शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

समाजस्पंदने सरकारपर्यंत पोहोचवावीत

By admin | Updated: July 4, 2016 05:06 IST

देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे.

मुंबई : देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे. या समाजातील स्पंदने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ म्हणजेच अनुलोम ट्रस्टने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुलोम राज्यस्तरीय अभ्यासवर्गा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वझे, पंकज पाठक, स्वानंद ओक, पुष्कराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विकासाच्या वाटचालीत देश आणि राज्य वेगाने प्रगती करीत असताना समाजातील ज्या वर्गांमध्ये नैराश्य आहे, त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘अनुलोम’ ट्रस्ट हा एक सकारात्मक समूह असून, या समूहाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम करावे. जनतेशी संवाद साधला तरच जनतेची स्पंदने कळतील. यासाठी ट्रस्टने शासन आणि जनता यांच्यामधील सेतू बनावे. समाजामध्ये बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीच्या आधारावर जनमत तयार होते. त्यासाठी जनतेशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद होणे आवश्यक असून, ट्रस्ट जे काम करीत आहे ते समाजासाठी आहे. अनुलोम ट्रस्टच्या प्रशिक्षणार्थींनी शेतकरी विमा, पीक विमा, जलयुक्त शिवार या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रा. सुरेश खानापूरकर, डॉ. प्रकाश देवधर, हृषीकेश यादव यांचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>सुसंवाद महत्त्वाचामुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी जनतेशी वारंवार संवाद साधून त्यांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. १ कोटी नागरिकांनी ही सबसिडी सोडली. देशाच्या १६ हजार कोटी रुपयांची बचत सुसंवादामुळे झाली.