शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

रानात उगवली अळंबी

By admin | Updated: July 31, 2016 02:28 IST

पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच.

दासगाव : पावसाळ्यातील रानभाज्या म्हणजे डोंगरदऱ्यातील लोकांकरिता पर्वणीच. अनेक रानभाज्या सध्या आदिवासी बांधवांकडून बाजारात उपलब्ध होत असल्या तरी ग्रामीण भागात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. गेल्या दोन दिवसांपासून ऊन पडत असल्याने ग्रामीण भागातील लोक रानावनात फिरून अळंबी गोळा करीत आहेत.श्रावणाची चाहूल होताच ऊनपावसाच्या खेळात ही अळंबी उगवतात. याला काही ठिकाणी कुत्र्याची छत्री म्हणतात. पावसाच्या खेळात रानात ही अळंबी उगवतात. कृत्रिमरीत्या उत्पादन करण्यात येणाऱ्या अळंबीचे अनेक प्रकार आहेत. मात्र एका विशिष्ट वेळेला आणि ठरावीक काळापुरतेच रानात उगवणाऱ्या अळंबीला मोठी मागणी आहे. नैसर्गिक सत्व आणि जीवनसत्वांनी पुरेपूर असलेली ही अळंबी ग्रामीण भागासह शहरी भागातही चवीने खाल्ली जातात. पांढऱ्याशुभ्र छत्रीच्या आकाराच्या अळंबीमध्ये अनेक प्रकार असले तरी या काळात केवळ दोन दिवसच येणारी ही अळंबी हिरव्यागार गवतात उठून दिसतात. लाल मातीत उगवणारी अळंबी जमवण्याकरिता ग्रामीण भागात मोठी कसरतच असते. ज्या ठिकाणी अळंबी मोठ्या प्रमाणात उगवतात तेथून अळंबी आणण्याकरिता पहाटेपासून लोकांची चढाओढ सुरू असते. पहाटे उठून अनेक जण अळंबीसाठी रानात जातात.सध्या आदिवासी बांधवांकडून रानभाज्यांचा व्यवसाय सुरू आहे. रानावनात फिरून या गोळा करून शहरात आणल्या जात आहेत. महाडमध्ये देखील आदिवासी महिलांना हा एक रोजगार उपलब्ध झाला आहे. पावसाळ्यातील वातावरणाला साजेशा या रानभाज्या असल्याने शहरातील रासायनिक खतांवर वाढवेल्या भाज्यांपेक्षा या रानभाज्यांना मागणी आहे. अळंबीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फॉलिक अ‍ॅसिडचे प्रमाण असते. अळंबीच्या पौष्टिक गुणधर्मामुळे अळंबीला अधिक दर आहे. सध्या आदिवासींना अळंबीस किमान ५० ते १०० इतका दर मिळत आहे. कोकणात ही अळंबी केवळ दोनच दिवस मिळत असल्याने खवय्यांकरिता या दोन दिवसातच ही अळंबी बाजारात मिळणार आहेत.