शहरं
Join us  
Trending Stories
1
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
2
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
3
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
4
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
5
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
6
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...
7
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
8
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
9
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
10
GST कपातीमुळे तुमचा खर्च किती वाचणार? घरखर्च, विमा आणि गाड्यांच्या दरांवरचा 'हा' मोठा फरक समजून घ्या!
11
Viral Video: ५ किलो बटाटे अन् ५ किलो समोसे... कोणती पिशवी जड? मुलीने दिलं भन्नाट उत्तर
12
बिहारमध्ये एनडीएतील मित्रांनी वाढवलं भाजपा-जेडीयूचं टेन्शन, केली एवढ्या जागांची मागणी 
13
Ruturaj Gaikwad Century: बंगळुरुच्या मैदानात पुणेकराची हवा; सेंच्युरीसह ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
14
उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना
15
पाकिस्तानी क्रिकेटरसोबत होत रेखाचं अफेअर, लग्नासाठी आईने ज्योतिषाला दाखवलेली कुंडली पण...
16
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
17
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
18
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
19
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
20
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं

रानात उगवली अळंबी

By admin | Updated: July 31, 2016 02:28 IST

पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच.

दासगाव : पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच. अनेक रानभाज्या सध्या आदिवासी बांधवांकडून बाजारात उपलब्ध होत असल्या तरी ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असल्याने ग्रामीण भागातील लोक रानावनात फिरून अळंबी गोळा करीत आहेत.श्रावणाची चाहूल होताच ऊनपावसाच्या खेळात ही अळंबी उगवतात. याला काही ठिकाणी कुत्र्याची छत्री म्हणतात. पावसाच्या खेळात रानात ही अळंबी उगवतात. कृत्रिमरीत्या उत्पादन करण्यात येणाऱ्या अळंबीचे अनेक प्रकार आहेत. मात्र एका विशिष्ट वेळेला आणि ठरावीक काळापुरतेच रानात उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. नैसर्गिक सत्व आणि जीवनसत्वांनी पुरेपूर असलेली ही अळंबी ग्रामीण भागासह शहरी भागातही चवीने खाल्ली जातात. पांढऱ्याशुभ्र छत्रीच्या आकाराच्या अळंबीमध्ये अनेक प्रकार असले तरी या काळात केवळ दोन दिवसच येणारी ही अळंबी हिरव्यागार गवतात उठून दिसतात. लाल मातीत उगवणारी अळंबी जमवण्याकरिता ग्रामीण भागात मोठी कसरतच असते. ज्या ठिकाणी अळंबी मोठ्या प्रमाणात उगवतात तेथून अळंबी आणण्याकरिता पहाटेपासून लोकांची चढाओढ सुरू असते. पहाटे उठून अनेक जण अळंबीसाठी रानात जातात.सध्या आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा व्यवसाय सुरू आहे. रानावनात फिरून या गोळा करून शहरात आणल्या जात आहेत. महाडमध्ये देखील आदिवासी महिलांना हा एक रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यातील वातावरणाला साजेशा या रानभाज्या असल्याने शहरातील रासायनिक खतांवर वाढवेल्या भाज्यांपेक्षा या रानभाज्यांना मागणी आहे. अळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण असते. अळंबीच्या पौष्टिक गुणधर्मामुळे अळंबीला अधिक दर आहे. सध्या आदिवासींना अळंबीस किमान ५० ते १०० इतका दर मिळत आहे. कोकणात ही अळंबी केवळ दोनच दिवस मिळत असल्याने खवय्यांकरिता या दोन दिवसातच ही अळंबी बाजारात मिळणार आहेत.