यामुळे लोकांनी बुकिंग केले आहे.

- उपलब्ध माहितीनुसार, २०१९ च्या तुलनेत यंदा देशांतर्गत प्रवासाचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढले आहे, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी या प्रमाणात २०१९ च्या तुलनेत ४९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :MumbaiमुंबईAirportविमानतळ