शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

श्री श्री रविशंकर राष्ट्रीय सांस्कृतिक दूत

By admin | Updated: April 20, 2017 07:08 IST

स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत

पुणे : स्वामी विवेकानंद यांच्या नंतर श्री श्री रविशंकर यांनी जगभरात अध्यात्माचा विचार व सत्याचा मार्ग अधिक प्रकटपणे मांडला. ते राष्ट्रीय सांस्कृतिक दूत आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. लोकशाहीचे चारही स्तंभ मजबूत केले जात नाहीत, तोपर्यंत लोकशाही समृद्ध होणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते योगगुरू श्री श्री रविशंकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा ‘लोकमत’चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी फडणवीस बोलत होते. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट, आॅल जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, लोकमतचे संपादक विजय बाविस्कर, राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष राजा माने, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस गोविंद घोळवे, जिल्हाध्यक्ष किरण जोशी, वसंत मुंडे, मंदार फणसे आदी उपस्थित होते.या वेळी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत’चे विश्वास मोरे, अनिल सावळे, योगिराज प्रभुणे, चैत्राली देशमुख आणि पांडुरंग सांडभोर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गो-रक्षणासाठी काम करणारे उद्योजक व समाजसेवक अभय संचेती, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते जयेश कासट, प्रयोगशिल शेतकरी संतोष बेलदरे, नगरसेविका अश्विनी कदम, आशा बिबवे यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.राजा माने यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात संजय भोकरे यांनी राज्य मराठी संघाला शासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी केली. वानखेडे यांनीही मनोगत व्यक्त केले.फडणवीस म्हणाले, ‘‘सरकार म्हणून पत्रकार हल्लाविरोधी कायदा करणे हे आमचे कर्तव्य होते. त्याप्रमाणे हा कायदा करण्यात आला आहे. कर्जमाफी हा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा मार्ग असू शकतो; मात्र कर्जमाफी दिल्यानंतर, शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला तर आपण करंटे ठरू. सिंचनासाठी पाणी देणे, शेतीमालाला योग्य भाव देणे, शेतमालाचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी अनेक स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात मिळाला आहे. त्यात आर्ट आॅफ लिव्हिंगने सर्वाधिक काम केले आहे.’’बापट म्हणाले, ‘‘पत्रकारांवरील हल्ला हा लोकशाहीवरील हल्ला आहे. पत्रकार समर्पक भावनेतून काम करतात. त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करण्यात आला.’’सत्काराला उत्तर देताना श्री श्री रविशंकर म्हणाले, ‘‘पत्रकार, उद्योजक, धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी एकत्रिपणे काम केले, तर समाजाचा विकास गतीने होईल. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सुटत आहे. शेतकऱ्यांमधील निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हिंगच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.’’ रायकर म्हणाले, ‘‘राजकीय विरोधक आणि माध्यमांनीही व्यक्तिगत टीका कधी केली नाही हे फडणवीस यांचे वैशिष्ट्य आहे. पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यास पाठिंबा दिला. सत्तेत आल्यानंतर, त्यांनी कायदा मंजूर केला. ’’(प्रतिनिधी)