शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
2
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
3
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
4
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
5
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
6
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
7
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
8
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला
9
धक्कादायक! जिथे CCTV तिथेच सामान तपासा; रेल्वे प्रवाशांचं साहित्य तपासणारे पोलीसच करतायेत लूट
10
लाल किल्ल्यावरून १ कोटी रुपयांचा कलश चोरणारा पकडला गेला अन् धक्कादायक खुलासा झाला!
11
Asia Cup 2025 : संजू सॅमसन संदर्भात रवी शास्त्रींचं मोठं वक्तव्य; गंभीरला त्यातील गांभीर्य कळणार का?
12
एका वनडे मालिकेत सर्वाधिक धावा करणारे ५ मधल्या फळीतील फलंदाज!
13
मंदीच्या उबरठ्यावर अमेरिका! कोरोनापेक्षाही भीषण स्थिती;२००८ मध्ये भविष्यवाणी करणाऱ्यानं पुन्हा दिला इशारा
14
Pitru Paksha 2025: पितृपक्षाची सुरुवात कोणी व कोणासाठी केली? प्रत्येकाला हे माहीत असलेच पाहिजे!
15
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
16
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
17
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
18
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
19
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
20
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी

एसटी महामंडळातील वसुली होणार रद्द

By admin | Updated: November 1, 2015 01:50 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.

मुंबई : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर विभागाने ६७१ वाहक आणि चालकांकडून २.५१ कोटी रुपये वसूल करण्याची १० वर्षांपूर्वी केलेली कारवाई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.जे वाहक-चालक सेवेत आहेत, त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाऊ नये आणि निवृत्त झालेल्या ज्या वाहन-चालकांच्या देण्यांमधून ही रक्कम कापण्यात आली आहे, त्यांना ती परत करण्यात यावी, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. महामंडळाने या नोटिसा २ फेब्रुवारी २००५ रोजी बजावल्या होत्या. प्रत्येकाकडून सरासरी चार ते पाच हजार रुपयांची वसुली केली जाणार होती. याविरुद्ध महाराष्ट्र राज्य ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने दाद मागितली असता, औद्योगिक न्यायालयाने सप्टेंबर २००५ मध्ये या वसुली नोटिसा रद्द केल्या होत्या. महामंडळाने केलेले अपिल हायकोर्टात प्रलंबित होते. मध्यंतरी ज्यांच्याकडून वसुली करायची आहे, असे ते निवृत्त झाले, तर वसुली करता येणार नाही, असा अर्ज महामंडळाने केला होता. तेव्हा न्यायालयाने निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देय देण्यांमधून ही वसुलीची रक्कम कापून घ्यावी व ती बँकेत ठेवावी, अशी अंतरिम मुभा दिली होती. आता अंतिम सुनावणीनंतर न्या. रवींद्र घुगे यांनी महामंडळाचे अपिल फेटाळले व वसुली रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)काय होते नेमके प्रकरण?लांब पल्ल्याच्या बस घेऊन जाणाऱ्या चालक-वाहकांनी सलग दोन दिवस ड्युटी केली, तर मूळ आगारात परत आल्यावर तिसऱ्या दिवशी त्यांना सुट्टी दिली जाते. महामंडळाच्या लातूर विभागात १९९१ ते २००० या १० वर्षांत अनेक वाहक-चालकांना अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी प्रत्यक्ष काम न करताही, त्यांची हजेरी लावून त्यांना त्या दिवसाचा पगार दिला गेला, असे डिसेंबर २००१ मध्ये केलेल्या लेखा परीक्षणात स्पष्ट झाले. लेखा परीक्षकांनी अशा प्रकारे एकूण दोन कोटी ५१ लाख ४३ हजार रुपये अनाठायी दिले गेल्याचे नमूद केले. त्यानंतर महामंडळाने संबंधित वाहक-चालकांकडून ही रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू केली.अधिकाऱ्यांना पाठीशी घातलेन्यायालयाने म्हटले की, खरे तर ‘तिसऱ्या दिवशी’ काम न करूनही वाहक-चालकांची हजेरी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना महामंडळाने जबाबदार धरायला हवे होते, पण तसे केले गेले नाही. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हजेरीच्या बनावट नोंदी तयार केल्या, असे महामंडळाचे म्हणणे नाही किंवा त्यास कोणताही पुरावा नाही. महामंडळाने या कर्मचाऱ्यांवर रीतसर खातेनिहाय चौकशीही केलेली नाही. अशा परिस्थितीत पगारातून दिले गेलेले एक दिवसाचे जादा पैसे महामंडळ वसूल करू शकत नाही.