शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

रानात उगवली अळंबी

By admin | Updated: July 31, 2016 02:28 IST

पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच.

दासगाव : पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच. अनेक रानभाज्या सध्या आदिवासी बांधवांकडून बाजारात उपलब्ध होत असल्या तरी ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असल्याने ग्रामीण भागातील लोक रानावनात फिरून अळंबी गोळा करीत आहेत.श्रावणाची चाहूल होताच ऊनपावसाच्या खेळात ही अळंबी उगवतात. याला काही ठिकाणी कुत्र्याची छत्री म्हणतात. पावसाच्या खेळात रानात ही अळंबी उगवतात. कृत्रिमरीत्या उत्पादन करण्यात येणाऱ्या अळंबीचे अनेक प्रकार आहेत. मात्र एका विशिष्ट वेळेला आणि ठरावीक काळापुरतेच रानात उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. नैसर्गिक सत्व आणि जीवनसत्वांनी पुरेपूर असलेली ही अळंबी ग्रामीण भागासह शहरी भागातही चवीने खाल्ली जातात. पांढऱ्याशुभ्र छत्रीच्या आकाराच्या अळंबीमध्ये अनेक प्रकार असले तरी या काळात केवळ दोन दिवसच येणारी ही अळंबी हिरव्यागार गवतात उठून दिसतात. लाल मातीत उगवणारी अळंबी जमवण्याकरिता ग्रामीण भागात मोठी कसरतच असते. ज्या ठिकाणी अळंबी मोठ्या प्रमाणात उगवतात तेथून अळंबी आणण्याकरिता पहाटेपासून लोकांची चढाओढ सुरू असते. पहाटे उठून अनेक जण अळंबीसाठी रानात जातात.सध्या आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा व्यवसाय सुरू आहे. रानावनात फिरून या गोळा करून शहरात आणल्या जात आहेत. महाडमध्ये देखील आदिवासी महिलांना हा एक रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यातील वातावरणाला साजेशा या रानभाज्या असल्याने शहरातील रासायनिक खतांवर वाढवेल्या भाज्यांपेक्षा या रानभाज्यांना मागणी आहे. अळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण असते. अळंबीच्या पौष्टिक गुणधर्मामुळे अळंबीला अधिक दर आहे. सध्या आदिवासींना अळंबीस किमान ५० ते १०० इतका दर मिळत आहे. कोकणात ही अळंबी केवळ दोनच दिवस मिळत असल्याने खवय्यांकरिता या दोन दिवसातच ही अळंबी बाजारात मिळणार आहेत.