शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
३ वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून बलात्कार; २४ तासांत पोलिसांनी नराधमाला यमसदनी धाडले
3
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा एकत्र होणार का? सुनील तटकर म्हणाले, 'तसा विषय..."
4
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
5
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
6
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
7
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
8
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
9
तिसऱ्या मुलासाठी अधिकाऱ्यांनी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
10
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
12
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
13
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
14
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
15
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
16
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
17
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
18
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत

By admin | Updated: April 20, 2017 07:08 IST

स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत

पुणे : स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत, तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.या वेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत’चे विश्वास मोरे, अनिल सावळे, योगिराज प्रभुणे, चैत्राली देशमुख आणि पांडुरंग सांडभोर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गो-रक्षणासाठी काम करणारे उद्योजक व समाजसेवक अभय संचेती, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट, प्रयोगशिल शेतकरी संतोष बेलदरे, नगरसेविका अश्विनी कदम, आशा बिबवे यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.राजा माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी राज्य मराठी संघाला शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली. वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले.फडणवीस म्हणाले, ‘‘सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा करणे हे आमचे कर्तव्य होते. त्याप्रमाणे हा कायदा करण्यात आला आहे. कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो; मात्र कर्जमाफी दिल्यानंतर, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळाला आहे. त्यात आर्ट आॅफ लिव्हिंगने सर्वाधिक काम केले आहे.’’बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले, तर समाजाचा विकास गतीने होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटत आहे. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.’’ रायकर म्हणाले, ‘‘राजकीय विरोधक आणि माध्यमांनीही व्यक्तिगत टीका कधी केली नाही हे फडणवीस यांचे वैशिष्ट्य आहे. पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर, त्यांनी कायदा मंजूर केला. ’’(प्रतिनिधी)