शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

समाजस्पंदने सरकारपर्यंत पोहोचवावीत

By admin | Updated: July 4, 2016 05:06 IST

देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे.

मुंबई : देशाची वाटचाल विकसित राष्ट्राकडे होत असताना समाजातील काही वर्गांमध्ये नैराश्य आढळून येत आहे. या समाजातील स्पंदने सरकारपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘अनुगामी लोकराज्य महाअभियान’ म्हणजेच अनुलोम ट्रस्टने करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दादर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘अनुलोम राज्यस्तरीय अभ्यासवर्गा’चे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी ते बोलत होते. ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर वझे, पंकज पाठक, स्वानंद ओक, पुष्कराज जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विकासाच्या वाटचालीत देश आणि राज्य वेगाने प्रगती करीत असताना समाजातील ज्या वर्गांमध्ये नैराश्य आहे, त्यांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. ‘अनुलोम’ ट्रस्ट हा एक सकारात्मक समूह असून, या समूहाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम करावे. जनतेशी संवाद साधला तरच जनतेची स्पंदने कळतील. यासाठी ट्रस्टने शासन आणि जनता यांच्यामधील सेतू बनावे. समाजामध्ये बऱ्याच वेळा अपुऱ्या माहितीच्या आधारावर जनमत तयार होते. त्यासाठी जनतेशी ‘हार्ट टू हार्ट’ संवाद होणे आवश्यक असून, ट्रस्ट जे काम करीत आहे ते समाजासाठी आहे. अनुलोम ट्रस्टच्या प्रशिक्षणार्थींनी शेतकरी विमा, पीक विमा, जलयुक्त शिवार या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. प्रा. सुरेश खानापूरकर, डॉ. प्रकाश देवधर, हृषीकेश यादव यांचा या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)>सुसंवाद महत्त्वाचामुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधानांनी जनतेशी वारंवार संवाद साधून त्यांना गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले. १ कोटी नागरिकांनी ही सबसिडी सोडली. देशाच्या १६ हजार कोटी रुपयांची बचत सुसंवादामुळे झाली.