शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाला गती

By admin | Updated: August 4, 2016 02:52 IST

महत्त्वाकांक्षी अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पास गती मिळावी, यासाठी बुधवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली

ठाणे : ठाणे महापालिकेने प्रस्तावित केलेल्या महत्त्वाकांक्षी अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पास गती मिळावी, यासाठी बुधवारी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आणि भिवंडी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाणे शहरांतर्गत आणि मीरा-भार्इंदर, वसई-विरार, भिवंडी आणि कल्याण या मार्गांवर जलवाहतूक सेवा सुरू करण्याबाबत मागील आठवड्यात केंद्रीय भूपृष्ठ आणि सागरी वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाबाबत सादरीकरण केले होते. या बैठकीत गडकरी यांनी या संकल्पनेला तत्त्वत: मंजुरी दिली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयात बुधवारी बैठक झाली. त्यात प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करणे, तांत्रिक बाबी तपासणे, केंद्राकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करणे आदीसाठी संयुक्त समितीची स्थापना करून दर महिन्याला बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच गायमुख येथे जेटी बांधणे, त्या परिसराचे सुशोभीकरण करणे तसेच ते स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणे, याबाबत चर्चा होऊन सदर प्रकल्प मार्चअखेर पूर्ण करण्यात येईल, असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. >या प्रकल्पांतर्गत ठाण्यांतर्गत कोलशेत, साकेत आणि दिवा या मार्गांवर जलवाहतूक सुरू करणे तसेच इतर शहरांना जोडण्यासाठी ठाणे-कल्याण, ठाणे-भिवंडी आणि ठाणे-बोरिवली आदी मार्गांवर जलवाहतूक सेवा प्रस्तावित करण्यात येणार आहे. या जलवाहतूक प्रकल्पाचे मुख्य वाहतूक केंद्र हे कोलशेत येथे बनवण्यात येणार असून या ठिकाणी प्रतीक्षा कक्ष, पार्किंग व्यवस्था, तिकीट काउंटर यासह सर्व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव या सर्व महापालिकांच्या वतीने बनवण्यात येणार असून तो केंद्रास सादर करण्यात येणार आहे. यासाठी मेरीटाइम बोर्डाचे सहकार्य घेण्यात येणार आहे.