शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विशेष मुलाखत : कोण म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य आक्रसले? द.मा.मिरासदारांचा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 15:00 IST

‘‘प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजिबात संकुचित झालेले नाही,’’ असे ठाम मत द.मा. यांनी मांडले.

ठळक मुद्देज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांनी १४ एप्रिलला ९३ व्या वर्षात केले पदार्पण

- प्रज्ञा केळकर-सिंग---------विनोदी कथांमधून महाराष्ट्राला खळखळून हसवणारे ज्येष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार यांनी १४ एप्रिलला ९३ व्या वर्षात पदार्पण केले. ग्रामीणढंगाच्या कथांमधून भन्नाट संवाद, जीवनाचं वास्तव चित्रण आणि बारीकसारीक तपशीलांसकट पात्रे उभे करणा-या द.मा. यांनी सध्याचे राजकारण, निवडणूक, आचार्य अत्रेंचे वाकचातुर्य याबाबत दिलखुलास गप्पा मारल्या. ‘‘प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असून,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अजिबात संकुचित झालेले नाही,’’ असे ठाम मत त्यांनी मांडले.----------------------------------सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आली आहे, असे म्हटले जाते. तुम्हाला काय वाटते?- भारतातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपले आहे, असे मला वाटत नाही. आपल्या देशात प्रत्येकाला वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे. स्वातंत्र्य आहे म्हणून लोक वेड्यासारखे वाटेल ते बोलतात. असे बोलणे, न बोलणे कायद्याच्या कक्षेत बसत नाही, त्यामुळे काहीच करता येत नाही. स्वातंत्र्य संकुचित वगैरे झालेले नाही.

साहित्यिक, लेखकांनी राजकारणाबाबत काय भूमिका घ्यावी?- राजकारण हे आपले क्षेत्र नाही. राजकारणात वेगळया प्रकारची माणसे लागतात. त्यांचे काळीज घट्ट असावे लागते. संवेदनशील आणि नाजूक मनाच्या माणसांनी राजकारणाच्या फंदात पडू नये. अशा माणसांना कधीच यश मिळणार नाही. त्यासाठी दगडाचे काळीज हवे, वाट्टेल तेवढ्या शिव्या खाण्याची सवय असली पाहिजे.

काही कलाकारांनी सत्ताधा-यांना मतदान न करण्याचे आवाहन करणारे पत्र काढले, तर काहींनी सत्ताधा-यांचे समर्थनार्थ पत्र काढले आहे. तुम्हालाकायवाटते?- डाव्या विचारसरणीचे लोक सत्ताधा-यांच्या विरोधात असू शकतात. प्रत्येकाला आपापले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना आपली भूमिका मांडू दे, लोकांना जे पटेल तेच लोक करतील.  प्रत्येकाला विरोधात अथवा बाजूने मत मांडण्याचा अधिकार आहे. आपण तो नाकारु शकत नाही.

आठवणीतील निवडणूक कोणती?संयुक्त महाराष्ट्र चळवळीत १९५७ साली गिरगाव मतदारसंघातून आचार्यअत्रे समितीकडून आमदारकीसाठी निवडणूक लढवत होते. त्यावेळी अत्रेंचे वाकचातुर्य कायम चर्चेचा विषय ठरायचे. आणि त्या निवडणुकीत अत्रेंचा विजय झाला.

तुम्ही यंदा मतदान करणार का? नागरिकांना काय संदेश द्याल?- मी १९४५ सालापासून प्रत्येक निवडणुकीत मतदान करत आलो आहे. यंदाच्या वर्षीही मी मतदान करणारच आहे. कोणाला मत द्यायचे, याचा विचार आधीपासून करायचा असतो. मतदान करायला गेल्यावर कोणाला मत द्यायचे, हे ठरवून कसे चालेल? विचार करुनच मतदान केंद्रावर जावे. 

सध्या काय वाचता? काय वाचायला आवडते?- बरीचशी जुनी पुस्तके मी वाचत असतो. मात्र, नवे साहित्य वाचनात येत नाही. दृष्टी क्षीण झाल्याने टीव्हीवर वाचायला मिळते, तेवढेच वाचतो आणि पाहतो. जुन्या कादंब-या मात्र आवर्जून वाचतो.

.........

गाडगीळ आणि अतिशयोक्ती आचार्य अत्रे एकदा रशियाच्या दौऱ्यावर होते. भारतात परतल्यावर त्यांचे ‘माझे रशियातील अनुभव’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शनिवार पेठेतल्या चौकात ही सभा होती. शेजारीच काकासाहेब गाडगीळ यांचे घर होते. त्यांचे पुत्र विठ्ठलराव गाडगीळ सभेचे अध्यक्ष होते. विठ्ठलरावांनी सभेचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘‘आचार्य अत्रे फार मोठे वक्ते आहेत. ते विनोद करतात, पण त्यांना अतिशयोक्ती करण्याची सवय आहे.’ त्यानंतर आचार्य अत्रे बोलण्यासाठी उठले. ते म्हणाले, ‘माझे मित्र विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेब गाडगीळांचे चिरंजीव आहेत. काय हो विठ्ठलराव, यात काही अतिशयोक्ती नाही ना?’’ त्यांचे हे बोलणे ऐकताच सभेमध्ये एकच हशा पिकला. -------‘लाल’ पोपटकाँग्रेसचे पोपटलाल शहा नावाचे पुढारी होते. ते निवडणुकीला उभे होते. अत्रे एकदा कोणावर घसरले की काय बोलतील, याचा नेम नसायचा. ते म्हणाले, ‘‘काँग्रेसमधून हे पोपटलाल निवडणुकीला उभे आहेत. काय करतात? काहीच नाही. नाव काय तर पोपटलाल! सगळे पोपट हिरवे असतात. हा एकटाच ‘लाल’ आहे.’’ असे शेकडो किस्से आजही स्मरणात आहेत.

टॅग्स :PuneपुणेD. M. Mirasdarद. मा. मिरासदारliteratureसाहित्यdemocracyलोकशाही