शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठात विशेष परीक्षा

By admin | Updated: June 27, 2014 00:45 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा प्रणाली राबविण्याची जबाबदारी परीक्षा नियंत्रकांवर आहे. विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा

६,६१६ विद्यार्थ्यांना संधी : विद्वत परिषदेत प्रस्तावाला मान्यतानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा प्रणाली राबविण्याची जबाबदारी परीक्षा नियंत्रकांवर आहे. विद्यापीठाने प्रवेशबंदी लावलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यासंदर्भात त्यांनी आक्षेप उपस्थित केला होता. परंतु त्यानंतरदेखील संस्थाचालक आणि राज्य शासनाच्या दबावाखाली याला गुरुवारी विद्वत परिषदेच्या बैठकीत हिरवी झेंडी देण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विद्वत परिषदेत संस्थाचालकांशी संबंधित अनेक सदस्यांचा समावेश आहे. प्रवेशबंदी असतानादेखील ६३ महाविद्यालयांनी ६,६१६ विद्यार्थ्यांना नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ देणार नाही, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली होती. परंतु ११ जून रोजी या विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेण्यात यावी, असे निर्देश राज्य शासनातर्फे देण्यात आले होते. यासंदर्भात विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या तातडीच्या बैठकीचे २३ जून रोजी आयोजन करण्यात आले होते. परंतु विशेष परीक्षेचे आयोजन केल्यास महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियमांचा भंग होईल, असा इशारा देत परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी ही परीक्षा घेण्यासंदर्भात आक्षेप उपस्थित केला. त्यानंतर या मुद्यावर गुरुवारी होणाऱ्या विद्वत परिषदेच्या बैठकीत पुनर्विचार करण्यात यावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व चंद्रकांत भडंग यांनी मंगळवारी दिले होते. त्यानुसार गुरुवारी विद्वत परिषदेच्या बैठकीला प्रारंभ झाला. सोमवारी स्थगित करण्यात आलेली चर्चा पुढे सुरू झाली. कुठल्याही सदस्याने फारसा विरोध केला नाही व एकमताने संबंधित परीक्षा घेण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. विशेष अध्यादेश काढणारआता या विशेष परीक्षेसाठी विद्यापीठातर्फे विशेष अध्यादेश काढण्यात येणार आहे. पहिले परीक्षा मंडळ व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेऊन हा अध्यादेश राज्यपालांकडे परवानगीसाठी पाठविणार आहे. राज्यपालांची मान्यता मिळाल्यावर त्याला न्यायालयासमोर मांडण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, या विशेष परीक्षेला सुरुवातीपासून विरोध करणारे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)२८ महाविद्यालयांचे काय चुकले?प्रवेशबंदी लावण्यात आल्यानंतर २५० पैकी ८८ महाविद्यालयांनी किमान १ नियमित प्राध्यापक भरतीची प्रक्रिया राबविली. यातील ६३ महाविद्यालयांनी नियमबाह्य पद्धतीने प्रवेश दिले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेश देणे हा प्रकार म्हणजे विद्यापीठाच्या निर्देशांनाच आव्हान होते. परंतु संस्थाचालकांचा दबाव आणि शैक्षणिक क्षेत्रात राजकारण्यांचा हस्तक्षेप यामुळे नियमबाह्य गोष्टी नियमांत बसविण्याची प्रशासनाकडूनच धडपड करण्यात आली. परंतु २८ महाविद्यालयांनी प्राध्यापकांची नियुक्ती करूनदेखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिले नव्हते. आम्हीदेखील नियमबाह्य पद्धतीने प्रवेश द्यायला हवे होते काय असा प्रश्न या महाविद्यालयांकडून उपस्थित करण्यात येत आहे. विद्यापीठ प्रशासन ‘नापास’उच्च शिक्षणाचा दर्जा वाढावा व विद्यापीठात नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून करण्यात येतात. परंतु गुरुवारी झालेल्या बैठकीत परीक्षा नियंत्रक सोडले तर एकाही अधिकाऱ्याने या प्रस्तावाचा विरोध केला नाही. एकूणच नियमांच्या संदर्भात विद्यापीठ प्रशासन नापास झाल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू होती.