शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

एसटी, मध्य रेल्वेला सुगीचे दिवस

By admin | Updated: March 27, 2017 04:27 IST

गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भारमान आणि वक्तशीरपणाचा उतरता आलेख असतानाच एसटी व मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय लोकलने फेब्रुवारी, मार्च महिन्यात मात्र चांगलीच आगेकूच केली आहे. राज्याची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणाऱ्या एसटीचे मार्च महिन्यात प्रवासी भारमान ५ टक्क्यांनी वाढले आहे. तर फेब्रुवारीपर्यंत मध्य रेल्वेचा वक्तशीरपणाही ९१ टक्क्यांपर्यंत गेला. त्यामुळे एसटी व रेल्वेला सुगीचे दिवस आले की काय, असा प्रश्न पडला आहे.प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी एसटी महामंडळाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र गेल्या अनेक वर्षांत फारसे न झालेले बदल आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता २0१२-१३ पासून ते आतापर्यंत जवळपास १६ कोटी प्रवासी कमी झाले. त्यामुळे प्रवासी व उत्पन्न वाढवण्यासाठी महामंडळाकडून वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. तरीही उत्पन्नात वाढ होताना दिसत नाही. मात्र एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी याच महिन्यात भारमान ५0.९८ टक्के होते. हे पाहता ५.७७ टक्के भारमानात वाढ झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्यापर्यंत १३६ कोटी ४५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा याच महिन्यापर्यंत १४७ कोटी ४८ लाखांपर्यंत उत्पन्न पोहोचले आहे. महामंडळाचे प्रवासी भारमान वाढलेले असतानाच मध्य रेल्वेलाही सुगीचे दिवस आलेले आहेत. सिग्नल बिघाड, रुळाला तडा, ट्रेन रुळावरून घसरणे इत्यादी कारणांमुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत होत असते आणि वक्तशीरपणाची ऐशीतैशी होताना दिसते. परंतु फेब्रुवारी महिन्यात मध्य रेल्वेची लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वक्तशीरपणात चांगलीच सुधारणा झाली. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ९१.४ टक्के वक्तशीरपणा मध्य रेल्वेचा राहिला, तर त्याआधी जानेवारी महिन्यात ८८ टक्के वक्तशीरपणा होता. महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सकाळी गर्दीच्या वेळी ९४ टक्के तर संध्याकाळी गर्दीच्या वेळी ९0 टक्के वक्तशीरपणा होता, अशी माहिती देण्यात आली. आता मार्च महिना संपत आला असून या महिन्यात रेल्वेचा वक्तशीरपणा कसा राहील हे पाहण्यासारखे असेल. (प्रतिनिधी)एसटी फेऱ्यांचे केलेले नियोजन पाहता एसटी महामंडळाला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. मार्च महिन्यात एसटीचे प्रवासी भारमान हे ५६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष रेल्वेकडून गणले जाते. या चालू आर्थिक वर्षातील फेब्रुवारी महिन्यात सर्वात चांगला वक्तशीरपणा राहिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.