शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘हिवरे बाजार’ गावोगावी पोहोचवा!

By admin | Updated: June 2, 2016 02:41 IST

सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे.

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. येथील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत. त्यामुळे ते गावोगावी पोहोचतील, अशी अपेक्षा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हिवरेबाजारचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले, गाव पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. येथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाचा सामना करीत आहे. अशावेळी येथील जलसंधारणाचे काम एक चमत्कार आहे. आता सर्वांनीच शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार, मृदसंधारणाची कामे यशस्वी करायची आहेत. एक कोटी झाडे लावून पर्यावरणाबाबत खूप मोठे काम करायचे आहे. महाराष्ट्र हे पर्यटन सक्षम राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, जलदुर्ग बांधले. त्याचा विकास केला तर राज्यातील पर्यटन व्यवसायात ४० टक्के वाढ होईल. देशातील पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी आकर्षण आहे. पंडित नेहरूंनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’हा ग्रंथ लिहिला. त्या किल्ल्याचेही पर्यटन केंद्र व्हावे. ग्रामीण पर्यटन ही विकासाची केंद्रे आहेत. पंचायत राज व्यवस्था ही वेदकाळापासून भारतात आहे. महात्मा गांधी यांनीही खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला. पंडित नेहरू यांनी राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील गावात पहिल्यांदा निवडणूक घेतली. त्या गावाचे पुढे नावही राहिले नाही. त्यानंतर विकासात आघाडी घेतलेल्या हिवरेबाजारने पंचायत राजचा आदर्श प्रस्थापित केला आहे. पोपटराव पवार यांनी आता गावोगावी जाऊन जल व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार प्रमुख पाहुणे होते. (प्रतिनिधी)