शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

एसआरपी जवानांना मिळणार ३० सुट्ट्यांचे वेतन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:22 IST

मोबदला देण्याबाबत गृह विभागाला प्रस्ताव सादर : दीर्घ कालावधीच्या बंदोबस्तामुळे साप्ताहिक सुट्टी घेणे अशक्य

जमीर काझी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपी) कार्यरत असलेल्या २० हजारांवर जवानांसाठी खूशखबर आहे. नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी ५-५ महिने ‘आॅन ड्युटी’ तैनात असल्याने बुडणाऱ्या सर्व साप्ताहिक सुट्ट्यांच्या बदल्यात त्यांना त्याचे वेतन मिळणार आहे. सध्या दिल्या जाणाºया आठ सुट्ट्यांच्या वेतनाऐवजी विशेष बाब म्हणून त्याची मर्यादा ३० दिवसांपर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

एसआरपीने सादर केलेला प्रस्ताव पोलीस महासंचालकांकडून मान्यतेसाठी मंत्रालयात पाठविला आहे. पोलिसांनी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय राज्यात गेल्या तीन वर्षांपासून लागू आहे. मात्र त्यासाठी एका कॅलेंडर वर्षात जास्तीत जास्त ८ दिवसांची मर्यादा आहे. एसआरपी जवानांना मात्र बंदोबस्तामुळे दरवर्षी ३०-३५ साप्ताहिक सुट्ट्यांना मुकावे लागते. त्यामुळे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्टÑ पोलीस दलाच्या अखत्यारीत एसआरपी हा स्वतंत्र विभाग आहे. महापूर, दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी स्थानिकांच्या मदतीसाठी त्यांना पाठविले जाते. तसेच नक्षलग्रस्त भाग, घातपाती घटना, निवडणुका व अन्य महत्त्वाच्या कामावेळी राज्यभरातील विविध जिल्ह्यांत आवश्यकतेनुसार बंदोबस्तासाठी पाचारण केले जाते. प्रसंगी काही वेळा शेजारील राज्यातही बंदोबस्तासाठी पाठविले जाते. त्यासाठी १६ बटालियनअंतर्गत (तुकडी) एकूण २० हजारांहून अधिक जवानांची कुमक राज्यभरात विविध ठिकाणी कार्यरत आहे. दर दोन वर्षांनी प्रत्येक बटालियनला नक्षलग्रस्त भागात पाच महिन्यांसाठी पाठविले जाते. तर अन्य ठिकाणच्या बंदोबस्तासाठी किमान दोन महिने तैनात राहावे लागते. या कालावधीत त्यांना साप्ताहिक सुट्टीवर पाणी सोडावे लागते. मात्र सरकारच्या नियमानुसार केवळ ८ दिवसांच्या सुट्टीचा पगार मिळत असल्याने त्यांच्या अन्य सुट्ट्यांचे वेतन किंवा बदली सुट्टी दिली जात नव्हती. त्याबाबत जवानांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांच्या राज्यस्तरीय वृंद परिषदेतही हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याबाबत पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी एसआरपीच्या प्रमुख अप्पर महासंचालक अर्चना त्यागी यांना त्यासंबंधी प्रस्ताव बनविण्याची सूचना केली होती. त्यानुसार त्यांनी एसआरपी जवानांना वर्षाला ३० साप्ताहिक सुट्ट्यांचा मोबदला दिला जावा, असा प्रस्ताव ३ मे रोजी महासंचालक कार्यालयाला पाठविला. आता तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.आदेश काय सांगतो?राज्य सरकारने तीन वर्षांपूर्वी पोलिसांना साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी काम केल्यास त्या एक दिवसाचे वेतन देण्याचा आदेश लागू केला आहे. परंतु त्याअंतर्गत एका वर्षात जास्तीत जास्त ८ साप्ताहिक सुट्ट्यांचे वेतन देण्याची मर्यादा आहे. एसआरपीच्या जवानांना मात्र ड्युटीमुळे वर्षाला किमान २० ते ३० साप्ताहिक सुट्ट्यांवर पाणी सोडावे लागते.राज्यभरात १३ बटालियनएसआरपीच्या मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यभरात एकूण १३ बटालियन आहेत, तर ३ आयआरबीच्या कंपन्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये साधारण बाराशे ते तेराशे जवानांचा समावेश असतो.