शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

एसटी महामंडळ आणि संघटनेत जुंपली

By admin | Updated: April 22, 2017 03:17 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, निर्णय मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत एक लाखाहून अधिक कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून एसटीचे लाखो कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित असून, अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी वेतन करारातील काही मागण्या, सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के हंगामी वाढ या मुद्द्यांवर एसटी महामंडळ व मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत बैठक पार पडली. त्या वेळी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर संघटनेकडून ठाम भूमिका मांडण्यात आली. एसटी कामगारांना कोणत्याही परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन मिळणे आवश्यक आहे. एसटी कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीचा वेळीच सकारात्मक निर्णय झाला असता, तर कामगारांमधील असंतोष काही प्रमाणात दूर होणे शक्य झाले असते, अशी अप्रत्यक्ष टीका संघटनेकडून एसटी प्रशासनावर करण्यात आली. त्यानंतर, शुक्रवारी एसटी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात रावते यांनी ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. याचबरोबर, वेतन करारासंदर्भात आतापर्यंत झालेल्या वाटाघाटी बैठकीत वेतनवाढीसारखा मूळ विषय सोडून, इतर बाबींवर जास्त चर्चा करण्यात संघटनेने स्वारस्य दाखवल्याचा थेट आरोपच केला. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून ते आतापर्यंत, सातवा वेतन आयोगाची मागणी अयोग्य असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तरीदेखील संघटनेने एकाच मागणीवर अडून बसून वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या, इतर छोट्या-छोट्या मागण्यांवर चर्चा करण्यात घालवल्याचेही पत्रकातून सांगितले, तर याच कालावधीमध्ये १२,५१४ कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेने अनास्था दाखवल्याची टीकाही एसटीकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारचे आरोप आणि टीकांची यादीच एसटी प्रशासनाकडून सादर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)एसटी कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. तत्पूर्वी १ जानेवारी २०१६ रोजी मान्यताप्राप्त संघटनेने आपल्या मागण्या प्रशासनाकडे सादर केल्या, परंतु त्यानंतर ८ महिन्यांनी प्रशासनाने या संदर्भात समितीची स्थापना केली. त्यामुळे संघटनेकडून विलंब केला जात असल्याचा आरोप खोटा आहे. - संदीप शिंदे, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना-अध्यक्ष