शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

स्पीड लॉक यंत्रणेमुळे मंदावतोय परिवहन बसेसचा वेग

By admin | Updated: July 7, 2014 04:05 IST

सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते.

मुंबई : सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता महामंडळाने प्रवासी वाढवण्याबरोबरच उत्पन्नवाढीचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. असे असतानाही महामंडळ उद्दिष्टाकडे दुर्लक्षच करीत असल्याचे दिसते. एसटी महामंडळाच्या गाड्यांना वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ताशी ६०च्या वेगाचा लॉक (स्पीड लॉक) बसवण्यात आला आहे. मात्र यामुळे महामंडळाचीच गोची होत असून, लॉकमुळे गाड्यांचा वेग खूपच मंदावला आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून, वर्षाला ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे महामंडळाला चांगलेच उत्पन्न मिळते. मात्र महामंडळाचे प्रवासी आणि उत्पन्न गेल्या काही महिन्यांमध्ये कमी झाले असून, यात वाढ करण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्य बाब म्हणजे एसटीला स्पीड लॉक बसवल्यानेही त्याचा फटका बसत असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून एसटी गाड्यांना स्पीड लॉक बसवण्यात आल्यामुळे गाड्या धीम्या गतीने धावतात आणि त्यांना इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर लागत आहे. यावरून प्रवासी आणि चालकांमध्ये वाद होत असल्याच्या तक्रारी एसटीकडे येत आहेत. एसटी गाड्यांना ताशी ६०च्या वेगाचा स्पीड लॉकचा नियम आठ वर्षांपूर्वीच करण्यात आला आणि त्याची कठोर अंमलबजावणीही केली गेली. मात्र आगारात रिकाम्या गाड्यांना हा लॉक बसवल्यामुळे प्रवासी भरताच या गाड्या ४० ते ५०च्याच वेगाने धावत आहेत. एक्स्प्रेस मार्गांवर तर वेग पकडताच येत नसल्याने गाड्या उशिराने पोहोचतात आणि प्रवासी, चालकांमध्ये वाद उद्भवत असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे उशिराने गाडी स्थानक किंवा आगारात पोहोचल्यास चालकांनाही याबाबत जाब विचारला जातो. त्यामुळे निदान गाड्यांना ८०चा स्पीड लॉक बसवावा, त्यामुळे प्रवासी बसमध्ये चढल्यानंतर बसचा वेग हा ६० ते ७०पर्यंत जाईल, अशी मागणी एसटी युनियनकडूनही केली गेली आहे. (प्रतिनिधी)