शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तीन पिढ्यांवर काळाने घातला घाला

By admin | Updated: June 7, 2016 07:42 IST

भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला.

मीरा रोड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात मीरा रोडच्या कदम कुटुंबीयांच्या घरातील सासू, सून व नात अशा तीन पिढ्यांवर काळाने घाला घातला. दोन कर्त्या लक्ष्मी सोडून गेल्याने कदम कुटुंबीय सुन्न झाले आहे. मीरा रोडच्या सुंदरनगरमध्ये कदम कुटुंबीय १० वर्षांपासून राहत आहे. शिवाजी कदम हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सध्या ‘बेस्ट’च्या गोराई आगारात सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहेत. त्यांचा मुलगा कल्याण हा समर्थ प्रॉडक्शनचा निर्माता आहे. कदम कुटुंबीय हे मूळचे साताऱ्यामधील सोनवडी गावचे. २०११ मध्ये कल्याणचा विवाह प्रिया निकम हिच्याशी झाला. शिवाजी कदम व त्यांची पत्नी चतुरा (४३), मुलगा कल्याण, सून प्रिया (२२) व पौर्णिमा (३) व ४ महिन्यांची अनन्या या दोन नाती असा त्यांचा परिवार आहे. मे महिन्याची सुटी, गावची यात्रा यामुळे २८ एप्रिलला चतुरा, प्रिया, पौर्णिमा व अनन्या हे गावाला गेले होते. कामामुळे शिवाजी व कल्याण दोघेच मीरा रोडच्या घरी होते. शुक्रवारी शिवाजी हे या चौघांना आणण्यासाठी गावाला गेले होते. शनिवारी रात्री कदम कुटुंबीय निखिल ट्रॅव्हल्सने परतत होते. सर्व साखरझोपेत असताना पहाटे भीषण अपघात झाला. चतुरा, प्रिया व अनन्या या तिघीही अपघाताचा बळी ठरल्या. शिवाजी हे गंभीर जखमी आहेत. दैव बलवत्तर म्हणून पौर्णिमाला जास्त इजा झाली नाही. सकाळी कल्याणला घरी कळवण्यात आले की, अपघातात वडिलांना किरकोळ मार लागला आहे. ते ऐकून कामावर जाण्यास निघालेल्या कल्याणच्या मनात धस्स झाले. पनवेलला पोहोचल्यावर समोरचे भयाण वास्तव पाहून त्याच्या काळजाचा थरकाप उडाला. आई, पत्नी व मुलगी कायमची आपल्याला सोडून गेल्याचे कळताच कल्याणने हंबरडाच फोडला. शेजाऱ्यांनी घेतली पनवेलला धाव : कदम कुटुंबीय राहत असलेल्या सुंदरनगरमध्ये तर शोककळा पसरली. अपघातात तिघींच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूवर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाही. सकाळपासून अपघाताच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. परंतु, दुपारपर्यंत येथील रहिवाशांचा त्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर, काही शेजाऱ्यांनी पनवेलला धाव घेतली.