शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

एसटी, मध्य रेल्वेला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 27, 2017 04:27 IST

गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकलने फेब्रुवारी, मार्च महिन्यात मात्र चांगलीच आगेकूच केली आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या एसटीचे मार्च महिन्यात प्रवासी भारमान ५ टक्क्यांनी वाढले आहे. तर फेब्रुवारीपर्यंत मध्य रेल्वेचा वक्तशीरपणाही ९१ टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे एसटी व रेल्वेला सुगीचे दिवस आले की काय, असा प्रश्न पडला आहे.प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांत फारसे न झालेले बदल आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता २0१२-१३ पासून ते आतापर्यंत जवळपास १६ कोटी प्रवासी कमी झाले. त्यामुळे प्रवासी व उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. तरीही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. मात्र एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यात भारमान ५0.९८ टक्के होते. हे पाहता ५.७७ टक्के भारमानात वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यापर्यंत १३६ कोटी ४५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा याच महिन्यापर्यंत १४७ कोटी ४८ लाखांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे. महामंडळाचे प्रवासी भारमान वाढलेले असतानाच मध्य रेल्वेलाही सुगीचे दिवस आलेले आहेत. सिग्नल बिघाड, रुळाला तडा, ट्रेन रुळावरून घसरणे इत्यादी कारणांमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होत असते आणि वक्तशीरपणाची ऐशीतैशी होताना दिसते. परंतु फेब्रुवारी महिन्यात मध्य रेल्वेची लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वक्तशीरपणात चांगलीच सुधारणा झाली. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ९१.४ टक्के वक्तशीरपणा मध्य रेल्वेचा राहिला, तर त्याआधी जानेवारी महिन्यात ८८ टक्के वक्तशीरपणा होता. महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सकाळी गर्दीच्या वेळी ९४ टक्के तर संध्याकाळी गर्दीच्या वेळी ९0 टक्के वक्तशीरपणा होता, अशी माहिती देण्यात आली. आता मार्च महिना संपत आला असून या महिन्यात रेल्वेचा वक्तशीरपणा कसा राहील हे पाहण्यासारखे असेल. (प्रतिनिधी)एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.