शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

समाजस्पंदने सरकारपर्यंत पोहोचवावीत

By admin | Updated: July 4, 2016 05:06 IST

देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे.

मुंबई : देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे. या समाजातील स्पंदने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ म्हणजेच अनुलोम ट्रस्टने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुलोम राज्यस्तरीय अभ्यासवर्गा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वझे, पंकज पाठक, स्वानंद ओक, पुष्कराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विकासाच्या वाटचालीत देश आणि राज्य वेगाने प्रगती करीत असताना समाजातील ज्या वर्गांमध्ये नैराश्य आहे, त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘अनुलोम’ ट्रस्ट हा एक सकारात्मक समूह असून, या समूहाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम करावे. जनतेशी संवाद साधला तरच जनतेची स्पंदने कळतील. यासाठी ट्रस्टने शासन आणि जनता यांच्यामधील सेतू बनावे. समाजामध्ये बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीच्या आधारावर जनमत तयार होते. त्यासाठी जनतेशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद होणे आवश्यक असून, ट्रस्ट जे काम करीत आहे ते समाजासाठी आहे. अनुलोम ट्रस्टच्या प्रशिक्षणार्थींनी शेतकरी विमा, पीक विमा, जलयुक्त शिवार या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रा. सुरेश खानापूरकर, डॉ. प्रकाश देवधर, हृषीकेश यादव यांचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>सुसंवाद महत्त्वाचामुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी जनतेशी वारंवार संवाद साधून त्यांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. १ कोटी नागरिकांनी ही सबसिडी सोडली. देशाच्या १६ हजार कोटी रुपयांची बचत सुसंवादामुळे झाली.