शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

एसटी प्रशासनाला विठ्ठल पावला!

By admin | Updated: July 13, 2017 05:31 IST

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने, वारी विशेष एसटी सेवा देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने, वारी विशेष एसटी सेवा देण्यात आली होती. या सेवेमुळे एसटी प्रशासनाला तब्बल १६.५२ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षी याच काळात १३ कोटी रुपये कमविले होते. यंदा आकड्यात वाढ होऊन प्रवाशांच्या संख्येतदेखील वाढ झाली आहे. यामुळे तोट्यात सुरू असलेल्या एसटी प्रशासनाला विठ्ठल पावल्याची चर्चा एसटी वर्तुळात आहे.आषाढी वारीनिमित्त राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथील भाविकदेखील विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झाले होते. भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाने पंढरपूर येथील मूळ स्थानकावरून, काही अंतरावर तात्पुरते स्वरूपाचे बस स्थानक उभारले होते. ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत ३ हजार ५२७ वारी विशेष एसटीचे १६ हजार ३०७ फेऱ्या चालविण्यात आल्या. या फेरीतून एसटी प्रशासनाला तब्बल १६ कोटी ५२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. वारी विशेष सेवेचा ७ लाख ३१ हजार ८०६ प्रवाशांनी लाभ घेतला. गतवर्षी एसटी प्रशासनाने वारी विशेष सेवेतून १३ कोटी ९ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते.प्रवासी-भाविकांच्या सोयीसाठी एसटी प्रशासनाच्या वतीने, ५०० प्रवासी मार्गदर्शकांची नेमणूक करण्यात आली होती. यामुळेदेखील उत्पन्न वाढीला फायदा झाल्याचे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. शिवाय प्रशासनाच्या वतीने तात्पुरत्या बस स्थानकावर वारकरी माहिती कक्ष, प्रसाधनगृह, वैद्यकीय मदत केंद्र आणि एसटी चालक-वाहकांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची विश्रामगृहे उभारण्यात आली असल्याची माहिती, एसटी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.