शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आत्महत्यांनी पथक हादरले

By admin | Updated: December 15, 2014 04:30 IST

दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक रविवारी राज्यात झालेल्या ९ शेतक-यांच्या आत्महत्यांनी हादरले. औरंगाबादेत दुष्काळावर चर्चा सुरू असताना मराठवाड्यातच चार शेतकऱ्यांनी स्वत:ला संपविले.गारपिटीच्या तडाख्यात सापडलेल्या जळगाव जिल्ह्यात एका महिलेसह तीन, तर नगर आणि सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दुपारीच केंद्राचे पथक येथे दाखल झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी आयुक्तालयात मराठवाड्यातील स्थितीची औरंगाबादचे विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, नाशिक व अमरावतीचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले व ज्ञानेश्वर राजुरकर यांच्याकडून माहिती घेतली. सोमवारपासून हे पथक पाहणी करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क) >मराठवाड्यात चौघांचा आत्मघातसंदीपवर कर्ज फेडण्याची विवंचना आर्थिक विवंचनेत सापडलेल्या संदीपने झाडाला गळफास घेऊन जीवन संपविले, असे त्याचे वडील गुणवंत बक्केवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संदीपने मराठवाडा ग्रामीण बँकेच्या उमरी बाजार शाखेतून पीककर्ज घेतले होते़ त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे़> महिला शेतक-याचा मृत्यू पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने हताश झालेल्या महिला शेतकरी अन्नपूर्णा आनंदा चौधरी (४७, रा. जैतपीर, जळगाव) यांनी रविवारी संध्याकाळी स्वत:ला पेटवून घेतले. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.