शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

तीन पिढ्यांवर काळाने घातला घाला

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला.

मीरा रोड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला. दोन कर्त्या लक्ष्मी सोडून गेल्याने कदम कुटुंबीय सुन्न झाले आहे. मीरा रोडच्या सुंदरनगरमध्ये कदम कुटुंबीय १० वर्षांपासून राहत आहे. शिवाजी कदम हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सध्या ‘बेस्ट’च्या गोराई आगारात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा कल्याण हा समर्थ प्रॉडक्शनचा निर्माता आहे. कदम कुटुंबीय हे मूळचे साताऱ्यामधील सोनवडी गावचे. २०११ मध्ये कल्याणचा विवाह प्रिया निकम हिच्याशी झाला. शिवाजी कदम व त्यांची पत्नी चतुरा (४३), मुलगा कल्याण, सून प्रिया (२२) व पौर्णिमा (३) व ४ महिन्यांची अनन्या या दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. मे महिन्याची सुटी, गावची यात्रा यामुळे २८ एप्रिलला चतुरा, प्रिया, पौर्णिमा व अनन्या हे गावाला गेले होते. कामामुळे शिवाजी व कल्याण दोघेच मीरा रोडच्या घरी होते. शुक्रवारी शिवाजी हे या चौघांना आणण्यासाठी गावाला गेले होते. शनिवारी रात्री कदम कुटुंबीय निखिल ट्रॅव्हल्सने परतत होते. सर्व साखरझोपेत असताना पहाटे भीषण अपघात झाला. चतुरा, प्रिया व अनन्या या तिघीही अपघाताचा बळी ठरल्या. शिवाजी हे गंभीर जखमी आहेत. दैव बलवत्तर म्हणून पौर्णिमाला जास्त इजा झाली नाही. सकाळी कल्याणला घरी कळवण्यात आले की, अपघातात वडिलांना किरकोळ मार लागला आहे. ते ऐकून कामावर जाण्यास निघालेल्या कल्याणच्या मनात धस्स झाले. पनवेलला पोहोचल्यावर समोरचे भयाण वास्तव पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. आई, पत्नी व मुलगी कायमची आपल्याला सोडून गेल्याचे कळताच कल्याणने हंबरडाच फोडला. शेजाऱ्यांनी घेतली पनवेलला धाव : कदम कुटुंबीय राहत असलेल्या सुंदरनगरमध्ये तर शोककळा पसरली. अपघातात तिघींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूवर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाही. सकाळपासून अपघाताच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. परंतु, दुपारपर्यंत येथील रहिवाशांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर, काही शेजाऱ्यांनी पनवेलला धाव घेतली.