शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

विशेष आॅनलाइन फेरी आजपासून

By admin | Updated: August 8, 2016 05:29 IST

अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखाबदल करू इच्छीणाऱ्या

मुंबई : अकरावीला दूरचे महाविद्यालय मिळाले आहे किंवा शाखा बदल करायचा आहे; अशा विविध कारणांमुळे अकरावी प्रवेशानंतरही महाविद्यालय किंवा शाखाबदल करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने विशेष आॅनलाइन फेरीचे आयोजन केले आहे. त्यासाठी लॉगीन आयडी आणि पासवर्ड तयार करून आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी, ८ आॅगस्टपासून सुरुवात होत आहे.याआधी मुंबई महानगर क्षेत्रातील अकरावीच्या २ लाख ६९ हजार ७७२ जागांसाठी घेण्यात आलेल्या आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत चार गुणवत्ता यादी जाहीर झाल्या. त्यातून एकूण १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांत प्रवेश घेतला. या यादीमध्ये नाव आल्यानंतरही ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही, अशा ७० हजार नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांपैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना उपसंचालक कार्यालयाने मेसेजद्वारे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांपैकी केवळ ११ हजार ८३० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतला होता.या सर्व प्रक्रियेत अर्ज न भरल्याने किंवा अर्धवट अर्ज भरल्याने प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात शुक्रवार आणि शनिवारी सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे उपसंचालक कार्यालयाने सांगितले. म्हणजेच आत्तापर्यंत सुमारे १ लाख ७० हजार विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला आहे. याउलट रिक्त जागांची संख्या एक लाखाच्या घरात गेली आहे. परिणामी, घरापासून दूरच्या महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या, चुकीच्या शाखेत प्रवेश घेतलेल्या, चुकीचा विषय निवडलेल्या आणि अद्याप प्रवेशापासून वंचित असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना या रिक्त जागांवर प्रवेश मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. (प्रतिनिधी)