शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

एसटी महामंडळ आणि संघटनेत जुंपली

By admin | Updated: April 22, 2017 03:17 IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या

मुंबई : कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत गेले वर्षभर निर्णय होत नसल्याने, एसटी महामंडळ आणि मान्यताप्राप्त एसटी संघटनेत चांगलीच जुंपली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून, निर्णय मात्र होताना दिसत नाही. त्यामुळे ३० एप्रिलपर्यंत एक लाखाहून अधिक कामगारांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळ अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याकडून एसटी प्रशासनाला देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरापासून एसटीचे लाखो कर्मचारी वेतनवाढीपासून वंचित असून, अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. तीन दिवसांपूर्वी वेतन करारातील काही मागण्या, सातवा वेतन आयोग आणि २५ टक्के हंगामी वाढ या मुद्द्यांवर एसटी महामंडळ व मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेत बैठक पार पडली. त्या वेळी सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीवर संघटनेकडून ठाम भूमिका मांडण्यात आली. एसटी कामगारांना कोणत्याही परिस्थितीत काम करावे लागते. त्यामुळे एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेतन मिळणे आवश्यक आहे. एसटी कामगारांच्या वेतनवाढीच्या मागणीचा वेळीच सकारात्मक निर्णय झाला असता, तर कामगारांमधील असंतोष काही प्रमाणात दूर होणे शक्य झाले असते, अशी अप्रत्यक्ष टीका संघटनेकडून एसटी प्रशासनावर करण्यात आली. त्यानंतर, शुक्रवारी एसटी प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात रावते यांनी ३० एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले. याचबरोबर, वेतन करारासंदर्भात आतापर्यंत झालेल्या वाटाघाटी बैठकीत वेतनवाढीसारखा मूळ विषय सोडून, इतर बाबींवर जास्त चर्चा करण्यात संघटनेने स्वारस्य दाखवल्याचा थेट आरोपच केला. प्रशासनाने पहिल्या बैठकीपासून ते आतापर्यंत, सातवा वेतन आयोगाची मागणी अयोग्य असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. तरीदेखील संघटनेने एकाच मागणीवर अडून बसून वाटाघाटीच्या अनेक फेऱ्या, इतर छोट्या-छोट्या मागण्यांवर चर्चा करण्यात घालवल्याचेही पत्रकातून सांगितले, तर याच कालावधीमध्ये १२,५१४ कनिष्ठ वेतनश्रेणीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत संघटनेने अनास्था दाखवल्याची टीकाही एसटीकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारचे आरोप आणि टीकांची यादीच एसटी प्रशासनाकडून सादर करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)एसटी कामगारांच्या वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली. तत्पूर्वी १ जानेवारी २०१६ रोजी मान्यताप्राप्त संघटनेने आपल्या मागण्या प्रशासनाकडे सादर केल्या, परंतु त्यानंतर ८ महिन्यांनी प्रशासनाने या संदर्भात समितीची स्थापना केली. त्यामुळे संघटनेकडून विलंब केला जात असल्याचा आरोप खोटा आहे. - संदीप शिंदे, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना-अध्यक्ष