शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
4
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
5
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
6
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
7
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
8
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
9
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
10
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
11
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
12
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
13
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
14
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
15
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
16
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
17
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
18
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
19
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
20
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या

‘हिवरे बाजार’ गावोगावी पोहोचवा!

By admin | Updated: June 2, 2016 02:41 IST

सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे.

अहमदनगर : ‘सुजलाम् सुफलाम्, मलयज शितलाम्’ या राष्ट्रगीतामधील वर्णनाची अनुभूती हिवरेबाजारमध्ये येते. जल व्यवस्थापनासाठी आधी इस्त्राईलचे नाव घेतले जायचे. आता देशात आणि जगातही हिवरेबाजारचे नाव घेतले जात आहे. येथील विकास आणि जलव्यवस्थापनाचे प्रयोग देशातील सर्व कृषी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात असावेत. त्यामुळे ते गावोगावी पोहोचतील, अशी अपेक्षा राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामीण विकास पर्यटन केंद्राचे बुधवारी राव यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हिवरेबाजारचा गौरव करताना राज्यपाल म्हणाले, गाव पाहून आणि ग्रामस्थांना भेटून खूप आनंद झाला. येथे आलो ते फक्त प्रेरणा घेण्यासाठी. हिवरेबाजारने जलसंधारणाबाबतच्या अशक्य गोष्टी शक्य केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये हिवरेबाजारचा गौरव केला आहे. जल नियोजन, दुष्काळाशी लढा देणारे गाव म्हणून हिवरेबाजारने जगासमोर आदर्श ठेवला आहे. मराठवाडा दुष्काळाचा सामना करीत आहे. अशावेळी येथील जलसंधारणाचे काम एक चमत्कार आहे. आता सर्वांनीच शाश्वत विकासावर भर दिला पाहिजे. जलयुक्त शिवार, मृदसंधारणाची कामे यशस्वी करायची आहेत. एक कोटी झाडे लावून पर्यावरणाबाबत खूप मोठे काम करायचे आहे. महाराष्ट्र हे पर्यटन सक्षम राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ले, जलदुर्ग बांधले. त्याचा विकास केला तर राज्यातील पर्यटन व्यवसायात ४० टक्के वाढ होईल. देशातील पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाविषयी आकर्षण आहे. पंडित नेहरूंनी नगरच्या भुईकोट किल्ल्यात ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’हा ग्रंथ लिहिला. त्या किल्ल्याचेही पर्यटन केंद्र व्हावे. ग्रामीण पर्यटन ही विकासाची केंद्रे आहेत. पंचायत राज व्यवस्था ही वेदकाळापासून भारतात आहे. महात्मा गांधी यांनीही खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला. पंडित नेहरू यांनी राजस्थान आणि आंध्र प्रदेशातील गावात पहिल्यांदा निवडणूक घेतली. त्या गावाचे पुढे नावही राहिले नाही. त्यानंतर विकासात आघाडी घेतलेल्या हिवरेबाजारने पंचायत राजचा आदर्श प्रस्थापित केला आहे. पोपटराव पवार यांनी आता गावोगावी जाऊन जल व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार प्रमुख पाहुणे होते. (प्रतिनिधी)