शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘हिवरे बाजार’ गावोगावी पोहोचवा!

By admin | Updated: June 2, 2016 02:41 IST

सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे.

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. येथील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत. त्यामुळे ते गावोगावी पोहोचतील, अशी अपेक्षा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हिवरेबाजारचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले, गाव पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. येथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाचा सामना करीत आहे. अशावेळी येथील जलसंधारणाचे काम एक चमत्कार आहे. आता सर्वांनीच शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार, मृदसंधारणाची कामे यशस्वी करायची आहेत. एक कोटी झाडे लावून पर्यावरणाबाबत खूप मोठे काम करायचे आहे. महाराष्ट्र हे पर्यटन सक्षम राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, जलदुर्ग बांधले. त्याचा विकास केला तर राज्यातील पर्यटन व्यवसायात ४० टक्के वाढ होईल. देशातील पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी आकर्षण आहे. पंडित नेहरूंनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’हा ग्रंथ लिहिला. त्या किल्ल्याचेही पर्यटन केंद्र व्हावे. ग्रामीण पर्यटन ही विकासाची केंद्रे आहेत. पंचायत राज व्यवस्था ही वेदकाळापासून भारतात आहे. महात्मा गांधी यांनीही खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला. पंडित नेहरू यांनी राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील गावात पहिल्यांदा निवडणूक घेतली. त्या गावाचे पुढे नावही राहिले नाही. त्यानंतर विकासात आघाडी घेतलेल्या हिवरेबाजारने पंचायत राजचा आदर्श प्रस्थापित केला आहे. पोपटराव पवार यांनी आता गावोगावी जाऊन जल व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार प्रमुख पाहुणे होते. (प्रतिनिधी)