शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

स्पीड लॉक यंत्रणेमुळे मंदावतोय परिवहन बसेसचा वेग

By admin | Updated: July 7, 2014 04:05 IST

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते.

मुंबई : सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते. एसटी महामंडळाच्या गाड्यांना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ताशी ६०च्या वेगाचा लॉक (स्पीड लॉक) बसवण्यात आला आहे. मात्र यामुळे महामंडळाचीच गोची होत असून, लॉकमुळे गाड्यांचा वेग खूपच मंदावला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून, वर्षाला ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाले असून, यात वाढ करण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे एसटीला स्पीड लॉक बसवल्यानेही त्याचा फटका बसत असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून एसटी गाड्यांना स्पीड लॉक बसवण्यात आल्यामुळे गाड्या धीम्या गतीने धावतात आणि त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर लागत आहे. यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी एसटीकडे येत आहेत. एसटी गाड्यांना ताशी ६०च्या वेगाचा स्पीड लॉकचा नियम आठ वर्षांपूर्वीच करण्यात आला आणि त्याची कठोर अंमलबजावणीही केली गेली. मात्र आगारात रिकाम्या गाड्यांना हा लॉक बसवल्यामुळे प्रवासी भरताच या गाड्या ४० ते ५०च्याच वेगाने धावत आहेत. एक्स्प्रेस मार्गांवर तर वेग पकडताच येत नसल्याने गाड्या उशिराने पोहोचतात आणि प्रवासी, चालकांमध्ये वाद उद्भवत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे उशिराने गाडी स्थानक किंवा आगारात पोहोचल्यास चालकांनाही याबाबत जाब विचारला जातो. त्यामुळे निदान गाड्यांना ८०चा स्पीड लॉक बसवावा, त्यामुळे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर बसचा वेग हा ६० ते ७०पर्यंत जाईल, अशी मागणी एसटी युनियनकडूनही केली गेली आहे. (प्रतिनिधी)