शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

अकरावीसाठी आजपासून विशेष फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 11:26 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी, ११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप ३० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेले नाहीत. या विद्यार्थ्यांसाठी शुक्रवारी, ११ आॅगस्टपासून आॅनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.ज्या महाविद्यालयांत चार गुणवत्ता याद्या जाहीर झाल्यानंतरही रिक्त जागा राहिलेल्या आहेत, त्यांची माहिती गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आली. या माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांनी विशेष फेरीसाठी अर्ज करायचे आवाहन उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी केले आहे.या विशेष फेरीसाठी पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही प्रवेश न घेतल्यामुळे बाद झालेले विद्यार्थी, चार गुणवत्ता यादींपैकी एकाही यादीत नाव न आलेले विद्यार्थी, पहिल्या पंसतीचे महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. याउलट प्रवेश मिळाल्यानंतर तो रद्द केलेल्या विद्यार्थ्यांना स्थान मिळणार नाही.शुक्रवारपासून १३ आॅगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. रिक्त जागांनुसारच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पर्याय निवडावेत. १६ आॅगस्टला सायंकाळी ५ वाजता ही विशेष गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. तर १८ व १९ आॅगस्टदरमयन संबंधित महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतील.